शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

कळंगुट येथील अतिक्रमणांवर पंचायतीची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:08 IST

कळंगुटातील जगप्रसिद्ध किनाऱ्यावर वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ सततची सुरुच असते.

म्हापसा : नाताळा निमित्त स्वच्छ कळंगुट सुंदर कळंगुट पर्यटकांसमोर उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने तसेच लोकांना मोकळ्या वातावरणात फिरणे शक्य व्हावे यासाठी कळंगुट परिसरातील अनेक गैरप्रकारांवर कारवाई करण्यात आली. केलेल्या कारवाईत अनेक अतिक्रमणे हटवण्यात आली असल्याची माहिती सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिली आहे. अतिक्रमणे हटविण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला.

कोणताही सण असो सुट्ट्या असो किंवा इतर कार्यक्रम असो कळंगुटातील जगप्रसिद्ध किनाऱ्यावर वर्षाचे बाराही महिने पर्यटकांची वर्दळ सततची सुरुच असते. २० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत तर कळंगुट किंवा त्याच्या सभोवतालच्या भागात स्थानिकांसोबत पर्यटकांना फिरणेही कठीण होवून जाते. या अडचणींना विविध कारणे असली तरी कळंगुट परिसरात झालेली अतिक्रमणे त्याचाच एक भाग मानला जात आहे. ही अडचण दूर करण्यासाठी पंचायतीकडून विशेष मोहिम हाती घेतली होती. 

सरपंच शॉन मार्टीन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार नाताळ ते नवीन वर्षापर्यंत तरी लोकांना किमान मोकळ्या वातावरणात फिरणे शक्य व्हावे यासाठी मागील काही दिवसापासून ही मोहिम हाती घेण्यात आली होती. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर सदरची मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले. मोहिमेवर उपसभापती मायकल लोबो हे लक्ष देत होते. त्यांच्या निदर्शनाखाली ही मोहिम यशस्वी करण्यात आली. तसेच जि.पं. सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर पंचायतीचे पंच सदस्य यांनीही आप आपल्या प्रभागातून भाग घेतला होता. संपूर्ण मोहिम पोलीस संरक्षणात कसल्याच अडथळ््याविना हाती घेण्यात आल्याचे मार्टीन्स म्हणाले.  

या मोहिमे अंतर्गत  फुटपाथवरील सुमारे २० हून अधिक अतिक्रणे तसेच गाडे हटवण्यात आले आहेत. हटवण्यात आलेल्या गाड्यांमुळे लोकांना चालणे सोयीस्कर ठरणार असल्याचे मार्टीन्स यांनी सांगितले. पंचायतीची परवानगी न घेता तसेच कसल्याच प्रकारचा महसूल न देता विविध ठिकाणी उभारण्यात आलेले जाहीरातीचे सुमारे १२५ हून अधिक फलक काढून टाकण्यात आले. 

मागील बऱ्याच काळापासून कळंगुट परिसरातील विविध रस्त्यांवर पार्किंगसाठी अडथळे निर्माण करणारी तसेच भंगार अवस्थेत वाहने टाकून देण्यात आलेली. या वाहनांमुळे पार्किंगसाठी जागेची अडवणूक झाली होती. टाकून देण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यापूर्वी ती हटवण्यासाठी मुदत देणारी नोटिस वाहनांवर पंचायतीच्या वतीने लावण्यात आली होती. देण्यात आलेल्या मुदतीत अनेक वाहन चालकांनी आपली वाहने रस्त्यावरुन हटवली होती. त्यानंतर रस्त्यावर कायम असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे २० हून दुचाकी तसेच १५ हून जास्त चारचाकी गाड्या हटवण्यात आल्या. पुढील काही दिवस ही वाहने पंचायतीच्या ताब्यात राहणार असून त्यानंतर त्यांचा लिलाव केला जाणार असल्याचे मार्टिन्स म्हणाले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgoaगोवा