शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

गोव्यात आता टॅक्सींना धोक्याची सूचना देणारे बटन, येत्या आठवड्यात प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 21:08 IST

राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.

पणजी : राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.

गेले काही दिवस वाहतूक खाते तांत्रिक व्यवस्थेला अंतिम स्वरुप देण्यासाठी काम करत होते. डिजीटल मिटर लवकर लावण्याची सूचना न्यायालयानेही वाहतूक खात्याला केली आहे. राज्यात एकूण 20 हजार टॅक्सी आहेत. यात पर्यटक टॅक्सी, पिवळ्या- काळ्या आणि अन्य टॅक्सींचा समावेश होतो. गोव्यातील टॅक्सींकडे मीटर नसल्याने आपली फसवणूक व लुबाडणूक होते अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार पर्यटकांकडून येत होत्या. यापुढे अशा तक्रारींना वाव राहणार नाही, असे खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. कारण डिजीटल मीटरसोबत प्रिंटर आणि जीपीएस व्यवस्थाही येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोव्यातील टॅक्सींना आता धोक्याची सूचना देणारा बटण असेल. कुणालाही टॅक्सीमध्ये धोका वाटला तर तो बटण दाबता येईल. त्या बटणावरील कॉल हा पोलिसांच्या शंभर क्रमांकाला कळविला जाईल. ती टॅक्सी आता कुठे पोहचली आहे. जीपीएस व्यवस्थेमुळे पोलिसांना कळू शकेल, असे वाहतूक खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. डिजीटल मीटर, प्रिंटर, पॅनिक बटण आणि जीपीएस व्यवस्था एकाच यंत्रत उपलब्ध होईल. देशात अन्य कुठच्याच राज्यांमध्ये अशी व्यवस्था नाही असे अधिका-यांनी सांगितले. 

ज्या उत्पादक कंपनी डिजीटल मीटरवर वॉरंटी देईल, विक्रीनंतरची सेवा देईल व राज्यात अनेक ठिकाणी ज्या कंपनीचे काऊंटर्स असतील अशा कंपनीला वाहतूक खात्याकडून डीजीटल मीटर बसविण्याचे काम दिले जाणार आहे. येत्या आठवडय़ात इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागितल्यानंतर त्यापैकी एकाची निवड केली जाईल. 

दरम्यान, वाहनधारकांच्या घरी टपालाद्वारे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बूक) आणि वाहन परवाना पाठविण्याची जी व्यवस्था तीन महिन्यांपूर्वी वाहतूक खात्याने सुरू केली, ती चांगल्या प्रकारे चालत आहे, असे अधिका-यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांत पन्नास हजार वाहनधारकांना अशा प्रकारे आरसी बूक व परवाने पाठविले गेले. फक्त दोन टक्के परत आले. पत्ते नीट नसल्याने काहीवेळा असे होते, असे सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवा