शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 16:30 IST

गोव्यातील सरकार सोहळ्यातच मग्न

मडगाव: सांताक्रुझ येथे झालेल्या गँगवोरात एकाचा खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी गोवा सरकारवर टीकेचा झोड उठविला असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला पोहोचल्याचा आरोप केला आहे.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत  यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्थव्यवस्था कोसळल्याने सामान्य माणसाचे कंबरडे आधीच मोडलेले आहे तशातच आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे असे म्हटले आहे.दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्ड पक्षानेही सरकारवर टीका करताना या सरकारला गोवा दुसरा उत्तर प्रदेश बनवायचा आहे का असा सवाल या पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना कामत म्हणाले, एका बाजूने गोवेकरांची सुरक्षा धोक्यात असताना दुर्दैवाने दुसऱ्या बाजूने गोव्यातील भाजप सरकार सोहळे साजरे करण्यात मग्न आहे. भाजपाने आता या ' व्हर्चुअल जगातून'  बाहेर येऊन गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गोव्यात वाढणारी गुन्हेगारी, ड्रग व्यवसाय, वेश्या व्यवसाय, खून याबद्दल आम्ही सरकारला वारंवार सतर्क करण्याचे काम केले मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही वेळ आल्याचे कामत म्हणाले.

दुसऱ्या बाजूने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आपल्या ट्विट मध्ये सरकारला लक्ष्य करताना गँगवोर, सुपारी हत्या, खंडणी असे प्रकार गोव्यात हळूहळू वाढू लागले आहेत. गोव्याला मुख्य धारेत आणायचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा हाच प्रयत्न का असा सवाल करीत गोव्याला दुसरा उत्तर प्रदेश बनवायचा आहे का असे विचारले आहे. आम्ही ते होऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत