शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

...तर भाजप सरकारविरुद्धही आंदोलन करा; विनोद तावडेंचा अभाविप कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:01 IST

पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे,' असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी दिला. पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने निमंत्रित असलेले तावडे हे अभाविपचे माजी प्रदेश मंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, 'अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातन आणि संघर्षातन उभे राहिले आहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलने इतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याची गरज असेल तर ते परिषदेने करावेच सत्तेत कोणते सरकार आहे किंवा कोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन करा. कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढले आहे, असे तावडे यांनी सांगितले.

तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थी परिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच स्वत: प्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतः आंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशात आरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, दत्ता नाईक, निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अॅड. प्रवीण फळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभागप्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणे झाली.

भाजपचे डिपॉझिट जप्त होते तेव्हा....

गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे राहिले असून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे. जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती, त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परिषदेचा झेंडा फडकत होता, असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. सावईकर, शिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही परिषदेच्या आंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले.

टॅग्स :goaगोवाVinod Tawdeविनोद तावडे