शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

सरकारकडून कोंडी, आमदार गावकर यांचा महामंडळास रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 19:34 IST

सरकारने गेले चौदा महिने नव्या योजना राबविण्यास सहकार्य केले नाही. महामंडळासाठी निधी व अधिकारी वर्गही पुरविला नाही असे सांगत सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी सरकारी वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला.

पणजी : सरकारने गेले चौदा महिने नव्या योजना राबविण्यास सहकार्य केले नाही. महामंडळासाठी निधी व अधिकारी वर्गही पुरविला नाही असे सांगत सांगे मतदारसंघाचे आमदार प्रसाद गावकर यांनी मंगळवारी सरकारी वन विकास महामंडळाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला. प्रशासन ठप्प झालेले आहे, अशीही टीका गावकर यांनी केली.

गावकर हे नाराज असल्याचा अंदाज सर्वानाच आला होता. गावकर हे सोमवारी राजभवनवर भाजपाच्या नव्या मंत्र्यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिले नव्हते. गावकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषद घेतली व आपण चौदा महिन्यानंतर आता महामंडळाच्या चेअरमनपचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. हे महामंडळ म्हणजे सरकारला कचरा पेटी वाटते. चार महिने महामंडळासाठी व्यवस्थापकीय संचालक सरकारने दिले नव्हते. आता अतिरिक्त ताबा असलेला अधिकारी दिला आहे. आपण काजू विकास व काजू बागायत पुनरुज्जीवनाची योजना सरकारकडे पाठवली होती. तिनवेळा सरकारने ती योजना फेटाळून लावली असे गावकर यांनी सांगितले.

वन खाते हे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे आहे असे नमूद करून गावकर म्हणाले की, सरकारकडून मला सहकार्य लाभत नसल्याने या पदावर राहण्यात अर्थ नाही. माझा सरकारला पाठींबा आहे, पण यापुढे जास्त विचार करावा लागेल. मला सांगेतील लोकांशी बोलावे लागेल. दरवेळी सांगेच्या आमदाराला फक्त सरकार स्थापन करण्यासाठी जवळ घेतले जाते. मग सांगेची उपेक्षा केली जाते. मला दिलेल्या वन विकास महामंडळाला सरकारने निधी देखील दिला नाही. 

हा उपाय कायमस्वरुपी नव्हे... मी सहा आमदारांच्या जी-सहा गटात सहभागी झालो होतो. आम्हा सहाहीजणांचा समान असा हेतू होता. सरकारबाबत कायमस्वरुपी तोडगा हवा अशी मागणी आम्ही भाजपाच्या निरीक्षकांसमोर ठेवली होती. सोमवारी मंत्रिमंडळात जे बदल झाले आहेत, तो कायमस्वरुपी तोडगा असे मला वाटत नाही, असे गावकर म्हणाले. मला सरकारने योग्य ते स्थान द्यायला हवे, कारण मी पर्रीकर सरकारला पाठींबा दिलेला आहे, असे पाचही आमदारांनी भाजप निरीक्षकांना सांगितले होते, असे गावकर म्हणाले. 

लोक खूप अस्वस्थ... सांगेच्या खाणपट्टय़ातील लोक खूप अस्वस्थ आहेत. प्रशासन ठप्प झालेय. खाणी सुरू होत नाहीत. त्यामुळे लोक अडचणीत आहेत व आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्हाला लोक खूप प्रश्न विचारतात. तुम्ही वन विकास महामंडळावर राहून काय केले असे लोकांनी मला यापुढे विचारायला नको म्हणून मी राजीनामा देतोय. कारण काही करण्यासाठी मला सरकारचा पाठींबाच मिळत नाही, असे गावकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा