शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पणजीतील हातगाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 20:33 IST

पणजी शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणी लागणारे भेळपुरी-ऑम्लेटपावचे हातगाडे मेरी इमॅक्युलेट चर्चच्या परिसरात एकाच ठिकाणी आणले आहेत.

पणजी : पणजी शहराचा केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्याने त्याअंतर्गत अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यामुळेच महानगरपालिकेने शहरातील ठिकठिकाणी लागणारे भेळपुरी-ऑम्लेटपावचे हातगाडे मेरी इमॅक्युलेट चर्चच्या परिसरात एकाच ठिकाणी आणले आहेत. ही तात्पुरती सोय असली तरी सध्याच्या ठिकाणी उद्यानाचे काम सुरू झाल्यानंतर हातगाडेवाल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे. महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील काही हातगाडे एकाच ठिकाणी आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यापैकी काही हातगाडे आयनॉक्सच्या मागील रस्त्यावर लावण्यात आले, तर दहा ते बारा हातगाडे चर्चच्या चौकातील उद्यानात लावण्यात आलेले आहेत. मनपाची ही तात्पुरती सोय असून, उद्यानाचे काम हाती घेतल्यास या हातगाडेवाल्यांना पुन्हा जागेसाठी मनपापुढे हात पसरावा लागणार आहे. स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आर्थिक विकास महामंडळाच्या (ईडीसी) माध्यमातून कामे सुरू आहेत. मनपानेही आपल्यापरीने कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने मनपाने नॅशनल थिएटरची जागाही आपल्या ताब्यात घेतली आहे, त्या जागेचाही विकास करण्याचा मनपाचा मनोदय असेल. सध्या शहरातील वाहतूक बेटांवरील मोकळ्या जागेत विविध प्राण्यांची धातूंची शिल्पे उभारून त्यांचे सौंदर्यीकरण सुरू झालेले आहे. आयनॉक्सच्या मागील बाजूस सुरुवातीला एक पाणीपुरीचा गाडा लागत होता. त्याच्यानंतर शहरातील बांदोडकर मार्ग, मार्केट परिसरातील काही भेळपुरीचे हातगाडे मनपाने हटवून ती आयनॉक्सच्या मागील रस्त्यावर लावण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे येथील गाडय़ांची संख्या पाचच्यावर गेली आहे. चर्च परिसरात मध्यरात्रीर्पयत वर्दळ!चर्चच्या परिसरातील उद्यानाच्या जागेत भेळपुरी, ऑम्लेट-पाव, बिर्याणी, थंडपेयांचे हातगाडे आहेत. त्यातील भेळपुरीवाले दहाच्या सुमारास बंद होतात. तर ऑम्लेट-पाव, बिर्याणी आणि थंडपेय वाल्यांचे गाडे रात्री उशिरार्पयत चालू असल्याने स्थानिकांबरोबरच पर्यटकही हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतात. त्यामुळे या परिसरात मध्यरात्रीर्पयत लोकांची वर्दळ सुरू असते. पाहुया..पुढे काय ते!दहा वर्षापूर्वी येथे एकच पाणीपुरीचा गाडा लागत होता, आत्या पर्यटक म्हणून येणा-या ग्राहकांमुळे चांगला व्यवसाय होत होता. पण आता तेवढे पर्यटक येत नसून, त्यांना विविध पदार्थ उपलब्ध होत असल्याने ते त्या-त्या गाडय़ाकडे जातात. आमचे ठरलेले ग्राहक येतच असतात, असे येथील पाणी पुरी व भेळपुरी विक्री करणा-या कुमारबंधूंनी सांगितले. सर्वाना एकत्र आणले तरी उद्यान होणार असे सांगितले जात असल्याने पुन्हा जागेचा प्रश्न उपस्थित होणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या त्यांच्या मतासारखेच येथील इतर गाडेधारकांचे मत आहे. 

टॅग्स :goaगोवा