शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

पणजीतील पराभव खूप वेदनादायी : उत्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:53 IST

पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाची झालेली हानी ही गोष्ट खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी निकालानंतर व्यक्त केली.

पणजी : पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपाची झालेली हानी ही गोष्ट खूप वेदनादायी आहे, अशी प्रतिक्रिया देशाचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी गुरुवारी निकालानंतर व्यक्त केली. उत्पल हे पणजीत भाजपच्या तिकिटाचे दावेदार होते. त्यांना डावलून भाजपने सिद्धार्थ कुंकळ्ळ्य़ेकर यांना तिकीट दिल्याने बरेच भाजप कार्यकर्ते व भाजपचे अनेक मतदार नाराज झाले होते.उत्पल यांनी तिकीट गृहित धरून पणजीत प्रचार कामही सुरू केले होते. तिकीट नाकारले तरी उत्पल यांनी पणजीत भाजपचा प्रचार केला होता पण त्यांचा सहभाग खूप मर्यादित होता. पणजीत मनोहर पर्रीकर कधीच पराभूत झाले नव्हते. त्यांच्या रुपानेच पणजीचा आमदार हा गोव्याचा चारवेळा मुख्यमंत्री बनला होता. दरम्यान, उत्पलने प्रतिक्रिया देताना अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दांचा दाखला दिला आहे. अंधार नाहीसा होईल व पुन्हा सूर्य उगवेल, कमळ फुलेल असे त्यांनी पणजी मतदारसंघाविषयी म्हटले आहे. कुणीच हताश होण्याचे कारण नाही. पणजीत पराभव झाला याचे मात्र दु:ख वाटते, असे उत्पल म्हणाले. केंद्रात पुन्हा मोदी सरकारचा विजय झाला व देशाचे भवितव्य सुरक्षित बनले. याविषयी सर्वाचेच अभिनंदन असे उत्पल म्हणाले.

टॅग्स :goaगोवाGoa Lok Sabha Election 2019गोवा लोकसभा निवडणूक निकाल 2019