शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा; काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 08:17 IST

सिक्वेरा यांच्या डोक्यावर मंत्रिपदाचा भरजरी मुकूट घातला गेला. 

काँग्रेस पक्षातून जे आठ आमदार गेल्या वर्षीं भाजपमध्ये आले, त्यांच्यापैकी दोघांना तरी मंत्रिपद दिले जाईल हे स्पष्ट होतेच. तूर्त काल एकाला मंत्रिपद दिले गेले. आलेक्स सिक्वेरा यांची राजकीय कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. अशावेळी भाजपने आपला तथाकथित शब्द राखण्यासाठी म्हणून काल आलेक्स यांना मंत्रिपद दिले. त्यासाठी चक्क बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला. काब्राल आज ५१ वर्षांचे आहेत आणि नवे मंत्री सिक्वेरा ६४ वर्षांचे आहेत. एक थकलेला नेता मंत्री म्हणून स्वीकारा असे भाजपने गोमंतकीयांना सांगितल्यासारखे झाले आहे. कार्यक्षमतेबाबतही काब्राल आणि सिक्वेरा यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही. बाबूश मोन्सेरात किंवा माविन गुदिन्हो यांच्या पदांना हात न लावता कुडचडेचे आमदार काब्राल यांना पायउतार होण्यास भाग पाडले गेले. सिक्वेरा यांच्या डोक्यावर मंत्रिपदाचा भरजरी मुकूट घातला गेला. 

अनेकांना कुडचडे मतदारसंघात तरी काल कदाचित पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा हे गाणे आठवले असेल. काब्राल हे काही सर्वगुणसंपन्न होते किंवा आहेत असे नाही. पण भाजप सरकारमधील सध्याच्या काही अकार्यक्षम मंत्र्यांसारखे तरी काब्राल निष्क्रिय नव्हते. विषयांची, प्रश्नांची चांगली समज त्यांना मंत्री या नात्याने होती. बांधकाम खात्यातील कायमची वादग्रस्त नोकर भरती हा वेगळा विषय आहे. सध्या सज्जनांसारखे दाखविणारे अनेक मंत्री कोणते पराक्रम करत आहेत हे गोमंतकीय जनतेला ठाऊक आहे. काब्राल हे स्पष्ट बोलणारे व काहीवेळा अती बोलून वाद ओढवून घेणारे होते. पण ते वर्कहोलिक होते व आहेत हे मान्य करावे लागेल. आपल्या खात्यातील अधिकारी, अभियंते काम करत नाहीत असे आढळून आले की भर बैठकीत त्यांना फैलावर घेणारे काब्राल होते. काम व्हायलाच हवे असा त्यांचा आग्रह असायचा. कुडचडे मतदारसंघातून त्यामुळेच ते तीनवेळा निवडून येऊ शकले हे कबूल करावे लागेल.

काब्राल परवा नाराजीने बोलले की आपल्याविरुद्ध बलात्कार किंवा भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद नाही. म्हणजे त्यांना सुचवायचे होते की ज्यांच्याविरुद्ध असे गुन्हे आहेत, त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला केले जात नाही पण आपल्याला गुड बाय केले जात आहे. काब्राल यांची खंत खरीच आहे. त्यामुळेच भाजपा, अजब तुझे सरकार म्हणावे लागेल. देशभरच सध्या मूळ भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे.

निष्ठावान भाजप कार्यकर्ते व नेते यांना पक्षात सध्या अंग चोरून बसावे लागत आहे आणि जे दिगंबर कामत, आलेक्स किंवा संकल्प आमोणकर वगैरे पक्षात येतात त्यांची आरती गावी लागत आहे. काब्राल यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचे काम भाजपच्या केंद्रीय श्रेष्ठींनी केले पण बाबूशसारखे जे मंत्री भाजप संघटनेचे काम देखील करत नाहीत किंवा मुख्यमंत्री आले तरी आपण पणजीतील कार्यक्रमांना येत नाहीत, त्यांना पक्षाकडून निवडणुकीवेळी दोन तिकिटे दिली जातात. त्यासाठी मग मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांच्यावर देखील अन्याय केला जातो. काल काब्राल यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या सूचनेवरून राजीनामा दिला व मग त्यांनी मनोहर पर्रीकर यांची आठवण काढली, आपण पर्रीकर यांच्यामुळे भाजपमध्ये आलो होतो. तीनवेळा आमदार झालो व पक्षाने आदेश देताच मंत्रिपद सोडले असे काब्राल म्हणाले. 

२०१२ साली विधानसभा निवडणुकीत पर्रीकर यांची लाट आली होती. त्यावेळीच प्रथम काब्राल, मायकल लोबो, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ग्लेन टिकलो वगैरे निवडून आले. आलेक्स सिक्वेरा यांना सिंहासनावर बसविले म्हणून लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपची मते वाढतील असे कुणीच समजू नये. तसे होणार नाही हे पक्षालाही ठाऊक असेल. यापुढे दिगंबर कामत किंवा आणखी कुणाला मंत्रिपद देण्यासाठी सध्याच्या मंत्र्यांना हात लावला गेला तर मात्र सावंत यांच्या नेतृत्वाविरुद्ध असंतोष वाढू शकतो. तूर्त आलेक्सना मणीहार दिला तेवढे पुरे!

 

टॅग्स :goaगोवा