शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

गोमंतकीयांनो पाणी जपून वापरा; धरणांत ५० टक्केच पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 08:58 IST

पावसाळ्याला अजून दोन महिने आहेत आणि तिलारी वगळता गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पाणीसाठा निम्म्याने संपला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पावसाळ्याला अजून दोन महिने आहेत आणि तिलारी वगळता गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पाणीसाठा निम्म्याने संपला आहे. त्यामुळे यंदा पाण्यासाठी कसरत करावी लागणार, असे संकेत आहेत. दक्षिण गोव्यातील जवळजवळ निम्म्या अधिक गावे व शहरांची तहान भागविणाऱ्या साळावली धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणी आहे. २३४३६ हेक्टर मीटर क्षमतेच्या या धरणात आता ११८२७ हेक्टर मीटर पाणी शिल्लक आहे.

हणजुणे धरणात ३५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक राहिले आहे. काणकोण तालुक्याला पाणी पुरविणाऱ्या चापोली धरणात ६० टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. आमठाणे पाणी प्रकल्पातही ५५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. आमठाणीत ३० टक्के पाणी तर गावणे प्रकल्पात ५५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. त्यातल्या त्यात दिलासा तो तिलारी धरणाचा ४६२१७ हेक्टर मीटर क्षमतेचे हे धरण महाराष्ट्रात जरी असले तरी त्यातील ७६ टक्के पाणी हे गोव्याच्या वाट्याला येते. उत्तर गोव्यात मोठ्या प्रमाणावर हे पाणी पुरविले जाते. या धरणात अजून ९६ टक्के पाणी शिल्लक आहे.

साळावलीवर भरवसा

साळावली धरणाचे पाणी ५० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक असले तरी हे धरण प्रचंड क्षमतेचे असल्यामुळे कधीच कोरडे पडणार नाही, असा जलस्रोत खात्यासह सांगेवासीयांनाही भरवसा आहे. स्थानिक आमदार आणि मंत्री सुभाष फळदेसाई सांगतात की, साळावलीचे पाणी आतापर्यंत कधीच संपलेले घाबरण्याची गरज नाही. जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांचीही भिस्त याच धरणावर आहे.

चिंता नको

राज्यातील धरणांची पातळी खाली गेली असली तरी काहीच चिंता करण्याची गरज नाही. साळावली धरणात विद्यमान स्थितीत १०९ दशलक्ष घनमीटर इतके पाणी असून ते सिंचन व इतर कामासाठी वापरूनही ९० दिवस पुरेल इतके आहे. त्यामुळे निदान पाण्याच्या उपलब्धतेबद्दल तरी चिंता करण्याचे कारण नाही असे ते सांगतात. - सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाDamधरण