शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गोंयात कोळसो नाका आंदोलन, मडगाव-फातोर्डात उत्स्फूर्त पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 20:22 IST

केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

मडगाव - गोव्यात सुरू झालेल्या कोळशा विरोधातील आंदोलनाला सासष्टीत चांगला प्रतिसाद मिळत असून सोमवारी केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मडगाव व फातोर्डा येथे काढलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.

या आंदोलनाला गोवा फॉरवर्डनेही पाठिंबा दिला असून सोमवारी या रॅलीत आमदार विजय सरदेसाई यांनीही भाग घेतला. गोव्याच्या पर्यावरणाला घातक असलेल्या सर्व प्रकल्पना आपल्या पक्षाचा विरोध असेल असे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी दुपारी हे आंदोलन सुरू केलेल्या 'गोयांत कोळसो नाका' या संघटनेच्या पदधिकाऱ्यानी  विजय सरदेसाई यांची भेट घेऊन सागरमाला प्रकल्प गोव्यासाठी कसा घातक हे सांगणारे निवेदन दिले.

ही रॅली फातोर्ड येथील रोजरी चर्च जवळून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला वळसा घालून बोर्डा  मार्गे आल्यानंतर मडगाव येथून आके, कोकण रेल्वे परिसराला वळसा घालून मडगाव शहरात तिची समाप्ती करण्यात आली. कोळसा वाहतूकीला गोवा राज्यातून  निषेध करण्यासाठी ही चळवळ या संघटनेकडून उभारण्यात आली आहे. या बरोबरच या संघटनेने दुहेरी रेल्वे मार्गालाही विरोध केला आहे. हे आंदोलन तीव्र करण्यासाठी दोन ऑक्टोबर पासून प्रत्येक गावात जागृती करण्याकरिता रॅलीचे आयोजन  केले आहे.

याची सुरुवात गिर्दोली चांदर पासून  त्यांनी केली होती. या नंतर गोव्यातील प्रत्येक गावात ही रॅली जाणार असून या दरम्यान या प्रकल्पा पासून गोव्यातील वन संपदा नष्ट होईल तसेच पर्यावरण हानी होणार असल्याचे लोकांना सांगण्यात येणार असल्याचे या संघटनेचे संयोजक आंतोनियो डिसिल्वा यांनी सांगितले.

पुढे ते बोलताना म्हणाले की ही कुठलीही राजकीय चळवळ नाही. आम्ही या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास केला आहे. या प्रकल्पामुळे गोव्यातील जनतेला कुठलाही फायदा नाही. या प्रकल्पामुळे कोळसा रेल्वे मार्गावरून कर्नाटक येथे जाणार आहे. या रेल्वेच्या प्रकल्पा बद्दल केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी गोव्यातील जनतेला अंधारात ठेवले आहे.चांदर येथील फेलिक्स फुर्तादो यांनी सांगितले की या रेल्वे वाहतुकीत हरित गोव्याचे  अस्तित्व धोक्यात येणार आहे. या रेल्वेतून दर दिवशी कोळसा वाहतूक होणार आहे. या दरम्यान उडणारे कण सभोवतीच्या परिसरात पसरणार आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहे असल्याचे शेवटी त्याने सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा