शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘मधुमेहाशी युद्ध पुकारा व्यायामाच्या जोरावर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:38 IST

मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिलं आहे.भारत हा लोकसंख्येप्रमाणेच मधुमेहींच्या बाबतीतही चीननंतर दुसऱ्या क्रमांकांचा देश ठरला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित किमान अर्धा तास तरी व्यायाम हा केलाच पाहिजे.

पणजी - मधुमेहाच्या (डायबीटीस) विळख्यातून स्वत:ला वाचविण्यासाठी व्यायामाच्या आधाराने मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आवाहन गोव्यातील प्रसिद्ध डायबेटीस तज्ज्ञ डॉक्टर तेजस कामा यांनी दिलं आहे. देशात पाच वर्षात मधुमेहींची संख्या दहा पटीने वाढली आहे. 

मेडिकल असोसिएशनने बारदेशतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. कामत यांनी मधुमेहासंबंधी सविस्तर माहिती दिली. भारत हा लोकसंख्येप्रमाणेच मधुमेहींच्या बाबतीतही चीननंतर दुसऱ्या क्रमांकांचा देश ठरला आहे. त्यामुळे मधुमेहाविरुद्ध युद्ध पुकारण्याची ही वेळ आहे. पाच वर्षात दहापटीने रुग्णांची संख्या वाढणे हे काही भल्याचे संकेत नाहीत. गोव्यातही परिस्थिती वेगळी नाही. पूर्वी केवळ प्रौढवयात किंवा चाळीसी पार केल्यानंतर मधुमेह आढळून यायचा. आता तरुणांनाही मधुमेह होत असल्याचे आढळून येत आहे. शिवाय हा अनुवांशिक रोग बनल्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. केवळ मधुमेह झालेल्यांनी नव्हे तर न झालेल्यानींही मधुमेहाविरुद्धच्या युद्धात पूर्ण ताकदीनिशी उतरायची गरज आहे. केवळ प्रौढांनी नव्हे तर तरुणांनी व त्या खालील मुलांनीही  सतर्क होण्याची ही वेळ आहे अशा शब्दात डॉ कामत यांनी परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. 

मधुमेह का होतो व कुणाला होऊ शकतो हे आता जवळ जवळ सर्वांना ठाऊक आहे. साखरेचे व तेलकट खाणे ही कारणे असली तरी मधूमेह हा स्वादुपिंड निकामी होण्याने किंवा ते कमजोर बनल्याने होत आहे हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे स्वादुपिंड चांगले ठेवण्यासाठी जे काही करावयाला हवे ते सर्व करण्याची गरज आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे नियमित किमान अर्धा तास तरी व्यायाम हा केलाच पाहिजे. त्यानंतर आहार व इतर गोष्टी येतात असे ते म्हणाले. एकदा का स्वादुपिंड कमजोर झाले की नंतर इन्सुलीन पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे मधुमेह होतो. मधुमेहामुळे मेंदु, डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड आदी अवयवांचे विकार होण्याची अधिक शक्यता असते असे त्यांनी सांगितले. पत्रकारांसाठी मधुमेहासंबंधी तपासणी करण्याची इच्छा असल्याचे आर जे रुग्णालयाचे युरोसर्जन डॉ वर्धन भोबे यांनी यावेळी सांगितले व केव्हाही त्यासाठी काम करण्याची तयारी दर्शविली.

टॅग्स :goaगोवाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य