शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

तोंड पाहण्यासाठीही पर्रीकर भेटत नाहीत, अपक्ष आमदाराची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 19:23 IST

मी पर्रीकर सरकारला पाठिंबा दिलेला आहे. तो मागे घेतलेला नाही. पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मला भेटण्यासाठी वेळच देत नाहीत.

पणजी : मी पर्रीकर सरकारला पाठिंबा दिलेला आहे. तो मागे घेतलेला नाही. पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मला भेटण्यासाठी वेळच देत नाहीत. त्यांचे साधे तोंड पाहण्यासाठी देखील भेट मिळत नाही, अशी खंत सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. प्रशासन ठप्प झालेय हेही गावकर यांनी नमूद केले.सांगे मतदारसंघाची उपेक्षा होत आहे. सांगेतील अनेक प्रश्न सरकार सोडवत नाही. संजीवनी सहकारी साखर कारखान्याकडे व ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडेही गंभीरपणे लक्ष दिले जात नाही. गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मला भेटीसाठी वेळ दिली जात नाही. त्यामुळे परवा मी पत्रही पाठवले आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने निदान त्यांचे तोंड तरी पहायला मिळू द्या असे वाटते. भेट का दिली जात नाही ते मला ठाऊक नाही. तसे पहायला गेल्यास मी सरकारसोबत असूनही मला कुठल्याच विषयाबाबत विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत की नाही असा प्रश्न मला पडतो, असे आमदार गावकर म्हणाले.प्रशासन ठप्प झाले असल्याची टीका आता जाहीरपणे काही मंत्रीही करतात. मंत्र्यांचे म्हणणे खरेच आहे. मी स्वत:ही सर्वप्रथम तसे सांगितले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने माझी काही कामे सांगे मतदारसंघात केली. आरोग्य, पर्यटन व अन्य खात्यांनी मात्र केली नाहीत. सरकार सांगे मतदारसंघाला चांगली वागणूक देत नाही, असे गावकर म्हणाले. आम्ही काही मंत्री-आमदारांनी मिळून यापूर्वी जो जी-6 गट स्थापन केला होता, तो विद्यमान सरकार स्थिर राहावे एवढ्याच हेतूने त्यामागे अन्य कोणता अजेंडा नव्हता. तेवढ्याच हेतूने आम्ही भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांना भेटलो होतो, असे गावकर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले...तर 5 तारखेनंतर रस्त्यावरसंजीवनी सहकारी साखर कारखान्याची सध्याची स्थिती जर पाहिली तर हा कारखाना येत्या  5 डिसेंबरपर्यंत सुरू होईल असे वाटत नाही. कारखान्याला बळकटी देण्यासाठी 50-60 कोटींची गुंतवणूक सरकारने करणे गरजेचे आहे. सांगेतील हजारो शेतकरी या कारखान्यावर उपजीविका चालवतात. सरकारकडे आम्ही प्रथम दहा कोटींची मदत कारखान्यासाठी मागितली. तूर्त 4 कोटी दिल्याचे आम्हाला सांगितले जाते. जर येत्या 5 डिसेंबरला कारखाना सुरू झाला नाही तर आपण शेतक-यांसोबत रस्त्यावर उतरू, असा इशारा गावकर यांनी दिला. सरकार आता ऐनवेळी धावपळ करत आहे. मजुरांना कामाविना बसून पगार देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतक-यांना नुकसान होत आहे. गेल्या वर्षीही आम्हाला गळीत हंगामाच्या उद्घाटनाला बोलावले गेले व दुस-यादिवशीच महिन्याभरासाठी कारखाना बंद केला गेला. त्याचा मोठा फटका शेतक-यांना बसला, असे त्यांनी सांगितले. भोंगळ कारभाराचा हा परिणाम आहे. कारखाना शेतक-यांच्या ताब्यात देऊन संचालक मंडळ नेमले जावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर