शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

२४ ऑक्टोबर, ९ डिसेंबर हे 'सुवर्णदिन' साजरे व्हायला हवेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 12:53 IST

पहिली पंचायत निवडणूक आणि पहिल्या विधानसभा निवडणुकीचे होईल स्मरण

सुहास बेळेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'जनमत कौल' ज्या दिवशी झाला, तो १६ जानेवारी हा दिवस 'सरकारी कार्यक्रम' म्हणून साजरा करण्याचे सरकारने ठरवले आहे. १६ जानेवारी १९६७ रोजी गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे की गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व ठेवावे यासाठी जनमत कौल घेण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर सरकारने पहिली पंचायत निवडणूक झालेला २४ ऑक्टोबर व ९ डिसेंबर हा पहिल्या विधानसभा निवडणुकीचा दिवसही सरकारी पातळीवर साजरा करण्याची गरज आहे.

पूर्वी 'जनमत कौल' हा दिवस सरकारी पातळीवरून साजरा केला जात नव्हता. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना आणि विजय सरदेसाई त्यांच्या मंत्रिमंडळात असताना एक/दोन वर्षे तो सरकारी पातळीवरून साजरा केला गेला होता; पण त्यानंतर तो केला जात नव्हता. आता पुन्हा सरकारने तो अधिकृतरीत्या साजरा करायचे ठरवले आहे. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी जुलै २०२४ मध्ये जनमत कौल साजरा करण्यासंदर्भात एक खासगी ठराव मांडला होता. 

त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनमत कौल दिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने आता हा निर्णय घेतला आहे. तशी अधिसूचनाही काढली आहे; पण आणखी दोन दिवस असे आहेत, जे सरकारने साजरे केले पाहिजेत. तेही अत्यंत महत्त्वाचे आहेत.

गोवा पंचायत राज दिन...

पहिला दिवस म्हणजे २४ ऑक्टोबर १९६२. या दिवशी स्वतंत्र गोव्यात पहिली पंचायत निवडणूक घेतली गेली होती. पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झाल्यानंतर गोव्यात पहिल्यांदाच अशी निवडणूक होत होती. या निवडणुकीने गावचा कारभार गावच्या लोकांनीच पाहण्यासाठी आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार लोकांना मिळाला होता, असे पहिल्यांदाच घडले.

यापूर्वी गोमंतकीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. लोक मत द्यायला किती उत्सुक होते आणि त्याच वेळी मतदान प्रक्रियेशी किती अनभिज्ञ होते, हेही लोकांनी बघितले होते. त्यामुळे गोव्याच्या राजकीय इतिहासात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो सरकारी पातळीवरून साजरा होणे आवश्यक आहे. २४ ऑक्टोबर हा दिवस सरकारला 'गोवा पंचायत राज दिन' म्हणून साजरा करता येईल.

लोकशाही दिन....

दुसरा महत्त्वाचा दिवस आहे, तो ९ डिसेंबर १९६३. या दिवशी मुक्त गोव्याचे पहिले लोकनियुक्त सरकार निवडण्यासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीने प्रथमच आपले सरकार आपण निवडण्याचा अधिकार लोकांना मिळाला. या निवडणुकीनंतरच गोव्यात पहिले लोकनियुक्त सरकार सत्तेवर आले होते. या निवडणुकीने गोव्याला देशातील इतर प्रदेशांबरोबर आणले.

देशातील लोकशाहीच्या प्रवाहात गोवा सामील २ झाला. त्यामुळे हाही दिवस महत्त्वाचा आहे. सरकारने तो साजरा करावा. या दिवसाने गोव्यात लोकशाही आली. त्यामुळे हा दिवस 'लोकशाही दिन' म्हणून साजरा करावा. या दोन्ही ऐतिहासिक दिनांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत जायचा असेल तर हे दोन्ही दिवस सरकारने साजरे केले पाहिजेत. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार