शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लेखाधिकारी पदांसाठीचे सर्व 8 हजार उमेदवार नापास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:57 IST

गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले.

पणजी - गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले. एकही उमेदवार पात्र ठरला नाही, असे लेखा खात्याच्या संचालकांनी अधिसूचनेद्वारे मंगळवारी येथे जाहीर केले आहे. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सात महिन्यांचा कालावधी का लागला ते मात्र स्पष्ट झालेले नाही.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लेखाधिका-यांच्या 80 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. 10 हजार 712 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. पात्र उमेदवारांसाठी गेल्या दि. 7 जानेवारीला परीक्षा झाली होती. सुमारे आठ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. प्रश्नपत्रिका खूप कठीण होती अशा प्रकारच्या तक्रारी त्यावेळी केल्या गेल्या होत्या. सरकार कदाचित आता लेखाधिकारी पदासाठी नव्याने जाहिरात करताना 80 ऐवजी कमी पदांसाठी जाहिरात करील अशी चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. 8क् पदांमध्ये 43 पदे सर्वसामान्य गटासाठी, 21 पदे इतर मागासवर्गीय, 9 अनुसूचित जमातींसाठी, 2 अनुसूचित जाती तसेच दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांची मुले व माजी सैनिकांसाठी प्रत्येकी एक पद होते. एकही उमेदवार पात्र ठरला नाही असे जाहीर केले गेले तरी, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास लागलेला विलंब ही चर्चेची गोष्ट ठरली आहे. मुख्यमंत्री अमेरिकेत असताना आता निकाल जाहीर केला गेला. सरकारने अन्य काही खात्यांमध्येही भरतीसाठी अलिकडे उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेतल्या आहेत. त्या लेखी परीक्षांचा निकाल जाहीर करतानाही विलंब लावला जाऊ शकतो. लेखाधिकारी पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल कसा लागतो हे जाणून घेण्याची उत्सुकता काही मंत्री व आमदारांमध्येही होती. शिवाय हजारो उमेदवारांचेही त्याकडे लक्ष होते. लेखा खात्याने आपली अधिसूचना खात्याच्या सूचना फलकावर लावली आहे.

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्या