शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

२१ दिवस पूर्ण होऊनही दुलर्क्ष; कदंब कर्मचाऱ्यांचा आता महामेळावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 15:48 IST

तात्काळ २५० नवीन बसेस आणून राज्यांतर्गत सगळ्या गावोगावी बस गाड्या चालू ठेवा.

नारायण गवस

पणजी : गेले २१ दिवस येथील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करीत असलेल्या कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेची सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शुक्रवार, १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता आझाद मैदानावर कुटुंबियांसोबत महामेळावा आयोजित केला आहे. यात राज्यभरातील विविध कामगार संघटनेचे नेते व कर्मचारी उपस्थित असणार असल्याची माहिती कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी दिली.

तात्काळ २५० नवीन बसेस आणून राज्यांतर्गत सगळ्या गावोगावी बस गाड्या चालू ठेवा. भविष्यनिर्वाह निधीची पुनःस्थापन करा. सातवा वेतन आयोग करार अंतिम करा. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ताबडतोब द्या. समान काम समान पगाराच्या आधारावर बदली कामगारांना कायम करा. इलेक्ट्रिक बसेस कदंब व्यवस्थापनाने चालवल्या पाहिजेत आणि त्यांची देखभाल दुरूस्ती कदंब कर्मचाऱ्यांनी करावी. या प्रमुख मागण्यांसाठी हे कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. पण सरकारकडून काहीच प्रतिसाद नसल्याने आता हे आंदोलन तीव्र केले जाणार असेही चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले.

कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाच्यावतीने ७ फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज २१ दिवस झाले आहेत. हे कर्मचारी रोज सकाळी ९.३० ते दुपारी १ पर्यंत आंदोलन करत आहेत. आंदोलनाकडे महामंडळ, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महामेळावा आयोजित केला आहे. राज्यातील ४५ संघटनांचा पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :goaगोवा