शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

धरणात केवळ ३५ टक्केच पाणी; साळावलीची पातळी घटली, तिळारीचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2024 11:10 IST

गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : दक्षिण गोव्यात बहुतांश लोकांची तहान भागविणारे राज्यातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या साळावली धरणात केवळ ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गोमंतकीयांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

हवामान खात्याचा मान्सूनविषयक अंदाज लक्षात घेता, या शिल्लक ३५ टक्के पाण्यात उर्वरित ३५ दिवस भागविण्याचे आव्हान आहे. साळावली धरणाची पूर्ण क्षमता ही २३,४३६ हेक्टामीटर आहे. १ टक्का पाणी म्हणजे २३४.३६ हेक्टामीटर. सध्याच्या पाणी साठ्याच्या हिशेबाने ३५ टक्के साठा हा ८२०२ हेक्टामीटर असा होतो.

जलस्रोत खात्याच्या नोंदीनुसार साळावलीत सव्वाआठ हजार हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सून यंदा गोव्यात वेळेवर म्हणजे ४ ते ५ जूनपर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मान्सूनला गोव्यात दाखल होण्यासाठी ३५ दिवस आहेत आणि ३५ टक्के उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्यात तोपर्यंत भागवावे लागणार आहे.

राज्यातील दुसरे मोठे धरण असलेल्या अंजुणेमध्ये क्षमतेच्या ३९ टक्के म्हणजेच १०६९ हेक्टामीटर पाणीसाठा शिल्लक आहे. काणकोणचे चापोली धरण निम्मे आटले असून ५५९ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. ५८५ हेक्टामीटर क्षमतेच्या आमठाणे धरणात ३४ टक्के इतके म्हणजेच २०० हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे. आमठाणे प्रकल्पात ११४ हेक्टामीटर तर गावणे प्रकल्पात ८७ हेक्टामीटर पाणी शिल्लक आहे.

तिळारीचा दिलासा

तिळारीचे विशाल जलाशय हे गोव्यासाठी दिलासादायक आहे. हे धरण महाराष्ट्रात जरी असले तरी या धरणाच्या ७४ टक्के पाण्याचा वापर हा गोव्यासाठीच आहे. तसेच ४६ हजार हेक्टामीटर पाण्याच्या क्षमतेच्या या धरणात अजूनही १८ हजार हेक्टामीटरपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे. त्यामुळे विशेषतः उत्तर गोव्यासाठी ही अत्यंत आश्वासक बाब आहे.

साळावली धरणात ३५ टक्के पाणी शिल्लक असले तरी या धरणाची क्षमताच फार मोठी असल्यामुळे हे ३५ टक्के पाणी पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे. शिवाय मान्सून गोव्यात दाखल होण्यापूर्वी मान्सूनच्या पूर्वसरी गोव्याला दिलासा देतील. - सुभाष शिरोडकर, जलस्रोत मंत्री 

टॅग्स :goaगोवाDamधरणWaterपाणी