शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 16:30 IST

गोव्यातील सरकार सोहळ्यातच मग्न

मडगाव: सांताक्रुझ येथे झालेल्या गँगवोरात एकाचा खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी गोवा सरकारवर टीकेचा झोड उठविला असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोहोचल्याचा आरोप केला आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत  यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्थव्यवस्था कोसळल्याने सामान्य माणसाचे कंबरडे आधीच मोडलेले आहे तशातच आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे असे म्हटले आहे.दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्ड पक्षानेही सरकारवर टीका करताना या सरकारला गोवा दुसरा उत्तर प्रदेश बनवायचा आहे का असा सवाल या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कामत म्हणाले, एका बाजूने गोवेकरांची सुरक्षा धोक्यात असताना दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने गोव्यातील भाजप सरकार सोहळे साजरे करण्यात मग्न आहे. भाजपाने आता या ' व्हर्चुअल जगातून'  बाहेर येऊन गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गोव्यात वाढणारी गुन्हेगारी, ड्रग व्यवसाय, वेश्या व्यवसाय, खून याबद्दल आम्ही सरकारला वारंवार सतर्क करण्याचे काम केले मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही वेळ आल्याचे कामत म्हणाले.

दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्या ट्विट मध्ये सरकारला लक्ष्य करताना गँगवोर, सुपारी हत्या, खंडणी असे प्रकार गोव्यात हळूहळू वाढू लागले आहेत. गोव्याला मुख्य धारेत आणायचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा हाच प्रयत्न का असा सवाल करीत गोव्याला दुसरा उत्तर प्रदेश बनवायचा आहे का असे विचारले आहे. आम्ही ते होऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत