शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

गोव्यात रेशनवर मिळणार कांदा; साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 7:47 PM

नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांच्याशी लोकमतने केलेला वार्तालाप...

पणजी : बाजारात कांदा महागल्याने गोव्याच्या नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्डवर ३४.५0 पैसे किलो दराने कार्डामागे तीन किलो देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नागरी पुरवठामंत्री गोविंद गावडे यांच्याशी केलेला वार्तालाप...

प्रश्न : बाजारात कांदा शंभर रुपये किलोवर पोहोचल्याने नागरी पुरवठा खात्याला स्वस्त धान्य दुकानांमधून रेशनवर तो पुरवावा लागला आहे. ही यंत्रणा तुम्ही कशी उभी केली?

उत्तर : जनतेला स्वस्त धान्य दुकानांमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना वेगवेगळे उपक्रम याआधीही खात्याने हाती घेतले आहेत. कांदा १00 रुपये किलोवर पोहोचल्याने सरकार आता तो आयात करून रेशनवर प्रति किलो ३४.५० रुपये सवलतीच्या दराने देणार आहे. कार्डामध्ये तीन किलो कांदा देण्याचे आम्ही ठरविले होते. नाशिकच्या 'नाफेड' एजन्सीकडून १0४५ मेट्रिक टन कांदा मागविला असून १00 टनांहून अधिक कांदा गोव्यात दाखलही झालेला आहे. पुढील एक-दोन दिवसात राज्यातील सर्व ४५४ रेशन दुकानांमध्ये वितरण सुरू होईल. सुरवातीला रेशन कार्डावर एक किलो कांदा दिला जाईल आणि उर्वरित दोन किलो कांदे नोव्हेंबरपर्यंत दिले जातील. साधारणपणे साडेतीन लाख रेशन कार्डधारकांना याचा लाभ होईल.

प्रश्न : लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब जनतेला रेशन मिळावे यासाठीही नागरी पुरवठा खात्याने महत्त्वाची भूमिका बजावली. खात्याच्या कामाचा कामाचा व्याप वाढला. ही सर्व परिस्थिती कशी हाताळली सांगू शकाल काय?

उत्तर : रेशनवर धान्य पुरवठा करण्यापासून काळाबाजार रोखणे, सांठेबाजी करणाºयांवर अंकुश ठेवणे, अशी सर्वच कामगिरी खात्याच्या अधिकाºयांना पार पाडावी लागली. लॉकडाऊनच्या काळात तब्बल ४५00 मेट्रिक टन अतिरिक्त तांदूळ आणि ११00 मेट्रिक टन अतिरिक्त गहू भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून मंजूर करून आणला आणि रेशनवर तो वितरीतही केला. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत गेल्या धान्य वितरण केले. अंत्योदया व पीएचई कार्डधारकांसाठी पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत पुरविले. लॉकडाउनच्या काळात रेशनवर तूरडाळही वितरीत केली. खात्याचे कर्मचारी, अधिकारी यांनी दिवसरात्र काम केले.

प्रश्न : महामारीच्या काळात धान्याचा काळाबाजार देशभर मोठ्या प्रमाणात झाला. गोव्यात तुम्ही कोणते उपाय योजना केल्या?

उत्तर :  गोदामांमधील माल बाहेर न काढता धान्याची साठेबाजी तसेच काळाबाजार करणाºयांविरुध्द कडक मोहीम उघडली. गोदामांना आकस्मिक भेटी देऊन माल बाहेर काढायला करायला लावले आणि वितरित करण्यास भाग पाडण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात केंद्राकडून जादा कोटा संमत करुन आणलाच शिवाय काही ठिकाणी घरपोच धान्य देण्याची व्यवस्थाही केली. लॉकडाऊनमध्ये पंचायत सदस्य, एनजीओंनीही खात्याला चांगले सहकार्य केले.

प्रश्न : स्वस्त धान्य दुकानांमध्ये बायोमेट्रिक पद्धत तसेच इंटरनेटच्या समस्येमुळे पिओएस यंत्रे कटकटीची ठरली आहेत त्यावर काय उपाययोजना केलेल्या आहेत?

उत्तर : कोरोना व्हायरसमुळे बायोमेट्रिक पद्धत काही दिवस बंद होती. ज्या ग्रामीण भागांमध्ये इंटरनेटची सेवा नाही तेथे पीओएस मशिन तसेच बायोमेट्रिकच्या बाबतीत सवलत देण्यात आलेली आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारित येतो त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करावे लागते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत