शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा देशभरात सर्वात जास्त गोव्यात महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 20:51 IST

महिला काँग्रेसच्या रणरागिणी कडाडल्या : सात दिवसात सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु

ठळक मुद्देशुक्रवारी राजधानी शहर बाजारपेठेत १२० रुपये किलो दर होता. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडून पडले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करावा.’

पणजी - देशभरात कुठेही नव्हे, एवढा गोव्यात कांदा महाग झालेला. शुक्रवारी राजधानी शहरात १२० रुपये किलो या दराने कांदा विकला गेला. या प्रचंड दरवाढीमुळे गृहिणींच्या तोंडचे पाणी पळाले असून संताप व्यक्त केला जात आहे. सात दिवसात सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रदेश महिला काँग्रेसने दिला आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशमध्ये ग्वाल्हेर शहरात कांद्याचा दर प्रती किलो ३८ रुपये आहे. दिल्लीत ७६ रुपये, मुंबईत ९२ रुपये, कोलकातामध्ये १०० रुपये किलो तर चेन्नइमध्ये ८० रुपये प्रती किलो असा कांद्याचा दर आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयातर्फे जीवनावश्यक अशा २२ वस्तूंच्या दरांचा आढावा रोज घेतला जातो. तांदूळ, गहू, आटा, साखर, तूरडाळ, उडीद डाळ, मूग डाळ, चणाडाळ, मसूर, साखर, गुळ, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल, वनस्पती तेल, सनफ्लॉवर तेल, पाम तेल. सोयाबिन तेल, चहा, दूध, कांदा, बटाटा, टोमॅटो, मीठ आदी वस्तूंचा यात समावेश असतो. देशभरातील १०९ बाजारपेठांमधून या वस्तूंचे दर प्राप्त केले जातात. दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कांद्याची साठवणूक करण्यावरही निर्बंध घातलेले आहेत. किरकोळ व्यापारी १०० क्विंटलपर्यंत तर घाऊक व्यापारी ५०० क्विंटलपर्यंत कांदा साठवून ठेवू शकतात. निर्यातीवरही निर्बंध घातलेले आहेत.

दरम्यान, सरकारने सात दिवसात कांदा सवलतीच्या दरात उपलब्ध न केल्यास रस्त्यावर उतरु, असा इशारा प्रदेश महिला काँग्रेसने दिला आहे. बाजारात १२० रुपये किलो दर झालेला असून सरकारने २० रुपये कि लोने तो उपलब्ध करावा, अतिरिक्त रकमेचा भार सरकारने उचलावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या की, ‘देशात कुठेही नव्हे एवढा गोव्यात कांदा महागला आहे. शुक्रवारी राजधानी शहर बाजारपेठेत १२० रुपये किलो दर होता. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडून पडले आहे. संसार कसा चालवावा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मागे नारळ महागले तेव्हा महिला काँग्रेसने सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरुन पेडणेपासून काणकोणपर्यंत १० रुपये नग याप्रमाणे स्वस्तात लोकांना नारळ उपलब्ध केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करावा.’

काँग्रेस सरकार सत्तेवर असताना महागाईच्या निषेधार्थ भाजपच्या महिला मोर्चा कार्यकर्त्या रस्त्यावर उतरायच्या. स्मृती इराणी यांनी अशी अनेक आंदोलने केली आहेत. आज कांद्याचा भाव गगनाला भिडला असताना त्या कुठे आहेत? असा सवाल कुतिन्हो यांनी केला.कुतिन्हो म्हणाल्या की, ‘ फलोत्पादन महामंडळाच्या दालनांसाठी येणाऱ्या भाज्या हॉटेलांना पुरविल्या जातात लोकांना त्या मिळत नाही. महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण झांट्ये यांनी दालनांना आकस्मिक भेटी देऊन तपासणी करावी. देशाच्या अन्य भागांमध्ये कांदा स्वस्त असताना गोव्यातच महाग का, असा सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :goaगोवाonionकांदाPramod Sawantप्रमोद सावंत