शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ लोक नाही, तर मंत्री देखील अधिकारी वर्गाला कंटाळलेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 08:26 IST

संपादकीय: सोमवारी म्हापसा व मडगाव येथे जनता दरबार झाले.

कालच्या सोमवारी म्हापसा व मडगाव येथे जनता दरबार झाले. बांधकाम मंत्री नीलेश काब्राल व महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अनुक्रमे म्हापसा व मडगावला लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. लोक अधिकारी वर्गाला कंटाळले आहेत. कारण कामे होत नाहीत. मंत्री काब्राल यांनी केलेली विधाने पाहता काही मंत्रीदेखील कामचुकार व संथगतीच्या अधिकाऱ्यांना कंटाळले आहेत याचा अंदाज येतो. काब्राल दरवेळी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. कालच्या सोमवारीही त्यांनी तसाच इशारा म्हापशात दिला. लोकांच्या समस्या सोडवण्यात जे अधिकारी दिरंगाई करतात, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल असे काब्राल म्हणाले. ही कारवाई म्हणजे बोलाचीच कढी व बोलाचाच भात हे जनतेला ठाऊक आहे.

काब्राल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आहे. सोमवारी काब्राल म्हापशात जनता दरबार घेतात आणि मंगळवारी अर्ध्या बार्देश तालुक्यातील नळ पूर्णपणे कोरडे पडतात. काय म्हणावे या स्थितीला? मग कसले कर्माचे जनता दरबार भरवता तुम्ही? बाहेर धो-धो पाऊस कोसळत असतानाही बार्देशात लोकांच्या घरी नळाद्वारे सरकार पाणी पोहोचवू शकत नाही. याविषयी लाज कुणाला वाटायला हवी? जनतेला की हर घर जलची घोषणा देणाऱ्या सरकारला ? केंद्र सरकारदेखील डोळे बंद करून गोवा सरकारचे कौतुक करते व गोव्यात हर घर जल यशस्वी झाल्याचे नमूद करते. 

केंद्रीय मंत्र्यांनी काल मंगळवारी बार्देश तालुक्याला भेट दिली असती तर लोक कसे बोटे मोडतात ते कळून आले असते. परवा जरा पाऊस पडताच पूर्ण रात्रभर सगळा सत्तरी तालुका अंधारात राहिला. अगदी मुख्यमंत्री सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील न्हावेली फणसवाडी येथेही पंधरा तास वीज नव्हती. थंड पाणी व वीजपुरवठा सुरळीत करू न शकणारे हे सरकार जनता दरबार भरविण्याचे धाडस तरी कसे करते असा प्रश्न पडतो. ज्या गावात रात्री वीज नसते व जिथे नळाला पाणी नसते अशा गावात जाऊन पूर्ण मंत्रिमंडळाने एक दिवस निवास करावा आणि कॅबिनेट बैठक घ्यावी असे सुचवावेसे वाटते. मुळात मंत्र्यांनी जनता दरबार भरविणे हा वांझोटा प्रयोग झाला. मंत्र्यांकडे फक्त दोन-तीन खाती असतात. ते आपल्या खात्याच्याच अधिकाऱ्यांना सूचना करू शकतात. अन्य सर्व खात्यांमध्ये ते लुडबूड करू शकत नाहीत. जनता दरबार मुख्यमंत्री सावंत यांनी नव्याने भरवावा. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात जावे आणि लोकांचे प्रश्न जे अधिकारी रेंगाळत ठेवत आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करून तरी दाखवावी. मंत्री काब्राल वगैरे सांगतात की, अधिकारी तांत्रिक समस्या पुढे करतात व जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ लावतात. किती वर्षे हे असे चालणार आहे?

महसूल मंत्री मोन्सेरात हे तर कूळ-मुंडकार खटले लवकर निकालात काढले जातील असे वारंवार सांगत आहेत. गेल्या वर्षभरात किती कुळांना न्याय मिळाला ते मोन्सेरात यांनी जाहीर करावे. मडगावला पत्रकारांशी बोलताना मोन्सेरात यांनी मामलेदारांकडे बोट दाखवले. कूळ कायद्यातील तरतुदींचे मामलेदारांना नीट ज्ञान किंवा आकलन नसल्याने खटले जलदगतीने निकालात निघत नाहीत, असे बाबूश म्हणाले. वास्तविक मोन्सेरात यांचे निरीक्षण खरे आहे. अनेक उपजिल्हाधिकारी व मामलेदारांना कूळ- मुंडकार कायद्यातील तरतुदींचे भानच नसल्याने लोक बिचारे फक्त खेपा मारत आहेत. सर्व मामलेदारांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था तरी मोन्सेरात यांनी करायला हवी.

जनता दरबारावेळी संबंधित तालुक्यांच्या आमदारांना व्यासपीठावर बसविण्यात आले होते. जनता दरबारावेळी लोकांच्या समस्या सुटणार नसतील तर या आमदारांनी दरबारांचा फोलपणा येत्या विधानसभा अधिवेशनात मांडावा. गरीब लोक बिचारे खूप अपेक्षेने दरबारात येतात. मंत्री आपले ऐकून घेत असल्याने आपला प्रश्न सुटेलच असे लोकांना वाटते. प्रत्यक्षात एकदा मंत्र्यांची पाठ झाली की, मग दुसऱ्या दिवसापासून अधिकारीही त्या लोकांना ओळख दाखवत नाहीत. लोकांचे प्रश्न व्यक्तिगत स्वरुपाचे असतात. कुणाची फाईलच पुढे जात नाही तर कुणाला दाखला व प्रमाणपत्रच मिळत नाही. या देखील समस्या सुटणार नसतील तर मंत्र्यांनी जनता दरबार घेण्याची थट्टा करू नये.

 

टॅग्स :goaगोवा