शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 12:34 IST

संपादकीय: आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच.

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाच भाजपकडून राज्यसभेचे तिकीट राज्यसभा निवडणुकीवेळी दिले जाईल हे स्पष्टच होते. तानावडे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. तानावडे यांचे केवळ भाजपच्याच आमदारांशी चांगले संबंध आहेत असे नव्हे, तर अन्य पक्षीय आमदारांशीदेखील आपुलकीचे नाते आहे. अनेकांना ठाऊक नसेल, पण तानावडे ९०च्या दशकात पीर्ण ग्रामपंचायतीचे पंच होते. कमी वयात ते उपसरपंचही झाले होते. त्यांना आता चक्क राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळत आहे, ही भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. मात्र गोव्यातील सर्व सातही विरोधी आमदारांनी मिळून काल जो निर्णय घेतला, त्यातून विरोधकांमधील हतबलता दिसून आली. 

आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच. प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची नसते हे येथे लक्षात घ्यावे लागेल. काही लढाया या आपले फायटिंग स्पिरीट दाखवून देण्यासाठी व सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम व फूट निर्माण करण्यासाठी लढायच्या असतात. आम्ही राज्यसभेसाठी उमेदवार उभा करणार नाही, असे काल सातही विरोधी आमदारांनी जाहीर केले. ही कसली पचपचीत रणनीती? एरव्ही विजय सरदेसाई वगैरे आमदार स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांना आपला राजकीय आदर्श मानतात. मात्र पर्रीकर यांचे फायटिंग स्पिरीट कोणत्याच विरोधी आमदाराने शिकून घेतले नाही. पर्रीकर जेव्हा भाजपचे नेते होते तेव्हा भाजपकडे कमी आमदार असतानादेखील भाजपने राज्यसभा निवडणूक लढवली होती. 

वीस वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार हे स्पष्ट होते, पण राज्यसभा निवडणुकीवेळी पर्रीकर यांनी संजीव देसाई यांना उमेदवार म्हणून उभे केले होते. पराभव अटळ होता, पण पक्षनिष्ठा व पक्षाचा आदेश महत्त्वाचा असे मानून देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. स्वर्गीय शांताराम नाईक यांचे त्यावेळी अनेकांशी चांगले संबंध होते. नाईक हेच खासदार होतील हे अगदी स्पष्ट होते, पण लढाऊ बाणा दाखवत भाजपने संजीव देसाई यांना रिंगणात उतरवले होते. यामागील कारण असे की विरोधकांनी उमेदवार उभा केला की विरोधकांचे कार्यकर्ते, समर्थक यांच्यातही उत्साह तयार होत असतो. त्यांच्यातील स्पिरीट कायम राखण्यासाठी नेत्यांनी कायम आश्वासक चित्र उभे करायचे असते. 

सत्ताधाऱ्यांमधील काहीजणांची मते फुटतील व आमच्या उमेदवाराला मते मिळतील असे चित्र युरी आलेमाव, विजय, वेन्झी वगैरे आमदारांनी मिळून तयार करता आले असते. भाजपला आम्ही मोकळे रान देत नाही, आम्ही लढणार आहोत, प्रसंगी पराभव झाला तरी हरकत नाही, अशी भूमिका सातही आमदार मिळून घेऊ शकले असते मात्र आम्ही निवडणूकच लढवत नाही अशी पचपचीत भूमिका घेऊन विरोधकांनी अगोदरच शस्त्रे खाली ठेवली आहेत. कदाचित भाजपची मते फुटण्याऐवजी आपल्याच सातजणांपैकी एक-दोघांची मते फुटतील, अशी भीती वाटली नाही ना?

जो आमदार आपण वेगळे आहोत, असा दावा करतो, त्या आपने तरी भाजपला रान मोकळे द्यायची गरज नव्हती. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होते त्या काळातदेखील मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर निवडणुका लढवत होतेच. त्यामुळेच त्या नेत्यांबाबत लोकांमध्ये एका टप्प्यावर विश्वास निर्माण झाला. आपले डिपॉझिट जाणार व त्यामुळे आपल्याला निवडणूकच नको, अशी भूमिका पर्रीकर यांनी किंवा भाजपनेही कधी घेतली नव्हती. मनोहर पर्रीकर तर १९९६ साली लोकसभा निवडणूक लढले होते. हरणार हे ठाऊक असूनही ते लढले होते. पराभव झाल्यानंतर पर्रीकर सांगायचे की हरलो तरी आमची मतांची टक्केवारी वाढली आहे. कार्यकर्त्यांना चार्ज ठेवण्यासाठी, त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कायम लढायचे असते. पळपुटी भूमिका घ्यायची नसते. सातही आमदारांनी काल नांगी टाकली हे धक्कादायक आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण