शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

गोव्यात आता टॅक्सींना धोक्याची सूचना देणारे बटन, येत्या आठवड्यात प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 21:08 IST

राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.

पणजी : राज्यात टॅक्सींना डिजीटल मीटरसह पॅनिक (धोक्याची सूचना) बटण लावले जाणार आहे. याबाबतची तांत्रिक व्यवस्था वाहतूक खात्याने आता निश्चित केली आहे. येत्या आठवडय़ात उत्पादक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागविण्यासाठी निविदा जारी केली जाणार आहे, असे खात्याच्या अधिका-यांनी शुक्रवारी जाहीर केले.

गेले काही दिवस वाहतूक खाते तांत्रिक व्यवस्थेला अंतिम स्वरुप देण्यासाठी काम करत होते. डिजीटल मिटर लवकर लावण्याची सूचना न्यायालयानेही वाहतूक खात्याला केली आहे. राज्यात एकूण 20 हजार टॅक्सी आहेत. यात पर्यटक टॅक्सी, पिवळ्या- काळ्या आणि अन्य टॅक्सींचा समावेश होतो. गोव्यातील टॅक्सींकडे मीटर नसल्याने आपली फसवणूक व लुबाडणूक होते अशा प्रकारच्या तक्रारी वारंवार पर्यटकांकडून येत होत्या. यापुढे अशा तक्रारींना वाव राहणार नाही, असे खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. कारण डिजीटल मीटरसोबत प्रिंटर आणि जीपीएस व्यवस्थाही येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोव्यातील टॅक्सींना आता धोक्याची सूचना देणारा बटण असेल. कुणालाही टॅक्सीमध्ये धोका वाटला तर तो बटण दाबता येईल. त्या बटणावरील कॉल हा पोलिसांच्या शंभर क्रमांकाला कळविला जाईल. ती टॅक्सी आता कुठे पोहचली आहे. जीपीएस व्यवस्थेमुळे पोलिसांना कळू शकेल, असे वाहतूक खात्याच्या अधिका-यांनी सांगितले. डिजीटल मीटर, प्रिंटर, पॅनिक बटण आणि जीपीएस व्यवस्था एकाच यंत्रत उपलब्ध होईल. देशात अन्य कुठच्याच राज्यांमध्ये अशी व्यवस्था नाही असे अधिका-यांनी सांगितले. 

ज्या उत्पादक कंपनी डिजीटल मीटरवर वॉरंटी देईल, विक्रीनंतरची सेवा देईल व राज्यात अनेक ठिकाणी ज्या कंपनीचे काऊंटर्स असतील अशा कंपनीला वाहतूक खात्याकडून डीजीटल मीटर बसविण्याचे काम दिले जाणार आहे. येत्या आठवडय़ात इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागितल्यानंतर त्यापैकी एकाची निवड केली जाईल. 

दरम्यान, वाहनधारकांच्या घरी टपालाद्वारे वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी बूक) आणि वाहन परवाना पाठविण्याची जी व्यवस्था तीन महिन्यांपूर्वी वाहतूक खात्याने सुरू केली, ती चांगल्या प्रकारे चालत आहे, असे अधिका-यांनी सांगितले. गेल्या तीन महिन्यांत पन्नास हजार वाहनधारकांना अशा प्रकारे आरसी बूक व परवाने पाठविले गेले. फक्त दोन टक्के परत आले. पत्ते नीट नसल्याने काहीवेळा असे होते, असे सांगण्यात आले.

टॅग्स :goaगोवा