शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

'स्मार्ट सिटी' कामांच्या विलंबासाठी माफी मागतो: बाबूश मोन्सेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2024 09:47 IST

३१ मे अखेर कामे पूर्ण होतील, अशी व्यक्त केली अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'स्मार्ट सिटी योजनेची कामे पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने मी माफी मागतो. ३१ मेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे,' असे महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे.

मंत्री मोन्सेरात म्हणाले की, 'स्मार्ट सिटीच्या कामांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे, हे आपल्याला माहीत आहे. या कामांबाबत लोकांच्या सहनशीलतेचे आपल्याला कौतुक आहे. मात्र, त्याचबरोबर ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत. कामे पूर्ण होण्यास उशीर होत असल्याने आपण माफी मागतो. ३१ मे या दिलेल्या डेडलाइनमध्ये कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.'

बाबूश म्हणाले की, 'पणजी जुने शहर आहे. नवीन शहर बनवायचे असल्यास कामे त्वरित होतात. मात्र, जुन्या शहराचा विकास करायचा असल्यास जुन्या गोष्टी बाजूला करून विकास करावा लागतो. त्यात वेळ जाणारच. त्यामुळे लोकांना सहन करावे लागते. स्मार्ट सिटीची कामे ही शहरवासीयांच्या फायद्याची तसेच शहराच्या विकासासाठी आहेत हे लोकांना ठाऊक आहे. पणजीवासीयांना या कामांचा त्रास होत असला तरी जेव्हा कामे पूर्ण होतील, तेव्हा ते हा सर्व त्रास विसरतील. कामे लवकर पूर्ण होण्यावर भर दिला जात आहे.'

दरम्यान, या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीच्या प्रदषणामळे नागरिकांना आरोग्याची समस्या जाणवत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन या धूळ प्रदूषणाची तसेच एकूणच स्मार्ट सिटीच्या कामांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मागील आठवड्यात पाहणी केली.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा