शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

गोवा कर्जाच्या खाईत, विरोधी आमदारांची टीका

By admin | Updated: August 4, 2016 19:42 IST

सरकार सातत्याने मोठय़ा प्रमाणात कज्रे घेत आहे. दुस:याबाजूने जीवनाच्या सर्वच क्षेत्रंमध्ये सरकारने करवाढ व शूल्कवाढ करून सामान्य माणसाला त्रस्त करून ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ४ : सरकार सातत्याने मोठय़ा प्रमाणात कज्रे घेत आहे. दुस:याबाजूने जीवनाच्या सर्वच क्षेत्रंमध्ये सरकारने करवाढ व शूल्कवाढ करून सामान्य माणसाला त्रस्त करून ठेवले आहे. पाणी व वीज बिले महागल्याचे मोठे चटके लोकांना सहन करावे लागत आहेत, अशी जोरदार टीका विरोधी आमदारांनी गुरुवारी विधानसभेत केली.

अर्थ व खाण खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी बोलताना काँग्रेसचे आमदार विश्वजित राणो म्हणाले, की खनिज खाण बंदीमुळे गोवा राज्य कर्जाच्या सापळ्य़ात अडकले दावा चुकीचा आहे. उलट बंदीच्याच काळात सरकारचे महसुली उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारी दाखवून देते. सरकार मोठय़ा प्रमाणात कज्रे घेते व दुस:याबाजूने आपण सगळे काही लोकांना मोफत देत असल्याचा आभास निर्माण करते हे खरे संकट आहे. सरकारने रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे. पाणी व वीज बिले सरकारने अत्यंत वाढवून ठेवली आहेत. आम्ही ग्रामीण भागात फिरतो तेव्हा लोक या दरवाढीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करतात. गरीब लोकांकडे पाणी व वीज बिले भरण्याची ऐपत नाही हे सरकारने लक्षात घ्यावे.

विश्वजित म्हणाले, की सरकार आर्थिक सव्रेक्षणातून जी आकडेवारी देते त्याविषयी संशय येतो. केंद्र सरकारचा आर्थिक सव्रेक्षण अहवाल हा स्पष्ट व पारदर्शक आहे. या उलट गोवा सरकारच्या अहवालातील आकडेवारी विश्वासार्ह नाही. सरकार एकाबाजूने एलईडी बल्ब मोफत देते व दुस:याबाजूने गेल्या 29 जुलै रोजी अधिसूचना काढून वीज बिल वाढविण्यात आले आहे. म्हणजेच सरकार सामान्य माणसाला काहीच मोफत देत नाही.

अपक्ष आमदार नरेश सावळ यांनीही सरकारवर कर्जाच्या विषयावरून जोरदार हल्ला चढवला. एखाद्या व्यक्तीच्या वडिलांची जर पाच कोटींचे कर्ज घेण्याची ऐपत असेल तर ती व्यक्ती पाच कोटींचे कर्ज घेऊन त्याची परतफेड करण्याचे ओङो मुलांच्या व पत्नीच्या डोक्यावर ठेवत नाही. सरकारने ही गोष्ट लक्षात ठेवावी व गोव्यातील नव्या पिढीच्या डोक्यावर प्रचंड कर्जाचा भार ठेवू नये. कर्ज घेण्यास सरकार पात्र आहे म्हणून प्रचंड कर्ज घेऊ नका. गोव्यात जन्मणारे प्रत्येक मुल काही हजार रुपयांचे कजर्च घेऊन जन्मते. कारण 2012 सालार्पयत 6 हजार 80 रुपयांचे कर्ज होते तर आता कर्जाचे प्रमाण 18 हजार कोटी झाले आहे.