शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

२४ ऑक्टोबर, ९ डिसेंबर हे 'सुवर्णदिन' साजरे व्हायला हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:53 IST

पहिली पंचायत निवडणूक आणि पहिल्या विधानसभा निवडणुकीचे होईल स्मरण

सुहास बेळेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'जनमत कौल' ज्या दिवशी झाला, तो १६ जानेवारी हा दिवस 'सरकारी कार्यक्रम' म्हणून साजरा करण्याचे सरकारने ठरवले आहे. १६ जानेवारी १९६७ रोजी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे की गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे यासाठी जनमत कौल घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सरकारने पहिली पंचायत निवडणूक झालेला २४ ऑक्टोबर व ९ डिसेंबर हा पहिल्या विधानसभा निवडणुकीचा दिवसही सरकारी पातळीवर साजरा करण्याची गरज आहे.

पूर्वी 'जनमत कौल' हा दिवस सरकारी पातळीवरून साजरा केला जात नव्हता. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आणि विजय सरदेसाई त्यांच्या मंत्रिमंडळात असताना एक/दोन वर्षे तो सरकारी पातळीवरून साजरा केला गेला होता; पण त्यानंतर तो केला जात नव्हता. आता पुन्हा सरकारने तो अधिकृतरीत्या साजरा करायचे ठरवले आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जुलै २०२४ मध्ये जनमत कौल साजरा करण्यासंदर्भात एक खासगी ठराव मांडला होता. 

त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनमत कौल दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने आता हा निर्णय घेतला आहे. तशी अधिसूचनाही काढली आहे; पण आणखी दोन दिवस असे आहेत, जे सरकारने साजरे केले पाहिजेत. तेही अत्यंत महत्त्वाचे आहेत.

गोवा पंचायत राज दिन...

पहिला दिवस म्हणजे २४ ऑक्टोबर १९६२. या दिवशी स्वतंत्र गोव्यात पहिली पंचायत निवडणूक घेतली गेली होती. पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाल्यानंतर गोव्यात पहिल्यांदाच अशी निवडणूक होत होती. या निवडणुकीने गावचा कारभार गावच्या लोकांनीच पाहण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार लोकांना मिळाला होता, असे पहिल्यांदाच घडले.

यापूर्वी गोमंतकीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. लोक मत द्यायला किती उत्सुक होते आणि त्याच वेळी मतदान प्रक्रियेशी किती अनभिज्ञ होते, हेही लोकांनी बघितले होते. त्यामुळे गोव्याच्या राजकीय इतिहासात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो सरकारी पातळीवरून साजरा होणे आवश्यक आहे. २४ ऑक्टोबर हा दिवस सरकारला 'गोवा पंचायत राज दिन' म्हणून साजरा करता येईल.

लोकशाही दिन....

दुसरा महत्त्वाचा दिवस आहे, तो ९ डिसेंबर १९६३. या दिवशी मुक्त गोव्याचे पहिले लोकनियुक्त सरकार निवडण्यासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीने प्रथमच आपले सरकार आपण निवडण्याचा अधिकार लोकांना मिळाला. या निवडणुकीनंतरच गोव्यात पहिले लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले होते. या निवडणुकीने गोव्याला देशातील इतर प्रदेशांबरोबर आणले.

देशातील लोकशाहीच्या प्रवाहात गोवा सामील २ झाला. त्यामुळे हाही दिवस महत्त्वाचा आहे. सरकारने तो साजरा करावा. या दिवसाने गोव्यात लोकशाही आली. त्यामुळे हा दिवस 'लोकशाही दिन' म्हणून साजरा करावा. या दोन्ही ऐतिहासिक दिनांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत जायचा असेल तर हे दोन्ही दिवस सरकारने साजरे केले पाहिजेत. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार