शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अहवालाशिवाय वाळू उपसा नाही: मुख्यमंत्री, राज्यात वाळू टंचाई कायम राहण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 15:33 IST

वाळू टंचाईची समस्या कायम राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : एनआयओचा अहवाल आल्याशिवाय वाळू उपशाला परवाने देणार नाही असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. राज्यात यामुळे वाळू टंचाईची समस्या कायम राहणार आहे.

दरम्यान, पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, एनआयओने केवळ शापोरा नदीबाबतीत अहवाल दिलेला आहे. अन्य ठिकाणच्या संदर्भात अजून अहवाल यायचे आहेत. ते आल्याशिवाय सरकार कोणताच निर्णय घेऊ शकणार नाही. सध्या शेजारी राज्यातून वाळू आणली जाते. परंतु त्या गाड्या अडविण्याचेही प्रकार घडले आहेत. त्यावर तोडगा काढू.' एनआयओकडे झुवारी तसेच अन्य नद्यांमध्ये वाळू उपशासाठी अभ्यास अहवाल तयार करण्याची जबाबदारी आहे. हे अहवाल सरकारला यावयाचे आहेत. प्रकरण उच्च न्यायालयासमोर असल्याने अहवाल येण्यापूर्वी परवाने दिल्यास त्यांना कायदेशीर महत्व राहणार नाही, असे सावंत म्हणाले.

दरम्यान, खाण खात्याने एप्रिलमध्ये शापोरा नदीच्या सात विभागांत वाळू उपशासाठी अर्ज मागवले. परंतु प्रकरण हायकोर्टात व राष्ट्रीय हरित लवादाकडे पडून आहे. व्यवसायिकांना परवाने मिळू शकलेले नाहीत. दुसरीकडे हायकोर्टाने ही अवैध वाळू उपशावरून ताशेरे ओढल्यानंतर खाण खात्याने १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गोव्याचा अर्थसंकल्प

दरम्यान, राज्य सरकारचा पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर केला जाईल. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तू सादर करू, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नावर सांगितले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येण्याआधीच आम्ही आमचा अर्थसंकल्प जाहीर करू शकतो, असेही ते म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सूचित केले आहे की, केंद्राचा आगामी अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत