शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मंत्री सरदेसाई यांच्याशी पक्ष नेतृत्व बोलेल : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 21:36 IST

राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.

पणजी  - राज्यातील खनिज खाणी नव्याने सुरू व्हाव्यात म्हणून सगळे मंत्री, आमदार आणि सरकार प्रयत्न करत आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई यांचे जे काही प्रश्न किंवा गा:हाणी आहे त्याविषयी भाजपचे नेतृत्व त्यांच्याशी चर्चा करील व तोडगा काढील, असे प्रदेश भाजपने गुरुवारी येथे स्पष्ट केले.

प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी प्रेमानंद म्हांब्रे व हेमंत गोलतकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. खाणबंदीवर तोडगा निघाला नाही तर येत्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्ही भाजपला पाठींबा द्यावा की नाही याबाबत फेरविचार करावा लागेल असे मंत्री सरदेसाई म्हणाले होते. त्याविषयी पत्रकारांनी विचारताच नाईक म्हणाले, की भाजपचे नेतृत्व सरदेसाई यांच्याशी बोलून त्यांचे म्हणणो जाणून घेतील. खनिज खाणी भाजप सरकारने बंद केलेल्या नाहीत. काँग्रेस पक्ष तसे चुकीचे चित्र उभे करत आहे. खनिज खाणी लोकसभा निवडणुकीपूर्वीच नव्हे तर आताच पुन्हा सुरू व्हाव्यात असे सगळ्य़ाच मंत्री, आमदारांना व भाजपलाही वाटते. सरकार त्यावर उपाय काढील. खनिज खाण घोटाळ्य़ात काँग्रेसचे नेते अडकले आहेत, भाजपचे नव्हे.

यात्र नव्हे स्टंट (चौकट)

काँग्रेसची सध्याची नमन तुका गोंयकारा ही यात्र म्हणजे प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे, अशी टीका नाईक यांनी केली. राज्यात काँग्रेसचे सरकार अधिकारावर येत नाही म्हणून प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे वैफल्यग्रस्त बनले आहेत व त्यामुळे ते यात्र काढत आहेत. सासष्टीत झालेल्या यात्रेवेळी काँग्रेसचे केवळ एकच आमदार सहभागी झाले. काँग्रेस पक्षाने लोकांच्या समस्या जरूर ऐकून घ्याव्यात पण या समस्या सोडविणो काँग्रेसला शक्य आहे का ते सांगावे, असे नाईक म्हणाले. 

काँग्रेसने सात दिवसांचा अवधी राज्यपालांना दिला होता. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याला बोलाविले जावे असे काँग्रेसचे म्हणणो होते. सात दिवसांची मुदत संपली. आता यापुढे काँग्रेस पक्ष काय करणार ते त्या पक्षाने जाहीर करावे. काँग्रेसचे एक माजी मुख्यमंत्री म्हणतात, की गोवा विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेतल्या जातील. काँग्रेसचे हे दिवास्वप्न आहे. विद्यमान भाजपप्रणीत आघाडी सरकार हे पाच वर्षे टीकेल हे काँग्रेसने लक्षात ठेवावे, असे नाईक म्हणाले.

काँग्रेस नेते यात्रेवेळी बसमधून फिरतात असे दाखविले जाते. प्रत्यक्षात त्या बसमध्ये कुणीच प्रवासी दिसत नाहीत. फक्त सात-आठ काँग्रेस कार्यकर्ते तेवढे दिसून येतात. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष पुढे काय करील ते चोडणकर यांनी सांगावे. लोकांची दिशाभुल करू नये. काँग्रेसच्या मतदारसंघात व विशेषत: सत्तरी तालुक्यात जाऊन चोडणकर यांनी यात्र काढावी असे आव्हान असल्याचे नाईक म्हणाले.

दरम्यान, येत्या 26 रोजी केंद्रातील भाजप सरकार चार वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. त्यानिमित्ताने दि. 26 पासून पंधरा दिवस पक्षातर्फे विविध कार्यक्रम होतील. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणnewsबातम्या