शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

गोमंतकीयांनो पाणी जपून वापरा; धरणांत ५० टक्केच पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 08:58 IST

पावसाळ्याला अजून दोन महिने आहेत आणि तिलारी वगळता गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पाणीसाठा निम्म्याने संपला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पावसाळ्याला अजून दोन महिने आहेत आणि तिलारी वगळता गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पाणीसाठा निम्म्याने संपला आहे. त्यामुळे यंदा पाण्यासाठी कसरत करावी लागणार, असे संकेत आहेत. दक्षिण गोव्यातील जवळजवळ निम्म्या अधिक गावे व शहरांची तहान भागविणाऱ्या साळावली धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणी आहे. २३४३६ हेक्टर मीटर क्षमतेच्या या धरणात आता ११८२७ हेक्टर मीटर पाणी शिल्लक आहे.

हणजुणे धरणात ३५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक राहिले आहे. काणकोण तालुक्याला पाणी पुरविणाऱ्या चापोली धरणात ६० टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. आमठाणे पाणी प्रकल्पातही ५५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. आमठाणीत ३० टक्के पाणी तर गावणे प्रकल्पात ५५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यातल्या त्यात दिलासा तो तिलारी धरणाचा ४६२१७ हेक्टर मीटर क्षमतेचे हे धरण महाराष्ट्रात जरी असले तरी त्यातील ७६ टक्के पाणी हे गोव्याच्या वाट्याला येते. उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणावर हे पाणी पुरविले जाते. या धरणात अजून ९६ टक्के पाणी शिल्लक आहे.

साळावलीवर भरवसा

साळावली धरणाचे पाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक असले तरी हे धरण प्रचंड क्षमतेचे असल्यामुळे कधीच कोरडे पडणार नाही, असा जलस्रोत खात्यासह सांगेवासीयांनाही भरवसा आहे. स्थानिक आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई सांगतात की, साळावलीचे पाणी आतापर्यंत कधीच संपलेले घाबरण्याची गरज नाही. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचीही भिस्त याच धरणावर आहे.

चिंता नको

राज्यातील धरणांची पातळी खाली गेली असली तरी काहीच चिंता करण्याची गरज नाही. साळावली धरणात विद्यमान स्थितीत १०९ दशलक्ष घनमीटर इतके पाणी असून ते सिंचन व इतर कामासाठी वापरूनही ९० दिवस पुरेल इतके आहे. त्यामुळे निदान पाण्याच्या उपलब्धतेबद्दल तरी चिंता करण्याचे कारण नाही असे ते सांगतात. - सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाDamधरण