शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

नियोजनाचा अभाव पर्यटनावर परिणामकारक - माजी पर्यटन मंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 14:23 IST

मागील दोन वर्षांपासून पर्यटन खात्याकडे व्यवसायाच्या वृद्धीसाठी नियोजनाचा अभाव असल्याने या वर्षी पर्यटकांचे प्रमाण घटण्यास कारणीभूत ठरले असल्याचे मत गोव्याच्या दोन माजी पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. 

ठळक मुद्देनवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या किमान ५० टक्क्यांनी घटल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.हंगामाच्या काळात पर्यटकांनी पाठ फिरवली तर पुढील हंगाम  कशाप्रकारे काढावा असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. मासळीतील फॉर्मेलिनचा प्रश्न हाताळून त्यावर तोडगा काढणे सरकारला न जमल्यानेही व्यवसायावर परिणाम झाल्याची माहिती दिली.

म्हापसा - मागील दोन वर्षांपासून पर्यटन खात्याकडे व्यवसायाच्या वृद्धीसाठी नियोजनाचा अभाव असल्याने या वर्षी पर्यटकांचे प्रमाण घटण्यास कारणीभूत ठरले असल्याचे मत गोव्याच्या दोन माजी पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. या वर्षी नाताळ तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या किमान ५० टक्क्यांनी घटल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन हंगामाच्या काळात पर्यटकांनी पाठ फिरवली तर पुढील हंगाम  कशाप्रकारे काढावा असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. केरळ राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर गोव्यात येणारे पर्यटक वाढतील या असलेल्या अपेक्षेचा भंग झाल्याचे घटलेल्या संख्येतून दिसून आलेले आहे.

माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांना घटलेल्या पर्यटकांच्या संख्येसंबंधी विचारले असताना खात्यात नियोजनाचा अभाव संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरल्याचे ते म्हणाले. राज्यात सर्वात जास्त प्रमाणावर महसूल प्राप्त करुन देणाऱ्या या उद्योगाकडे नियोजनाच्या अभावी मागील दोन वर्षांपासून दुर्लक्ष केले गेल्याने परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

विदेशी पर्यटकांना घेवून येणाऱ्या चाटर्ड विमानांचे प्रमाण किमान ४० टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. गोवा हा ब्रँड कायम ठेवताना त्यातून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नव्या नव्या ठिकाणी रोड शोचे आयोजन होणे गरजेचे असते. त्यावर सुद्धा दुर्लक्ष केले गेल्याने परिणाम जाणवल्याची माहिती सुद्धा दिली. रोड शोचे व्यवस्थित आयोजन केल्यास संख्या नक्कीच वाढणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

विद्यमान आमदार तथा माजी पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी नियोजनाबरोबर फॉर्मेलिन तसेच इतक वादग्रस्त प्रश्न हाताळण्यास सरकारला आलेले अपयश व्यवसायाच्या दृष्टीने परिणामकारक ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. येणारे पर्यटक पर्यटनासोबत मासळीच्या निमित्ताने येत असतात; पण मासळीतील फॉर्मेलिनचा प्रश्न हाताळून त्यावर तोडगा काढणे सरकारला न जमल्यानेही व्यवसायावर परिणाम झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

किनाऱ्यांवर साचलेल्या कचऱ्याचे परिणाम विदेशी पर्यटकांचे प्रमाण कमी होण्यास आणखीन एक कारण ठरल्याचे हळर्णकर म्हणाले. मागील वर्षभरात पर्यटकांना झालेली मारहाण, त्यांच्यावरील अत्याचार, त्यांची वाहने अडवून केली जाणाऱ्या सतावणुकीतून यातून गोव्याचे नावही काही प्रमाणावर बदनाम झाल्याने पर्यटकांनी पाठ फिरवल्याची माहिती यावेळी बोलताना दिली. गोव्यात येणाºया पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक केली जाते. पर्यटनस्थळावर प्रवेश केल्यापासून ते तेथून पुन्हा माघारी जाईपर्यंत प्रत्येक ठिकाणी लुबाडणूक केली जात असल्याने येणाऱ्या पर्यटकांवर परिणामकारक ठरल्याचे हळर्णकर म्हणाले. आणलेल्या वाहनाने पार्किंग करण्यापासून ते विविध प्रकारच्या खाद्य तसेच पेयावर लावले जाणारे भरमसाठ दर पर्यटकांवर परिणामकारक ठरले आहेत. विद्यमान परिस्थिती पाहता या व्यवसायाला पुन्हा मार्गी लावण्यासाठी नियोजनावर भर देणे तसेच इतर अनेक उपाय योजना हाती घेण्याची गरज या दोन्ही माजी मंत्र्यांनी बोलताना व्यक्त केली. योग्य वेळी उपाय योजना न केल्यास ते हानीकारक ठरण्याची भीती सुद्धा व्यक्त केली आहे. 

टॅग्स :goaगोवा