शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक आकाशदिव्यांनी सजला पर्रीकरांचा पर्रा गाव, पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून साजरा केला दिव्यांचा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 17:43 IST

आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली.

म्हापसा : आकार, रंग, प्रकार वेगवेगळे मात्र सुंदर आकर्षक सुबक पारंपरिक पद्धतीने बनवलेले पर्यावरणाशी सांगड घालणारे आकाशदिवे रस्त्याच्या दुतर्फा मांडून दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली पर्रा येथे साजरी करण्यात आली. म्हापशापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात बार्देस तालुक्यातील शेकडो लोकांनी यात भाग घेऊन हा उत्सव साजरा केला. 

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पर्रा गावात पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणा-या आकाशदिव्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पर्रा हे मूळ गाव. या उत्सवात माडाच्या झावळीपासून तयार केलेले, गवतापासून, पानांपासून तसेच अगदी साधे कागदी आकाशदिवे तयार करून प्रदर्शनाला मांडले होते. या स्पर्धेत तालुक्यातील सातशेहून जास्त लोक सहभागी झाले असल्याचे माहिती आयोजकांनी दिली. रस्ता दुतर्फा आकाशदिव्यांनी सजवण्यात आलेला. त्यामुळे येथील पूर्ण परिसर आकाशदिव्यांनी उजळून गेला होता. या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लोकांबरोबर पर्यटकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

स्वत: अंधारात राहून दुस-याला प्रकाशमय करणे हा दिवाळी सणामागचा मूळ उद्देश असल्याची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप मोरजकर यांनी दिली; पण हल्लीच्या काळात दीपावलीचा अर्थ व त्या मागची भावना युवा पिढीत कमी होत चालली आहे. युवा वर्ग वाममार्गाने जाऊ लागला आहे. दीपावली सणाची भावना त्यांच्या मनात रुजावी व हा उत्सव पुन्हा तेजोमय व्हावा यासाठी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मोरजकर यावेळी म्हणाले.   

पूर्वीच्या काळात घराघरातून आकाशकंदील पारंपारिक पद्धतीने बनवून लावले जायचे. आजच्या युवा पिढीत मात्र आकाशकंदील बनवण्याची आवड नष्ट होत चालली आहे. याला कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होत असलेला सोशल मीडियाचा प्रसार. आज दिवाळीला प्रदूषणाला उत्तेजन देणारे प्लास्टीकपासून बनवलेले रेडिमेड आकाशदिवे विकत घेऊन घरात लावले जातात. त्यामुळे पारंपारिकता लोकांजवळ असलेली कला नष्ट होत चालली आहे. या कलेली पुन्हा उभारी मिळावी व पर्यावरणाचा समतोल संतुलीत रहावा हा सुद्धा उद्देश ही स्पर्धा आयोजित करण्यामागे असल्याचे मोरजकर म्हणाले. 

आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणावर नरकासूराच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धाच्या नावावर काही युवक रात्रभर हिंडून दारूच्या नशेत धिंगाणा घालीत असतात. त्यामुळे युवकांची मानसिकता बिघडत चालली असून गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणावर उत्तेजन मिळत व त्यात बरीच वाढही झाली आहे. लोकांनी पुन्हा पारंपारिक रुढी व त्या मागचा उद्देश समजून घेऊन समाजाला आपले योगदान दिले पाहिजे, असेही मोरजकर यांनी सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळीgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर