शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 17:43 IST

आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली.

म्हापसा : आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. म्हापशापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात बार्देस तालुक्यातील शेकडो लोकांनी यात भाग घेऊन हा उत्सव साजरा केला. 

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पर्रा गावात पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणा-या आकाशदिव्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पर्रा हे मूळ गाव. या उत्सवात माडाच्या झावळीपासून तयार केलेले, गवतापासून, पानांपासून तसेच अगदी साधे कागदी आकाशदिवे तयार करून प्रदर्शनाला मांडले होते. या स्पर्धेत तालुक्यातील सातशेहून जास्त लोक सहभागी झाले असल्याचे माहिती आयोजकांनी दिली. रस्ता दुतर्फा आकाशदिव्यांनी सजवण्यात आलेला. त्यामुळे येथील पूर्ण परिसर आकाशदिव्यांनी उजळून गेला होता. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लोकांबरोबर पर्यटकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वत: अंधारात राहून दुस-याला प्रकाशमय करणे हा दिवाळी सणामागचा मूळ उद्देश असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर यांनी दिली; पण हल्लीच्या काळात दीपावलीचा अर्थ व त्या मागची भावना युवा पिढीत कमी होत चालली आहे. युवा वर्ग वाममार्गाने जाऊ लागला आहे. दीपावली सणाची भावना त्यांच्या मनात रुजावी व हा उत्सव पुन्हा तेजोमय व्हावा यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मोरजकर यावेळी म्हणाले.   

पूर्वीच्या काळात घराघरातून आकाशकंदील पारंपारिक पद्धतीने बनवून लावले जायचे. आजच्या युवा पिढीत मात्र आकाशकंदील बनवण्याची आवड नष्ट होत चालली आहे. याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असलेला सोशल मीडियाचा प्रसार. आज दिवाळीला प्रदूषणाला उत्तेजन देणारे प्लास्टीकपासून बनवलेले रेडिमेड आकाशदिवे विकत घेऊन घरात लावले जातात. त्यामुळे पारंपारिकता लोकांजवळ असलेली कला नष्ट होत चालली आहे. या कलेली पुन्हा उभारी मिळावी व पर्यावरणाचा समतोल संतुलीत रहावा हा सुद्धा उद्देश ही स्पर्धा आयोजित करण्यामागे असल्याचे मोरजकर म्हणाले. 

आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर नरकासूराच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धाच्या नावावर काही युवक रात्रभर हिंडून दारूच्या नशेत धिंगाणा घालीत असतात. त्यामुळे युवकांची मानसिकता बिघडत चालली असून गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणावर उत्तेजन मिळत व त्यात बरीच वाढही झाली आहे. लोकांनी पुन्हा पारंपारिक रुढी व त्या मागचा उद्देश समजून घेऊन समाजाला आपले योगदान दिले पाहिजे, असेही मोरजकर यांनी सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळीgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर