शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोव्यात आता टॅक्सींना धोक्याची सूचना देणारे बटन, येत्या आठवड्यात प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 21:08 IST

राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.

पणजी : राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.

गेले काही दिवस वाहतूक खाते तांत्रिक व्यवस्थेला अंतिम स्वरुप देण्यासाठी काम करत होते. डिजीटल मिटर लवकर लावण्याची सूचना न्यायालयानेही वाहतूक खात्याला केली आहे. राज्यात एकूण 20 हजार टॅक्सी आहेत. यात पर्यटक टॅक्सी, पिवळ्या- काळ्या आणि अन्य टॅक्सींचा समावेश होतो. गोव्यातील टॅक्सींकडे मीटर नसल्याने आपली फसवणूक व लुबाडणूक होते अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार पर्यटकांकडून येत होत्या. यापुढे अशा तक्रारींना वाव राहणार नाही, असे खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. कारण डिजीटल मीटरसोबत प्रिंटर आणि जीपीएस व्यवस्थाही येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोव्यातील टॅक्सींना आता धोक्याची सूचना देणारा बटण असेल. कुणालाही टॅक्सीमध्ये धोका वाटला तर तो बटण दाबता येईल. त्या बटणावरील कॉल हा पोलिसांच्या शंभर क्रमांकाला कळविला जाईल. ती टॅक्सी आता कुठे पोहचली आहे. जीपीएस व्यवस्थेमुळे पोलिसांना कळू शकेल, असे वाहतूक खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. डिजीटल मीटर, प्रिंटर, पॅनिक बटण आणि जीपीएस व्यवस्था एकाच यंत्रत उपलब्ध होईल. देशात अन्य कुठच्याच राज्यांमध्ये अशी व्यवस्था नाही असे अधिका-यांनी सांगितले. 

ज्या उत्पादक कंपनी डिजीटल मीटरवर वॉरंटी देईल, विक्रीनंतरची सेवा देईल व राज्यात अनेक ठिकाणी ज्या कंपनीचे काऊंटर्स असतील अशा कंपनीला वाहतूक खात्याकडून डीजीटल मीटर बसविण्याचे काम दिले जाणार आहे. येत्या आठवडय़ात इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागितल्यानंतर त्यापैकी एकाची निवड केली जाईल. 

दरम्यान, वाहनधारकांच्या घरी टपालाद्वारे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बूक) आणि वाहन परवाना पाठविण्याची जी व्यवस्था तीन महिन्यांपूर्वी वाहतूक खात्याने सुरू केली, ती चांगल्या प्रकारे चालत आहे, असे अधिका-यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांत पन्नास हजार वाहनधारकांना अशा प्रकारे आरसी बूक व परवाने पाठविले गेले. फक्त दोन टक्के परत आले. पत्ते नीट नसल्याने काहीवेळा असे होते, असे सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवा