शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'स्मार्ट सिटी' कामांच्या विलंबासाठी माफी मागतो: बाबूश मोन्सेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2024 09:47 IST

३१ मे अखेर कामे पूर्ण होतील, अशी व्यक्त केली अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'स्मार्ट सिटी योजनेची कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने मी माफी मागतो. ३१ मेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे,' असे महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे.

मंत्री मोन्सेरात म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे आपल्याला माहीत आहे. या कामांबाबत लोकांच्या सहनशीलतेचे आपल्याला कौतुक आहे. मात्र, त्याचबरोबर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. कामे पूर्ण होण्यास उशीर होत असल्याने आपण माफी मागतो. ३१ मे या दिलेल्या डेडलाइनमध्ये कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.'

बाबूश म्हणाले की, 'पणजी जुने शहर आहे. नवीन शहर बनवायचे असल्यास कामे त्वरित होतात. मात्र, जुन्या शहराचा विकास करायचा असल्यास जुन्या गोष्टी बाजूला करून विकास करावा लागतो. त्यात वेळ जाणारच. त्यामुळे लोकांना सहन करावे लागते. स्मार्ट सिटीची कामे ही शहरवासीयांच्या फायद्याची तसेच शहराच्या विकासासाठी आहेत हे लोकांना ठाऊक आहे. पणजीवासीयांना या कामांचा त्रास होत असला तरी जेव्हा कामे पूर्ण होतील, तेव्हा ते हा सर्व त्रास विसरतील. कामे लवकर पूर्ण होण्यावर भर दिला जात आहे.'

दरम्यान, या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या प्रदषणामळे नागरिकांना आरोग्याची समस्या जाणवत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन या धूळ प्रदूषणाची तसेच एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मागील आठवड्यात पाहणी केली.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा