शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 12:34 IST

संपादकीय: आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच.

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाच भाजपकडून राज्यसभेचे तिकीट राज्यसभा निवडणुकीवेळी दिले जाईल हे स्पष्टच होते. तानावडे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. तानावडे यांचे केवळ भाजपच्याच आमदारांशी चांगले संबंध आहेत असे नव्हे, तर अन्य पक्षीय आमदारांशीदेखील आपुलकीचे नाते आहे. अनेकांना ठाऊक नसेल, पण तानावडे ९०च्या दशकात पीर्ण ग्रामपंचायतीचे पंच होते. कमी वयात ते उपसरपंचही झाले होते. त्यांना आता चक्क राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळत आहे, ही भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. मात्र गोव्यातील सर्व सातही विरोधी आमदारांनी मिळून काल जो निर्णय घेतला, त्यातून विरोधकांमधील हतबलता दिसून आली. 

आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच. प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची नसते हे येथे लक्षात घ्यावे लागेल. काही लढाया या आपले फायटिंग स्पिरीट दाखवून देण्यासाठी व सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम व फूट निर्माण करण्यासाठी लढायच्या असतात. आम्ही राज्यसभेसाठी उमेदवार उभा करणार नाही, असे काल सातही विरोधी आमदारांनी जाहीर केले. ही कसली पचपचीत रणनीती? एरव्ही विजय सरदेसाई वगैरे आमदार स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांना आपला राजकीय आदर्श मानतात. मात्र पर्रीकर यांचे फायटिंग स्पिरीट कोणत्याच विरोधी आमदाराने शिकून घेतले नाही. पर्रीकर जेव्हा भाजपचे नेते होते तेव्हा भाजपकडे कमी आमदार असतानादेखील भाजपने राज्यसभा निवडणूक लढवली होती. 

वीस वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार हे स्पष्ट होते, पण राज्यसभा निवडणुकीवेळी पर्रीकर यांनी संजीव देसाई यांना उमेदवार म्हणून उभे केले होते. पराभव अटळ होता, पण पक्षनिष्ठा व पक्षाचा आदेश महत्त्वाचा असे मानून देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. स्वर्गीय शांताराम नाईक यांचे त्यावेळी अनेकांशी चांगले संबंध होते. नाईक हेच खासदार होतील हे अगदी स्पष्ट होते, पण लढाऊ बाणा दाखवत भाजपने संजीव देसाई यांना रिंगणात उतरवले होते. यामागील कारण असे की विरोधकांनी उमेदवार उभा केला की विरोधकांचे कार्यकर्ते, समर्थक यांच्यातही उत्साह तयार होत असतो. त्यांच्यातील स्पिरीट कायम राखण्यासाठी नेत्यांनी कायम आश्वासक चित्र उभे करायचे असते. 

सत्ताधाऱ्यांमधील काहीजणांची मते फुटतील व आमच्या उमेदवाराला मते मिळतील असे चित्र युरी आलेमाव, विजय, वेन्झी वगैरे आमदारांनी मिळून तयार करता आले असते. भाजपला आम्ही मोकळे रान देत नाही, आम्ही लढणार आहोत, प्रसंगी पराभव झाला तरी हरकत नाही, अशी भूमिका सातही आमदार मिळून घेऊ शकले असते मात्र आम्ही निवडणूकच लढवत नाही अशी पचपचीत भूमिका घेऊन विरोधकांनी अगोदरच शस्त्रे खाली ठेवली आहेत. कदाचित भाजपची मते फुटण्याऐवजी आपल्याच सातजणांपैकी एक-दोघांची मते फुटतील, अशी भीती वाटली नाही ना?

जो आमदार आपण वेगळे आहोत, असा दावा करतो, त्या आपने तरी भाजपला रान मोकळे द्यायची गरज नव्हती. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होते त्या काळातदेखील मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर निवडणुका लढवत होतेच. त्यामुळेच त्या नेत्यांबाबत लोकांमध्ये एका टप्प्यावर विश्वास निर्माण झाला. आपले डिपॉझिट जाणार व त्यामुळे आपल्याला निवडणूकच नको, अशी भूमिका पर्रीकर यांनी किंवा भाजपनेही कधी घेतली नव्हती. मनोहर पर्रीकर तर १९९६ साली लोकसभा निवडणूक लढले होते. हरणार हे ठाऊक असूनही ते लढले होते. पराभव झाल्यानंतर पर्रीकर सांगायचे की हरलो तरी आमची मतांची टक्केवारी वाढली आहे. कार्यकर्त्यांना चार्ज ठेवण्यासाठी, त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कायम लढायचे असते. पळपुटी भूमिका घ्यायची नसते. सातही आमदारांनी काल नांगी टाकली हे धक्कादायक आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण