शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मंत्र्यांमधील 'बेशिस्ती'ची दखल; सदानंद तानावडे यांनी डोळे वटारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2024 12:14 IST

माविन गुदिन्हो व अन्य मंत्र्यांशी बोलणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वाढत्या रस्ते अपघातांबाबत अभियंत्यांना जबाबदार धरुन मुख्यमंत्र्याकडे असलेल्या बांधकाम खात्यावर माविन गुदिन्हो यांनी निशाणा साधल्याने भाजपने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे. दुसऱ्याकडील खात्याचा दोष काढून एखाद्या मंत्र्याने भाष्य करणे योग्य नव्हे. मी माविन गुदिन्हो यांच्यासह इतर मंत्र्यांविषयी बोलणार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले.

बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंत्र्यांमध्ये एकमेकांच्या खात्यांविषयी उणीदुणी काढण्याचे प्रकार वाढले आहेत, याकडे लक्ष वेधले असता तानावडे म्हणाले की, जे कोणी मंत्री असे दुसऱ्याच्या खात्यांबद्दल बोलतात त्यांना तसे करू नये असे मी सांगणार आहे. माविन यांना आज, गुरुवारीच भेटणार आहे. रस्ता अपघातात तीन दिवसात सात बळी गेल्याने वाहतुकमंत्र्यांनी अपघातांना बांधकाम खात्याचे अभियंते जबाबदार आहेत, असे विधान करुन अभियंते काय काम करतात?, असा संतप्त सवाल केला होता. हे खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पक्षानेही त्याची गंभीर दखल घेतली आहे.

मध्यंतरी आमदार मायकल लोबो यांनी स्वतः सत्तेत असूनही एका मंत्र्याच्या खात्याबद्दल असेच विधान केले होते. अन्य काही मंत्रीही अनेकदा एकमेकांच्या खात्यांची उणीदुणी काढत असतात त्यामुळे सरकारची प्रतिमा खालावते, अशी पक्षनेतृत्त्वाची भावना बनली आहे. मंत्रिमंडळ फेररचेनेबद्दल विचारले असता तानावडे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पक्षाला अजून काही कल्पना दिलेली नाही. फेरबदल करायचे किंवा नाही व करायचे तर ते आता की पितृपक्ष संपल्यानंतर हे मुख्यमंत्रीच ठरवतील. सध्या तरी मुख्यमंत्री यासंबंधी पक्षाकडे काहीही बोललेले नाही.

'भुतानी'ला परवाने काँग्रेसच्या काळात

सध्या राज्यभर गाजत असलेल्या व ठिकठिकाणी निदर्शने होत असलेल्या सांकवाळ येथे डोंगरफोड करुन येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाबद्दल विचारले असता तानावडे म्हणाले की, या जमिनीला २००७ साली काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना सनद मिळाली व २००९ साली पर्यावरणीय परवाने दिले गेल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली आहे. आमच्याकडे संपूर्ण माहिती हातात आल्यानंतर दोन दिवसात या विषयावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन भाष्य करीन.

कोअर कमिटीची बैठक

दरम्यान, पक्षाची सदस्यता मोहीम सध्या सुरु आहे. किती टार्गेट आहे, असे विचारले असता तानावडे म्हणाले की, आम्ही कोणालाही टार्गेट दिलेले नाही. सध्या राज्यात आमचे ३ लाख ३० हजार सदस्य आहेत. किमान वर्षे वय असावे एवढीच अट आहे. त्याचबरोबर आज कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात सदस्यता मोहीमेसह मंत्र्यांच्या बेशिस्तीच्या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

दर मंगळवारी मंत्री कार्यकर्त्यांना भेटणार

सरकारमधील सर्व मंत्री आता दर मंगळवारी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी स्वतःपासून याची सुरवात केली. येथील भाजप मुख्यालयात ते कार्यकर्त्यांना भेटले व त्यांच्या समस्या, अडचणी तसेच सरकार दरबारी असलेली कामे जाणून घेतली. तानावडे यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आमचा प्रयत्न होता की मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना आठवड्यातून किमान एकदा तरी भेटावे. मंत्रालयात लोक भेटतच असतात परंतु कार्यकर्त्याला जर भेटायचे असेच तर मंत्री पक्षाच्या कार्यालयात उपलब्ध व्हावा या हेतूने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे.

जमिनी विकू नयेत

भूतानीच्या बाबतीत तानावडे म्हणाले की, गोमंतकीयांनी परप्रांतीयांना जमिनी विकल्या नसत्या तर हा प्रश्न उपस्थित झालाच नसता. या प्रकल्पाला दिलेल्या मंजुरीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. गोमंतकीयांनी परप्रांतीयांना जमिनी विकू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

'भुतानी' वादात सिक्वेरांची उडी

सांकवाळ येथे भुतानी कंपनीच्या मेगा प्रकल्पाला २००८ साली 'जीसीझेडएम'ने पर्यावरणीय परवाने दिल्याचे सिध्द करा, असे खुले आव्हान मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिले आहे. सिक्वेरा हे त्यावेळी काँग्रेसच्या दिगंबर कामत सरकारमध्ये मंत्री होते. सिक्वेरा हे २००८ साली पर्यावरणमंत्री असताना या प्रकल्पाला ईसी दिल्या गेल्याचा जो आरोप होत आहे. त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, त्यावेळी या प्रकल्पाला कोणतेही परवाने किंवा ना हरकत दाखले दिलेले नाहीत. जे कोणी आरोप करत आहेत त्यांनी ते मला आणून दाखवावेत, असे आव्हान दिले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण