शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

...तर भाजप सरकारविरुद्धही आंदोलन करा; विनोद तावडेंचा अभाविप कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:01 IST

पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे,' असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी दिला. पणजीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. 

अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे या नात्याने निमंत्रित असलेले तावडे हे अभाविपचे माजी प्रदेश मंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले, 'अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातन आणि संघर्षातन उभे राहिले आहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलने इतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याची गरज असेल तर ते परिषदेने करावेच सत्तेत कोणते सरकार आहे किंवा कोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन करा. कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढले आहे, असे तावडे यांनी सांगितले.

तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थी परिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच स्वत: प्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतः आंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळून पाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशात आरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, दत्ता नाईक, निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अॅड. प्रवीण फळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभागप्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणे झाली.

भाजपचे डिपॉझिट जप्त होते तेव्हा....

गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे राहिले असून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे. जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत होती, त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परिषदेचा झेंडा फडकत होता, असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. सावईकर, शिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही परिषदेच्या आंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले.

टॅग्स :goaगोवाVinod Tawdeविनोद तावडे