शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पणजीत उद्या काजू महोत्सव २०२४ चे आयोजन; ३ दिवस हा महोत्सव होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 14:31 IST

हा केवळ महोत्सव नाहीतर काजू शेतकरी आणि स्थानिक समुदायांसाठी आशेचा किरण आहे.

नारायण गावस 

पणजी: गोवा सरकार आणि वनविकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काजू महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार दि. १० ते १२ मे असे एकूण ३ दिवस हा महोत्सव होणार आहे. दयानंद बांदोडकर मैदान, कांपाल पणजी येथे सदर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला प्रवेश मोफत असून दरदिवशी सायंकाळी ४.३० वा. नंतर विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा आणि संगीत असा मोठा खजाना आहे. रात्री १० पर्यंत ते कार्यक्रम चालू राहाणार असून त्यात काजू गॅलरी, फॅशन शो, खेळ, स्टॉल्स तसेच विविध आकर्षक बक्षिसे यांचा समावेश आहे.

हा केवळ महोत्सव नाहीतर काजू शेतकरी आणि स्थानिक समुदायांसाठी आशेचा किरण आहे. आकर्षक कार्यक्रम आणि उपक्रमांसह, राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करताना स्थानिक व्यवसायांना, विशेषत: महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण स्वयं-सहायता गटांना सक्षम बनवण्याचा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक काजू प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकांपासून ते विविध ५० पेक्षा जास्त फूड स्टॉल्स काजू-आधारित स्वादिष्ट पदार्थांचे असणार आहेत. मुख्यंमत्र्यांनी गेल्या वर्षी या महाेत्सवाला कायम साजरा करण्याचा दर्जा दिला आहे.

काजू हे गोव्यातील एक प्रमुख पीक असून त्यास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच उत्पादन वाढवण्यासाठी या महोत्सवांची आखणी करण्यात आली आहे. वनविकास महामंडळाने गोव्यात अनेक ठिकाणी काजूची लागवड केली असून ती आणखी वाढावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहे. काजू पिकाला चांगला दर मिळावा तसेच आधारभूत किंमत लाभावी म्हणून राज्य सरकारच्या सहकार्याने प्रयत्न होत आहेत. काजूपासून विविध प्रकारची तयार होणारी उत्पादने एकाच ठिकाणी मिळावित आणि काजूला व्यासपीठ लाभावे म्हणून हा महोत्सव आयोजित केला आहे. गोव्यातील काजू बागायतदार या महोत्सवात सहभागी होणार असून खवय्यांना देखील तेथे मोठी पर्वणी लाभणार असल्याचे सांगण्यात आले.