शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री सरदेसाई यांच्याशी पक्ष नेतृत्व बोलेल : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 21:36 IST

राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.

पणजी  - राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.

प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी प्रेमानंद म्हांब्रे व हेमंत गोलतकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. खाणबंदीवर तोडगा निघाला नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही भाजपला पाठींबा द्यावा की नाही याबाबत फेरविचार करावा लागेल असे मंत्री सरदेसाई म्हणाले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारताच नाईक म्हणाले, की भाजपचे नेतृत्व सरदेसाई यांच्याशी बोलून त्यांचे म्हणणो जाणून घेतील. खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत. काँग्रेस पक्ष तसे चुकीचे चित्र उभे करत आहे. खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच नव्हे तर आताच पुन्हा सुरू व्हाव्यात असे सगळ्य़ाच मंत्री, आमदारांना व भाजपलाही वाटते. सरकार त्यावर उपाय काढील. खनिज खाण घोटाळ्य़ात काँग्रेसचे नेते अडकले आहेत, भाजपचे नव्हे.

यात्र नव्हे स्टंट (चौकट)

काँग्रेसची सध्याची नमन तुका गोंयकारा ही यात्र म्हणजे प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे, अशी टीका नाईक यांनी केली. राज्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर येत नाही म्हणून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे वैफल्यग्रस्त बनले आहेत व त्यामुळे ते यात्र काढत आहेत. सासष्टीत झालेल्या यात्रेवेळी काँग्रेसचे केवळ एकच आमदार सहभागी झाले. काँग्रेस पक्षाने लोकांच्या समस्या जरूर ऐकून घ्याव्यात पण या समस्या सोडविणो काँग्रेसला शक्य आहे का ते सांगावे, असे नाईक म्हणाले. 

काँग्रेसने सात दिवसांचा अवधी राज्यपालांना दिला होता. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला बोलाविले जावे असे काँग्रेसचे म्हणणो होते. सात दिवसांची मुदत संपली. आता यापुढे काँग्रेस पक्ष काय करणार ते त्या पक्षाने जाहीर करावे. काँग्रेसचे एक माजी मुख्यमंत्री म्हणतात, की गोवा विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जातील. काँग्रेसचे हे दिवास्वप्न आहे. विद्यमान भाजपप्रणीत आघाडी सरकार हे पाच वर्षे टीकेल हे काँग्रेसने लक्षात ठेवावे, असे नाईक म्हणाले.

काँग्रेस नेते यात्रेवेळी बसमधून फिरतात असे दाखविले जाते. प्रत्यक्षात त्या बसमध्ये कुणीच प्रवासी दिसत नाहीत. फक्त सात-आठ काँग्रेस कार्यकर्ते तेवढे दिसून येतात. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष पुढे काय करील ते चोडणकर यांनी सांगावे. लोकांची दिशाभुल करू नये. काँग्रेसच्या मतदारसंघात व विशेषत: सत्तरी तालुक्यात जाऊन चोडणकर यांनी यात्र काढावी असे आव्हान असल्याचे नाईक म्हणाले.

दरम्यान, येत्या 26 रोजी केंद्रातील भाजप सरकार चार वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने दि. 26 पासून पंधरा दिवस पक्षातर्फे विविध कार्यक्रम होतील. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणnewsबातम्या