शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मजबूत पक्षसंघटनाच देईल भाजपला टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 10:53 IST

आजच्या परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारणी मुद्दा महत्त्वाचा ठरलेला असून, सारा देश राममय झालेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी भाजप अतिशय मजबूत स्थितीत सज्ज असून, उमेदवार कोण हा मुद्दाच नसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने देशाला मोठी उंची तसेच सुरक्षितता व विकास या बाबतीत केलेली कामगिरी हाच मुद्दा आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपला विक्रमी मते मिळतील अशी भाजपला अपेक्षा आहे. असे असले तरीही आरजी, काँग्रेस व इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गृहीत धरणे चुकीचे ठरेल अशा प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत.

डिचोली भाजप अध्यक्ष विश्वास गावकर, साखळी अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी सांगितले की, भाजपचे काम सुरूच आहे. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी भाजप नक्कीच मोठी आघाडी घेण्यास सज्ज आहे. आज अशी स्थिती आहे की, भाजप मोठी मुसंडी मारणार असल्याचे तुळशीदास परब, संजय नाईक, सचिन साळकर यांनी सागितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आमदार प्रेमेंद शेट, डिचोली आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये भाजपसाठी तळमळीने कार्यरत आहेत. त्यामुळे कानोसा घेता भाजप तालुक्यात मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपसाठी उमेदवार कोण हा मुद्दाच नसल्याच्या प्रतिक्रिया आहेत. काहींनी नवीन उमेदवार असावा, अशी प्रतिक्रिया दिली. तरीही विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांना उमेदवारी दिली तरही त्यांच्यासाठी कार्य करणार असल्याचे सांगितले.

तालुक्यात काँग्रेस पक्षाने बैठकांचे सत्र सुरू केलेले असून, डिचोली व साखळीतील काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय होताना दिसतात. साखळीत काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत समाधानकारक मजल मारली होती, संघटन मजबूत करण्याचे काँग्रेस नेत्यांनी ठरवले आहे. त्याचा कितपत प्रभाव दिसून येणार हे येणाऱ्या काळात ठरेल. मात्र, काँग्रेसला गृहीत धरण्याची चूक कुणी करू नये. आमचे कार्य शिस्तबद्ध सुरू केले आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रताप गावस, प्रवीण ब्लेगन, आदींनी व्यक्त केली.

डिचोली तालुक्यात भाजपला टक्कर देणार तर संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा लागेल, अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, मागील वर्षभरापासून भारतीय जनता पक्षाचे कार्य अविश्रांत सुरू आहे. त्यामुळे त्यांचे संघटन कौशल्य मजबूत आहे. त्याचे लाभ भाजपला नक्कीच होईल, अशी प्रतिक्रिया वल्लभ साळकर, कालिदास गावस, सुभाष मळीक यांनी व्यक्त केली. आरजीच्या मनोज परब यांनी तालुक्यात काही मते मिळवली होती. युवा शक्तीचा एक घटक त्यांच्याकडे आहे. मात्र, संघटन मजबूत करणे, सामाजिक उपक्रम व लोकांना विशेष विश्वासात घेण्याचे कसब त्यांना साधावे लागेल. त्यांचे अनेक मुद्दे चर्चेत आहेत. मात्र, त्यासाठी प्रचाराची रणनीती व लोकसहभाग वाढवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांचे समर्थक बोलून दाखवतात.

आजच्या परिस्थितीत अयोध्येत राम मंदिर उभारणी मुद्दा महत्त्वाचा ठरलेला असून, सारा देश राममय झालेला आहे. त्याचा मोठा लाभ हा भाजपला होईल, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत देसाई यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा