शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 20:22 IST

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

मडगाव - गोव्यात सुरू झालेल्या कोळशा विरोधातील आंदोलनाला सासष्टीत चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवारी केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

या आंदोलनाला गोवा फॉरवर्डनेही पाठिंबा दिला असून सोमवारी या रॅलीत आमदार विजय सरदेसाई यांनीही भाग घेतला. गोव्याच्या पर्यावरणाला घातक असलेल्या सर्व प्रकल्पना आपल्या पक्षाचा विरोध असेल असे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी दुपारी हे आंदोलन सुरू केलेल्या 'गोयांत कोळसो नाका' या संघटनेच्या पदधिकाऱ्यानी  विजय सरदेसाई यांची भेट घेऊन सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी कसा घातक हे सांगणारे निवेदन दिले.

ही रॅली फातोर्ड येथील रोजरी चर्च जवळून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला वळसा घालून बोर्डा  मार्गे आल्यानंतर मडगाव येथून आके, कोकण रेल्वे परिसराला वळसा घालून मडगाव शहरात तिची समाप्ती करण्यात आली. कोळसा वाहतूकीला गोवा राज्यातून  निषेध करण्यासाठी ही चळवळ या संघटनेकडून उभारण्यात आली आहे. या बरोबरच या संघटनेने दुहेरी रेल्वे मार्गालाही विरोध केला आहे. हे आंदोलन तीव्र करण्यासाठी दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक गावात जागृती करण्याकरिता रॅलीचे आयोजन  केले आहे.

याची सुरुवात गिर्दोली चांदर पासून  त्यांनी केली होती. या नंतर गोव्यातील प्रत्येक गावात ही रॅली जाणार असून या दरम्यान या प्रकल्पा पासून गोव्यातील वन संपदा नष्ट होईल तसेच पर्यावरण हानी होणार असल्याचे लोकांना सांगण्यात येणार असल्याचे या संघटनेचे संयोजक आंतोनियो डिसिल्वा यांनी सांगितले.

पुढे ते बोलताना म्हणाले की ही कुठलीही राजकीय चळवळ नाही. आम्ही या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील जनतेला कुठलाही फायदा नाही. या प्रकल्पामुळे कोळसा रेल्वे मार्गावरून कर्नाटक येथे जाणार आहे. या रेल्वेच्या प्रकल्पा बद्दल केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी गोव्यातील जनतेला अंधारात ठेवले आहे.चांदर येथील फेलिक्स फुर्तादो यांनी सांगितले की या रेल्वे वाहतुकीत हरित गोव्याचे  अस्तित्व धोक्यात येणार आहे. या रेल्वेतून दर दिवशी कोळसा वाहतूक होणार आहे. या दरम्यान उडणारे कण सभोवतीच्या परिसरात पसरणार आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे असल्याचे शेवटी त्याने सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा