शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर भाजप सरकारविरुद्धही आंदोलन करा; विनोद तावडेंचा अभाविप कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:01 IST

पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे,' असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी दिला. पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने निमंत्रित असलेले तावडे हे अभाविपचे माजी प्रदेश मंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, 'अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातन आणि संघर्षातन उभे राहिले आहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलने इतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याची गरज असेल तर ते परिषदेने करावेच सत्तेत कोणते सरकार आहे किंवा कोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन करा. कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढले आहे, असे तावडे यांनी सांगितले.

तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थी परिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच स्वत: प्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतः आंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशात आरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, दत्ता नाईक, निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अॅड. प्रवीण फळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभागप्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणे झाली.

भाजपचे डिपॉझिट जप्त होते तेव्हा....

गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे राहिले असून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे. जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती, त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परिषदेचा झेंडा फडकत होता, असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. सावईकर, शिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही परिषदेच्या आंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले.

टॅग्स :goaगोवाVinod Tawdeविनोद तावडे