शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

तोंड पाहण्यासाठीही पर्रीकर भेटत नाहीत, अपक्ष आमदाराची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 19:23 IST

मी पर्रीकर सरकारला पाठिंबा दिलेला आहे. तो मागे घेतलेला नाही. पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मला भेटण्यासाठी वेळच देत नाहीत.

पणजी : मी पर्रीकर सरकारला पाठिंबा दिलेला आहे. तो मागे घेतलेला नाही. पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मला भेटण्यासाठी वेळच देत नाहीत. त्यांचे साधे तोंड पाहण्यासाठी देखील भेट मिळत नाही, अशी खंत सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. प्रशासन ठप्प झालेय हेही गावकर यांनी नमूद केले.सांगे मतदारसंघाची उपेक्षा होत आहे. सांगेतील अनेक प्रश्न सरकार सोडवत नाही. संजीवनी सहकारी साखर कारखान्याकडे व ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडेही गंभीरपणे लक्ष दिले जात नाही. गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र मला भेटीसाठी वेळ दिली जात नाही. त्यामुळे परवा मी पत्रही पाठवले आहे. मुख्यमंत्री आजारी असल्याने निदान त्यांचे तोंड तरी पहायला मिळू द्या असे वाटते. भेट का दिली जात नाही ते मला ठाऊक नाही. तसे पहायला गेल्यास मी सरकारसोबत असूनही मला कुठल्याच विषयाबाबत विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे आम्ही सरकारमध्ये आहोत की नाही असा प्रश्न मला पडतो, असे आमदार गावकर म्हणाले.प्रशासन ठप्प झाले असल्याची टीका आता जाहीरपणे काही मंत्रीही करतात. मंत्र्यांचे म्हणणे खरेच आहे. मी स्वत:ही सर्वप्रथम तसे सांगितले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने माझी काही कामे सांगे मतदारसंघात केली. आरोग्य, पर्यटन व अन्य खात्यांनी मात्र केली नाहीत. सरकार सांगे मतदारसंघाला चांगली वागणूक देत नाही, असे गावकर म्हणाले. आम्ही काही मंत्री-आमदारांनी मिळून यापूर्वी जो जी-6 गट स्थापन केला होता, तो विद्यमान सरकार स्थिर राहावे एवढ्याच हेतूने त्यामागे अन्य कोणता अजेंडा नव्हता. तेवढ्याच हेतूने आम्ही भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांना भेटलो होतो, असे गावकर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले...तर 5 तारखेनंतर रस्त्यावरसंजीवनी सहकारी साखर कारखान्याची सध्याची स्थिती जर पाहिली तर हा कारखाना येत्या  5 डिसेंबरपर्यंत सुरू होईल असे वाटत नाही. कारखान्याला बळकटी देण्यासाठी 50-60 कोटींची गुंतवणूक सरकारने करणे गरजेचे आहे. सांगेतील हजारो शेतकरी या कारखान्यावर उपजीविका चालवतात. सरकारकडे आम्ही प्रथम दहा कोटींची मदत कारखान्यासाठी मागितली. तूर्त 4 कोटी दिल्याचे आम्हाला सांगितले जाते. जर येत्या 5 डिसेंबरला कारखाना सुरू झाला नाही तर आपण शेतक-यांसोबत रस्त्यावर उतरू, असा इशारा गावकर यांनी दिला. सरकार आता ऐनवेळी धावपळ करत आहे. मजुरांना कामाविना बसून पगार देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतक-यांना नुकसान होत आहे. गेल्या वर्षीही आम्हाला गळीत हंगामाच्या उद्घाटनाला बोलावले गेले व दुस-यादिवशीच महिन्याभरासाठी कारखाना बंद केला गेला. त्याचा मोठा फटका शेतक-यांना बसला, असे त्यांनी सांगितले. भोंगळ कारभाराचा हा परिणाम आहे. कारखाना शेतक-यांच्या ताब्यात देऊन संचालक मंडळ नेमले जावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकर