शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

लेखाधिकारी पदांसाठीचे सर्व 8 हजार उमेदवार नापास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 18:57 IST

गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले.

पणजी - गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले. एकही उमेदवार पात्र ठरला नाही, असे लेखा खात्याच्या संचालकांनी अधिसूचनेद्वारे मंगळवारी येथे जाहीर केले आहे. परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सात महिन्यांचा कालावधी का लागला ते मात्र स्पष्ट झालेले नाही.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लेखाधिका-यांच्या 80 पदांसाठी जाहिरात देण्यात आली होती. 10 हजार 712 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. पात्र उमेदवारांसाठी गेल्या दि. 7 जानेवारीला परीक्षा झाली होती. सुमारे आठ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती. प्रश्नपत्रिका खूप कठीण होती अशा प्रकारच्या तक्रारी त्यावेळी केल्या गेल्या होत्या. सरकार कदाचित आता लेखाधिकारी पदासाठी नव्याने जाहिरात करताना 80 ऐवजी कमी पदांसाठी जाहिरात करील अशी चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. 8क् पदांमध्ये 43 पदे सर्वसामान्य गटासाठी, 21 पदे इतर मागासवर्गीय, 9 अनुसूचित जमातींसाठी, 2 अनुसूचित जाती तसेच दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांची मुले व माजी सैनिकांसाठी प्रत्येकी एक पद होते. एकही उमेदवार पात्र ठरला नाही असे जाहीर केले गेले तरी, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यास लागलेला विलंब ही चर्चेची गोष्ट ठरली आहे. मुख्यमंत्री अमेरिकेत असताना आता निकाल जाहीर केला गेला. सरकारने अन्य काही खात्यांमध्येही भरतीसाठी अलिकडे उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेतल्या आहेत. त्या लेखी परीक्षांचा निकाल जाहीर करतानाही विलंब लावला जाऊ शकतो. लेखाधिकारी पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल कसा लागतो हे जाणून घेण्याची उत्सुकता काही मंत्री व आमदारांमध्येही होती. शिवाय हजारो उमेदवारांचेही त्याकडे लक्ष होते. लेखा खात्याने आपली अधिसूचना खात्याच्या सूचना फलकावर लावली आहे.

टॅग्स :examपरीक्षाnewsबातम्या