शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

६४ नव्हे, फक्त चार घरे पाडावी लागणार! भोमप्रकरणी पुनर्वसनासाठी सरकार कटिबद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:31 IST

या सर्व्हे क्रमांकात जिथे कोणतेही बांधकाम नाही, तीच जागा सरकार वापरणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भोम राष्ट्रीय महामार्ग विस्तारासाठी ६४ नव्हे, तर चारच घरे पाडावी लागणार आहेत. या घर मालकांना पुनर्वसनासाठी भोमातच प्रत्येकी ३०० चौरस मीटर जमीन व घर बांधण्यासाठी सरकार पैसे देईल. मंदिरांना हात लावणार नाही. १९९१ साली सरकारने संपादित केलेल्या जागेत आलेली १६ ते १७ बेकायदा बांधकामे मात्र पाडणार असून, त्यांचे पुनर्वसन भोम येथेच केले जाईल.

सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर प्रेझेंटेशन करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, भोममधील सर्वे क्रमांक ६ मधील सर्व ६४ घरांना नोटिसा पाठविलेल्या आहेत. कारण कायद्याने त्या पाठवाव्या लागतात. या घरांना हात लावला जाणार नाही. या सर्व्हे क्रमांकात जिथे कोणतेही बांधकाम नाही, तीच जागा सरकार वापरणार आहे.

अतिरिक्त चार घरे मात्र पाडावी लागतील. बांधकाम खात्याने १९९१ साली महामार्ग रुंदीकरणासाठी म्हणून रस्त्यालगतची जागा संपादित केली होती. या जागेत गाडे, सर्व्हिस सेंटर व इतर मिळून १६ ते १७ बेकायदा बांधकामे आलेली आहेत. ही अतिक्रमणे पाडली गाडेवाल्यांना किंवा कोणालाही सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. या सर्वांचे भोम येथेच जमीन देऊन पुनर्वसन केले जाईल.

काब्राल म्हणाले, महादेव मंदिर असो किंवा सातेरी मंदिर असो कुठल्याही मंदिराला हात लावला जाणार नाही. काळी माती येथून उड्डाणपूल सुरू होईल आणि मंदिरे ओलांडल्यावरच तो पुढे खाली येईल सर्वे क्रमांक ११/१ मध्ये मल्लिकार्जुन देवस्थान आहे, तेथेही हात लावला जाणार नाही.

दरम्यान, भोम येथील राष्ट्रीय महामार्गाच्या विषयावरून सध्या तणावाचे वातावरण आहे. विरोधकांनी हा विषय उचलून धरत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे सरकारकडून या महामार्गाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री गोविंद गावडे यांनीही भोमवासीयांची भेट घेऊन चर्चा केली होती. यावेळी त्यांनी लोकांना सरकार तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील दिली होती. ६४ घरांना नोटिसा आल्यानंतर भोमामध्ये रहिवाशांत तीव्र संताप आहे. रविवारी जाहीर सभेत आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात मतदान करण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला होता.

काब्राल यांनी असा आरोप केला की, काही राजकारणी भोम येथे येऊन स्थानिकांना चिथावणी देत असतात. याला स्थानिकांनी बळी पडू नये. अभियंत्यांना सोबत घेऊन रहिवाशांना सर्व काही पटवून देण्याची माझी तयारी आहे. हवे तर ग्रामसभेतही प्रेझेंटेशन देईन, असे त्यांनी सांगितले. काही विरोध भोमवासीयांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. लोकांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. सरकार लोकांच्या हिताचा विचार करत असून कोणताही अन्याय करणार नाही, असेही ते म्हणाले.

बगल मार्ग अशक्य: काब्राल

काब्राल म्हणाले की, भोमावासीय मागणी करीत असले तरी बगल मार्ग अशक्य आहे. सरकारने महामार्ग रुंदीकरणास | १९९१ साली जमीन संपादित केलेली आहेत. त्यानंतर तेथे अतिक्रमणे आलेली आहेत. गाडे, सर्व्हिस सेंटर व इतर बेकायदा बांधकामे पाडावी लागतील.

 

टॅग्स :goaगोवा