शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 20:51 IST

महिला काँग्रेसच्या रणरागिणी कडाडल्या : सात दिवसात सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु

ठळक मुद्देशुक्रवारी राजधानी शहर बाजारपेठेत १२० रुपये किलो दर होता. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडून पडले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करावा.’

पणजी - देशभरात कुठेही नव्हे, एवढा गोव्यात कांदा महाग झालेला. शुक्रवारी राजधानी शहरात १२० रुपये किलो या दराने कांदा विकला गेला. या प्रचंड दरवाढीमुळे गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले असून संताप व्यक्त केला जात आहे. सात दिवसात सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रदेश महिला काँग्रेसने दिला आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशमध्ये ग्वाल्हेर शहरात कांद्याचा दर प्रती किलो ३८ रुपये आहे. दिल्लीत ७६ रुपये, मुंबईत ९२ रुपये, कोलकातामध्ये १०० रुपये किलो तर चेन्नइमध्ये ८० रुपये प्रती किलो असा कांद्याचा दर आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे जीवनावश्यक अशा २२ वस्तूंच्या दरांचा आढावा रोज घेतला जातो. तांदूळ, गहू, आटा, साखर, तूरडाळ, उडीद डाळ, मूग डाळ, चणाडाळ, मसूर, साखर, गुळ, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लॉवर तेल, पाम तेल. सोयाबिन तेल, चहा, दूध, कांदा, बटाटा, टोमॅटो, मीठ आदी वस्तूंचा यात समावेश असतो. देशभरातील १०९ बाजारपेठांमधून या वस्तूंचे दर प्राप्त केले जातात. दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कांद्याची साठवणूक करण्यावरही निर्बंध घातलेले आहेत. किरकोळ व्यापारी १०० क्विंटलपर्यंत तर घाऊक व्यापारी ५०० क्विंटलपर्यंत कांदा साठवून ठेवू शकतात. निर्यातीवरही निर्बंध घातलेले आहेत.

दरम्यान, सरकारने सात दिवसात कांदा सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रदेश महिला काँग्रेसने दिला आहे. बाजारात १२० रुपये किलो दर झालेला असून सरकारने २० रुपये कि लोने तो उपलब्ध करावा, अतिरिक्त रकमेचा भार सरकारने उचलावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, ‘देशात कुठेही नव्हे एवढा गोव्यात कांदा महागला आहे. शुक्रवारी राजधानी शहर बाजारपेठेत १२० रुपये किलो दर होता. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडून पडले आहे. संसार कसा चालवावा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मागे नारळ महागले तेव्हा महिला काँग्रेसने सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन पेडणेपासून काणकोणपर्यंत १० रुपये नग याप्रमाणे स्वस्तात लोकांना नारळ उपलब्ध केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करावा.’

काँग्रेस सरकार सत्तेवर असताना महागाईच्या निषेधार्थ भाजपच्या महिला मोर्चा कार्यकर्त्या रस्त्यावर उतरायच्या. स्मृती इराणी यांनी अशी अनेक आंदोलने केली आहेत. आज कांद्याचा भाव गगनाला भिडला असताना त्या कुठे आहेत? असा सवाल कुतिन्हो यांनी केला.कुतिन्हो म्हणाल्या की, ‘ फलोत्पादन महामंडळाच्या दालनांसाठी येणाऱ्या भाज्या हॉटेलांना पुरविल्या जातात लोकांना त्या मिळत नाही. महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण झांट्ये यांनी दालनांना आकस्मिक भेटी देऊन तपासणी करावी. देशाच्या अन्य भागांमध्ये कांदा स्वस्त असताना गोव्यातच महाग का, असा सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :goaगोवाonionकांदाPramod Sawantप्रमोद सावंत