शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

२४ ऑक्टोबर, ९ डिसेंबर हे 'सुवर्णदिन' साजरे व्हायला हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:53 IST

पहिली पंचायत निवडणूक आणि पहिल्या विधानसभा निवडणुकीचे होईल स्मरण

सुहास बेळेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'जनमत कौल' ज्या दिवशी झाला, तो १६ जानेवारी हा दिवस 'सरकारी कार्यक्रम' म्हणून साजरा करण्याचे सरकारने ठरवले आहे. १६ जानेवारी १९६७ रोजी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे की गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे यासाठी जनमत कौल घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सरकारने पहिली पंचायत निवडणूक झालेला २४ ऑक्टोबर व ९ डिसेंबर हा पहिल्या विधानसभा निवडणुकीचा दिवसही सरकारी पातळीवर साजरा करण्याची गरज आहे.

पूर्वी 'जनमत कौल' हा दिवस सरकारी पातळीवरून साजरा केला जात नव्हता. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आणि विजय सरदेसाई त्यांच्या मंत्रिमंडळात असताना एक/दोन वर्षे तो सरकारी पातळीवरून साजरा केला गेला होता; पण त्यानंतर तो केला जात नव्हता. आता पुन्हा सरकारने तो अधिकृतरीत्या साजरा करायचे ठरवले आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जुलै २०२४ मध्ये जनमत कौल साजरा करण्यासंदर्भात एक खासगी ठराव मांडला होता. 

त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनमत कौल दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने आता हा निर्णय घेतला आहे. तशी अधिसूचनाही काढली आहे; पण आणखी दोन दिवस असे आहेत, जे सरकारने साजरे केले पाहिजेत. तेही अत्यंत महत्त्वाचे आहेत.

गोवा पंचायत राज दिन...

पहिला दिवस म्हणजे २४ ऑक्टोबर १९६२. या दिवशी स्वतंत्र गोव्यात पहिली पंचायत निवडणूक घेतली गेली होती. पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाल्यानंतर गोव्यात पहिल्यांदाच अशी निवडणूक होत होती. या निवडणुकीने गावचा कारभार गावच्या लोकांनीच पाहण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार लोकांना मिळाला होता, असे पहिल्यांदाच घडले.

यापूर्वी गोमंतकीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. लोक मत द्यायला किती उत्सुक होते आणि त्याच वेळी मतदान प्रक्रियेशी किती अनभिज्ञ होते, हेही लोकांनी बघितले होते. त्यामुळे गोव्याच्या राजकीय इतिहासात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो सरकारी पातळीवरून साजरा होणे आवश्यक आहे. २४ ऑक्टोबर हा दिवस सरकारला 'गोवा पंचायत राज दिन' म्हणून साजरा करता येईल.

लोकशाही दिन....

दुसरा महत्त्वाचा दिवस आहे, तो ९ डिसेंबर १९६३. या दिवशी मुक्त गोव्याचे पहिले लोकनियुक्त सरकार निवडण्यासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीने प्रथमच आपले सरकार आपण निवडण्याचा अधिकार लोकांना मिळाला. या निवडणुकीनंतरच गोव्यात पहिले लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले होते. या निवडणुकीने गोव्याला देशातील इतर प्रदेशांबरोबर आणले.

देशातील लोकशाहीच्या प्रवाहात गोवा सामील २ झाला. त्यामुळे हाही दिवस महत्त्वाचा आहे. सरकारने तो साजरा करावा. या दिवसाने गोव्यात लोकशाही आली. त्यामुळे हा दिवस 'लोकशाही दिन' म्हणून साजरा करावा. या दोन्ही ऐतिहासिक दिनांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत जायचा असेल तर हे दोन्ही दिवस सरकारने साजरे केले पाहिजेत. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार