शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

धरणात केवळ ३५ टक्केच पाणी; साळावलीची पातळी घटली, तिळारीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2024 11:10 IST

गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोव्यात बहुतांश लोकांची तहान भागविणारे राज्यातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या साळावली धरणात केवळ ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

हवामान खात्याचा मान्सूनविषयक अंदाज लक्षात घेता, या शिल्लक ३५ टक्के पाण्यात उर्वरित ३५ दिवस भागविण्याचे आव्हान आहे. साळावली धरणाची पूर्ण क्षमता ही २३,४३६ हेक्टामीटर आहे. १ टक्का पाणी म्हणजे २३४.३६ हेक्टामीटर. सध्याच्या पाणी साठ्याच्या हिशेबाने ३५ टक्के साठा हा ८२०२ हेक्टामीटर असा होतो.

जलस्रोत खात्याच्या नोंदीनुसार साळावलीत सव्वाआठ हजार हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून यंदा गोव्यात वेळेवर म्हणजे ४ ते ५ जूनपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मान्सूनला गोव्यात दाखल होण्यासाठी ३५ दिवस आहेत आणि ३५ टक्के उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यात तोपर्यंत भागवावे लागणार आहे.

राज्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या अंजुणेमध्ये क्षमतेच्या ३९ टक्के म्हणजेच १०६९ हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. काणकोणचे चापोली धरण निम्मे आटले असून ५५९ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. ५८५ हेक्टामीटर क्षमतेच्या आमठाणे धरणात ३४ टक्के इतके म्हणजेच २०० हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. आमठाणे प्रकल्पात ११४ हेक्टामीटर तर गावणे प्रकल्पात ८७ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे.

तिळारीचा दिलासा

तिळारीचे विशाल जलाशय हे गोव्यासाठी दिलासादायक आहे. हे धरण महाराष्ट्रात जरी असले तरी या धरणाच्या ७४ टक्के पाण्याचा वापर हा गोव्यासाठीच आहे. तसेच ४६ हजार हेक्टामीटर पाण्याच्या क्षमतेच्या या धरणात अजूनही १८ हजार हेक्टामीटरपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे. त्यामुळे विशेषतः उत्तर गोव्यासाठी ही अत्यंत आश्वासक बाब आहे.

साळावली धरणात ३५ टक्के पाणी शिल्लक असले तरी या धरणाची क्षमताच फार मोठी असल्यामुळे हे ३५ टक्के पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे. शिवाय मान्सून गोव्यात दाखल होण्यापूर्वी मान्सूनच्या पूर्वसरी गोव्याला दिलासा देतील. - सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी