शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक फ्लॉप वागले; ‘त्या’ निर्णयातून विरोधकांमधील हतबलता दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 12:34 IST

संपादकीय: आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच.

प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनाच भाजपकडून राज्यसभेचे तिकीट राज्यसभा निवडणुकीवेळी दिले जाईल हे स्पष्टच होते. तानावडे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. तानावडे यांचे केवळ भाजपच्याच आमदारांशी चांगले संबंध आहेत असे नव्हे, तर अन्य पक्षीय आमदारांशीदेखील आपुलकीचे नाते आहे. अनेकांना ठाऊक नसेल, पण तानावडे ९०च्या दशकात पीर्ण ग्रामपंचायतीचे पंच होते. कमी वयात ते उपसरपंचही झाले होते. त्यांना आता चक्क राज्यसभा खासदार होण्याची संधी मिळत आहे, ही भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. मात्र गोव्यातील सर्व सातही विरोधी आमदारांनी मिळून काल जो निर्णय घेतला, त्यातून विरोधकांमधील हतबलता दिसून आली. 

आपण विधानसभेत पाठविलेले सगळेच विरोधी आमदार असाहाय्य, निराश व निराधार आहेत की काय अशी शंका सामान्य गोंयकारांच्या मनात येईलच. प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायची नसते हे येथे लक्षात घ्यावे लागेल. काही लढाया या आपले फायटिंग स्पिरीट दाखवून देण्यासाठी व सत्ताधाऱ्यांमध्ये संभ्रम व फूट निर्माण करण्यासाठी लढायच्या असतात. आम्ही राज्यसभेसाठी उमेदवार उभा करणार नाही, असे काल सातही विरोधी आमदारांनी जाहीर केले. ही कसली पचपचीत रणनीती? एरव्ही विजय सरदेसाई वगैरे आमदार स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांना आपला राजकीय आदर्श मानतात. मात्र पर्रीकर यांचे फायटिंग स्पिरीट कोणत्याच विरोधी आमदाराने शिकून घेतले नाही. पर्रीकर जेव्हा भाजपचे नेते होते तेव्हा भाजपकडे कमी आमदार असतानादेखील भाजपने राज्यसभा निवडणूक लढवली होती. 

वीस वर्षांपूर्वी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार हे स्पष्ट होते, पण राज्यसभा निवडणुकीवेळी पर्रीकर यांनी संजीव देसाई यांना उमेदवार म्हणून उभे केले होते. पराभव अटळ होता, पण पक्षनिष्ठा व पक्षाचा आदेश महत्त्वाचा असे मानून देसाई यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. स्वर्गीय शांताराम नाईक यांचे त्यावेळी अनेकांशी चांगले संबंध होते. नाईक हेच खासदार होतील हे अगदी स्पष्ट होते, पण लढाऊ बाणा दाखवत भाजपने संजीव देसाई यांना रिंगणात उतरवले होते. यामागील कारण असे की विरोधकांनी उमेदवार उभा केला की विरोधकांचे कार्यकर्ते, समर्थक यांच्यातही उत्साह तयार होत असतो. त्यांच्यातील स्पिरीट कायम राखण्यासाठी नेत्यांनी कायम आश्वासक चित्र उभे करायचे असते. 

सत्ताधाऱ्यांमधील काहीजणांची मते फुटतील व आमच्या उमेदवाराला मते मिळतील असे चित्र युरी आलेमाव, विजय, वेन्झी वगैरे आमदारांनी मिळून तयार करता आले असते. भाजपला आम्ही मोकळे रान देत नाही, आम्ही लढणार आहोत, प्रसंगी पराभव झाला तरी हरकत नाही, अशी भूमिका सातही आमदार मिळून घेऊ शकले असते मात्र आम्ही निवडणूकच लढवत नाही अशी पचपचीत भूमिका घेऊन विरोधकांनी अगोदरच शस्त्रे खाली ठेवली आहेत. कदाचित भाजपची मते फुटण्याऐवजी आपल्याच सातजणांपैकी एक-दोघांची मते फुटतील, अशी भीती वाटली नाही ना?

जो आमदार आपण वेगळे आहोत, असा दावा करतो, त्या आपने तरी भाजपला रान मोकळे द्यायची गरज नव्हती. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत होते त्या काळातदेखील मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर निवडणुका लढवत होतेच. त्यामुळेच त्या नेत्यांबाबत लोकांमध्ये एका टप्प्यावर विश्वास निर्माण झाला. आपले डिपॉझिट जाणार व त्यामुळे आपल्याला निवडणूकच नको, अशी भूमिका पर्रीकर यांनी किंवा भाजपनेही कधी घेतली नव्हती. मनोहर पर्रीकर तर १९९६ साली लोकसभा निवडणूक लढले होते. हरणार हे ठाऊक असूनही ते लढले होते. पराभव झाल्यानंतर पर्रीकर सांगायचे की हरलो तरी आमची मतांची टक्केवारी वाढली आहे. कार्यकर्त्यांना चार्ज ठेवण्यासाठी, त्यांचा हुरूप वाढविण्यासाठी कायम लढायचे असते. पळपुटी भूमिका घ्यायची नसते. सातही आमदारांनी काल नांगी टाकली हे धक्कादायक आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण