शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

केवळ लोक नाही, तर मंत्री देखील अधिकारी वर्गाला कंटाळलेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 08:26 IST

संपादकीय: सोमवारी म्हापसा व मडगाव येथे जनता दरबार झाले.

कालच्या सोमवारी म्हापसा व मडगाव येथे जनता दरबार झाले. बांधकाम मंत्री नीलेश काब्राल व महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अनुक्रमे म्हापसा व मडगावला लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. लोक अधिकारी वर्गाला कंटाळले आहेत. कारण कामे होत नाहीत. मंत्री काब्राल यांनी केलेली विधाने पाहता काही मंत्रीदेखील कामचुकार व संथगतीच्या अधिकाऱ्यांना कंटाळले आहेत याचा अंदाज येतो. काब्राल दरवेळी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देत आहेत. कालच्या सोमवारीही त्यांनी तसाच इशारा म्हापशात दिला. लोकांच्या समस्या सोडवण्यात जे अधिकारी दिरंगाई करतात, त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल असे काब्राल म्हणाले. ही कारवाई म्हणजे बोलाचीच कढी व बोलाचाच भात हे जनतेला ठाऊक आहे.

काब्राल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आहे. सोमवारी काब्राल म्हापशात जनता दरबार घेतात आणि मंगळवारी अर्ध्या बार्देश तालुक्यातील नळ पूर्णपणे कोरडे पडतात. काय म्हणावे या स्थितीला? मग कसले कर्माचे जनता दरबार भरवता तुम्ही? बाहेर धो-धो पाऊस कोसळत असतानाही बार्देशात लोकांच्या घरी नळाद्वारे सरकार पाणी पोहोचवू शकत नाही. याविषयी लाज कुणाला वाटायला हवी? जनतेला की हर घर जलची घोषणा देणाऱ्या सरकारला ? केंद्र सरकारदेखील डोळे बंद करून गोवा सरकारचे कौतुक करते व गोव्यात हर घर जल यशस्वी झाल्याचे नमूद करते. 

केंद्रीय मंत्र्यांनी काल मंगळवारी बार्देश तालुक्याला भेट दिली असती तर लोक कसे बोटे मोडतात ते कळून आले असते. परवा जरा पाऊस पडताच पूर्ण रात्रभर सगळा सत्तरी तालुका अंधारात राहिला. अगदी मुख्यमंत्री सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील न्हावेली फणसवाडी येथेही पंधरा तास वीज नव्हती. थंड पाणी व वीजपुरवठा सुरळीत करू न शकणारे हे सरकार जनता दरबार भरविण्याचे धाडस तरी कसे करते असा प्रश्न पडतो. ज्या गावात रात्री वीज नसते व जिथे नळाला पाणी नसते अशा गावात जाऊन पूर्ण मंत्रिमंडळाने एक दिवस निवास करावा आणि कॅबिनेट बैठक घ्यावी असे सुचवावेसे वाटते. मुळात मंत्र्यांनी जनता दरबार भरविणे हा वांझोटा प्रयोग झाला. मंत्र्यांकडे फक्त दोन-तीन खाती असतात. ते आपल्या खात्याच्याच अधिकाऱ्यांना सूचना करू शकतात. अन्य सर्व खात्यांमध्ये ते लुडबूड करू शकत नाहीत. जनता दरबार मुख्यमंत्री सावंत यांनी नव्याने भरवावा. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात जावे आणि लोकांचे प्रश्न जे अधिकारी रेंगाळत ठेवत आहेत, त्यांच्याविरुद्ध कारवाई करून तरी दाखवावी. मंत्री काब्राल वगैरे सांगतात की, अधिकारी तांत्रिक समस्या पुढे करतात व जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ लावतात. किती वर्षे हे असे चालणार आहे?

महसूल मंत्री मोन्सेरात हे तर कूळ-मुंडकार खटले लवकर निकालात काढले जातील असे वारंवार सांगत आहेत. गेल्या वर्षभरात किती कुळांना न्याय मिळाला ते मोन्सेरात यांनी जाहीर करावे. मडगावला पत्रकारांशी बोलताना मोन्सेरात यांनी मामलेदारांकडे बोट दाखवले. कूळ कायद्यातील तरतुदींचे मामलेदारांना नीट ज्ञान किंवा आकलन नसल्याने खटले जलदगतीने निकालात निघत नाहीत, असे बाबूश म्हणाले. वास्तविक मोन्सेरात यांचे निरीक्षण खरे आहे. अनेक उपजिल्हाधिकारी व मामलेदारांना कूळ- मुंडकार कायद्यातील तरतुदींचे भानच नसल्याने लोक बिचारे फक्त खेपा मारत आहेत. सर्व मामलेदारांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था तरी मोन्सेरात यांनी करायला हवी.

जनता दरबारावेळी संबंधित तालुक्यांच्या आमदारांना व्यासपीठावर बसविण्यात आले होते. जनता दरबारावेळी लोकांच्या समस्या सुटणार नसतील तर या आमदारांनी दरबारांचा फोलपणा येत्या विधानसभा अधिवेशनात मांडावा. गरीब लोक बिचारे खूप अपेक्षेने दरबारात येतात. मंत्री आपले ऐकून घेत असल्याने आपला प्रश्न सुटेलच असे लोकांना वाटते. प्रत्यक्षात एकदा मंत्र्यांची पाठ झाली की, मग दुसऱ्या दिवसापासून अधिकारीही त्या लोकांना ओळख दाखवत नाहीत. लोकांचे प्रश्न व्यक्तिगत स्वरुपाचे असतात. कुणाची फाईलच पुढे जात नाही तर कुणाला दाखला व प्रमाणपत्रच मिळत नाही. या देखील समस्या सुटणार नसतील तर मंत्र्यांनी जनता दरबार घेण्याची थट्टा करू नये.

 

टॅग्स :goaगोवा