शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गोवा कर्जाच्या खाईत, विरोधी आमदारांची टीका

By admin | Updated: August 4, 2016 19:42 IST

सरकार सातत्याने मोठय़ा प्रमाणात कज्रे घेत आहे. दुस:याबाजूने जीवनाच्या सर्वच क्षेत्रंमध्ये सरकारने करवाढ व शूल्कवाढ करून सामान्य माणसाला त्रस्त करून ठेवले आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ४ : सरकार सातत्याने मोठय़ा प्रमाणात कज्रे घेत आहे. दुस:याबाजूने जीवनाच्या सर्वच क्षेत्रंमध्ये सरकारने करवाढ व शूल्कवाढ करून सामान्य माणसाला त्रस्त करून ठेवले आहे. पाणी व वीज बिले महागल्याचे मोठे चटके लोकांना सहन करावे लागत आहेत, अशी जोरदार टीका विरोधी आमदारांनी गुरुवारी विधानसभेत केली.

अर्थ व खाण खात्यांच्या अनुदानित मागण्यांवरील चर्चेवेळी बोलताना काँग्रेसचे आमदार विश्वजित राणो म्हणाले, की खनिज खाण बंदीमुळे गोवा राज्य कर्जाच्या सापळ्य़ात अडकले दावा चुकीचा आहे. उलट बंदीच्याच काळात सरकारचे महसुली उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारी दाखवून देते. सरकार मोठय़ा प्रमाणात कज्रे घेते व दुस:याबाजूने आपण सगळे काही लोकांना मोफत देत असल्याचा आभास निर्माण करते हे खरे संकट आहे. सरकारने रोजगार निर्मिती करण्याची गरज आहे. पाणी व वीज बिले सरकारने अत्यंत वाढवून ठेवली आहेत. आम्ही ग्रामीण भागात फिरतो तेव्हा लोक या दरवाढीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करतात. गरीब लोकांकडे पाणी व वीज बिले भरण्याची ऐपत नाही हे सरकारने लक्षात घ्यावे.

विश्वजित म्हणाले, की सरकार आर्थिक सव्रेक्षणातून जी आकडेवारी देते त्याविषयी संशय येतो. केंद्र सरकारचा आर्थिक सव्रेक्षण अहवाल हा स्पष्ट व पारदर्शक आहे. या उलट गोवा सरकारच्या अहवालातील आकडेवारी विश्वासार्ह नाही. सरकार एकाबाजूने एलईडी बल्ब मोफत देते व दुस:याबाजूने गेल्या 29 जुलै रोजी अधिसूचना काढून वीज बिल वाढविण्यात आले आहे. म्हणजेच सरकार सामान्य माणसाला काहीच मोफत देत नाही.

अपक्ष आमदार नरेश सावळ यांनीही सरकारवर कर्जाच्या विषयावरून जोरदार हल्ला चढवला. एखाद्या व्यक्तीच्या वडिलांची जर पाच कोटींचे कर्ज घेण्याची ऐपत असेल तर ती व्यक्ती पाच कोटींचे कर्ज घेऊन त्याची परतफेड करण्याचे ओङो मुलांच्या व पत्नीच्या डोक्यावर ठेवत नाही. सरकारने ही गोष्ट लक्षात ठेवावी व गोव्यातील नव्या पिढीच्या डोक्यावर प्रचंड कर्जाचा भार ठेवू नये. कर्ज घेण्यास सरकार पात्र आहे म्हणून प्रचंड कर्ज घेऊ नका. गोव्यात जन्मणारे प्रत्येक मुल काही हजार रुपयांचे कजर्च घेऊन जन्मते. कारण 2012 सालार्पयत 6 हजार 80 रुपयांचे कर्ज होते तर आता कर्जाचे प्रमाण 18 हजार कोटी झाले आहे.