शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

ओम प्रमाणपत्र मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढवणार: तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह

By समीर नाईक | Updated: June 29, 2024 15:59 IST

याबाबतची माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.

समीर नाईक /  पणजी: देशात सर्वत्र जिहाद आणि हलाल या गोष्टींची हवा केली जात आहे. हलाल पूर्वी मासंपूर्तीच मर्यादीत असायचा, परंतु आता हे उद्योेगपर्यंत पोहचले आहे. थूक जिहाद, लव जिहाद यासारख्या गोष्टी आता वाढत आहे. या आता आमच्या मंदिरापर्यंत पोहचल्या आहेत. मंदिरातील प्रसाद देखील आता असुरक्षीत झाला आहे, या अनुषंगाने मंदिरातील प्रसादांमध्ये, फुलांमध्ये शुध्दता वाढावी, यासाठी आम्ही ओम प्रमाणपत्र संकल्पना राबविणार आहोत, अशी माहिती तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी दिली आहे.

पणजीत शनिवारी हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत टी. राजा सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे, ॲड. विष्णू जैन, व गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी उपस्थित होते.

थूक जिहादच्या माध्यमातून फुलांवर थूंकून विकली जात आहे. गायीच्या चरबीपासून बनवलेल्या खवा, पेढा, मावा हे प्रसाद म्हणून सर्रासपणे वितरित केले जात आहेत. हा एकप्रकारे हिंदूंच्या धार्मिक आस्थेवर मोठा आघात आहे. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसाद शुद्धीसाठी ओम प्रमाणपत्रे वितरित करणे सुरु झाले आहे. हिंदु दुकानदारांना ओम प्रमाणपत्र विनामूल्य दिले जाणार आहेत. देशभरातील मंदिर परिसरातील हिंदू दुकानदारांनी ओम प्रमाणपत्रे अवश्य घ्यावे, असे आवाहन राजा सिंह यांनी केले.

हलाल प्रमाणपत्र बेकायदेशीर आहे. देशात एफएसएसआय हे सरकारमान्य प्रमाणपत्र आहे. पण आता याच्यावर हलाल प्रमाणपत्र आले आहे. २०१३ साली एका मुस्लिम संघटनेनेे सुरु केलेले हलाल प्रमाणपत्रातून केवळ दहा वर्षात जगभरातून २.१ यूएस ट्रिलियन डॉलर निधी उभारला आहे, आणि हा सर्व पैसा केवळ आतंंकवादी घडामोडीसाठी वापरण्यात येत आहे. ही हिंदू राष्ट्रच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, त्या अनुषंगाने ओम प्रमाणपत्र खुप आवश्यक ठरणार आहे, असे यावेळी राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी सांगितले.

हिंदूंची अनेक प्राचीन मंदिरे भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहेत; मात्र पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षपणामुळे ही मंदिरे जीर्ण झाली आहे. ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत. ही मंदिरांची सरकारने योग्य देखभाल करावी, अशी मागणी ॲड. विष्णू जैन, यांनी केली. 

टॅग्स :goaगोवा