शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

माझे तिकीट लोक ठरवतील, पक्ष नव्हे! नीलेश काब्राल यांची आक्रमक भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 11:03 IST

लोकसभेसाठी राज्यभर फिरलो असतो, आता मर्यादा

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: माझे तिकीट लोक ठरवतील पक्ष नव्हे, असे रोखठोक विधान मंत्रिमंडळातून डच्चू दिलेले आमदार नीलेश काब्राल यांनी केले आहे. ते आता हळूहळू आक्रमक बनत असल्याचे एकूणच त्यांच्या विधानांवरुन स्पष्ट होत आहे.

एका मुलाखतीत बोलताना काब्राल म्हणाले की, कुडचडे मतदारसंघात भाजपच्या तिकिटावर मी सुरुवातीला निवडणूक लढवली ती लोकांच्या जीवावरच तेव्हा भाजपसाठी जेमतेम दीडेक वर्षच मी काम केले होते. परंतु लोक माझ्यासोबत आहेत हे पाहूनच पक्षाने त्यावेळी मला उमेदवारी दिलेली.कुडचडेत भाजपमध्ये पर्यायी नेतृत्व तयार करण्याच्या हालचाली चालू असल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता काब्राल म्हणाले की, कोणीही आले तरी माझे स्थान भक्कम आहे. माझ्यासोबत लोक आहेत. माझी परिस्थिती इतरांसारखी होणार नाही. उलट आता मी मंत्री नाही. त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. मतदारसंघात माझी पाळेमुळे आणखी मजबूत करण्यासाठी वावरेन.

एका प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मंत्रिपदावरुन मला काढले तरी मी भाजपसोबतच आहे हे मी मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. मंत्री असतो तर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराच्या प्रचारासाठी गोवाभर फिरलो असतो. आता आमदार म्हणून माझे कार्यक्षेत्र केवळ मतदारसंघापुरते मर्यादित आहे.

बांधकाम खात्यातील भरती प्रकरणी कथित घोटाळ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, पैसे घेऊन नोकऱ्या देण्याची माझी वृत्ती नाही. राजीनामा दिल्यानंतर हजारो मेसेज राज्यभरातून आले. भरतीबद्दल माझे विरोधकही मला क्लीन चिट देतात. खिस्ती आमदाराला मंत्री बनविण्यासाठी ख्रिस्ती मंत्र्याला वगळणे हे योग्य आहे का?, असा प्रश्न केला असता काब्राल म्हणाले की, असे भाजपत कधी घडले नाही. पायउतार होण्यास सांगितल्यावर मी मुकाट्याने मान्य करणार हे माहीत होते म्हणून कदाचित मला सांगितले असावे. 

काब्राल यांनी आपल्याविरुद्ध कारस्थान शिजल्याचा आरोप केला होता त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ज्या पद्धतीने मला थेट केंद्राकडून पायउतार होण्यास सांगितले त्यावरुन गोव्यातूनच माझ्याबाबत कारस्थान शिजले व केंद्रीय नेत्यांचे कान भरल्याचे स्पष्ट होते. मी रोखठोक बोलतो म्हणून माझा काटा काढला असावा. एक लक्षात ठेवा, मी संघाचा नसलो तरी राष्ट्रवाद अंगात भिनलेला आहे. तामनार, दुहेरी रेल्वे मार्ग, कचरा प्रकल्प यामुळे माझी मते कमी झाली. परंतु राष्ट्रीय प्रकल्पांबाबत कधी माघार घेतली नाही.

लोकसभेसाठी मी नाही

लोकसभा उमेदवारी दिली तर स्वीकारणार का?, या प्रश्नावर काब्राल म्हणाले की, मी आमदार म्हणूनच समाधानी आहे. लोकसभेचा वगैरे विचार करत नाही. अजून मी तरुण आहे आणि तळागाळात वावरण्याची माझी तयारी आहे. कुडचडे मतदारसंघाचा मतदार नसतानाही मला लोकांनी निवडून आणले. मी केंद्रात वगैरे जाऊ नये, असे लोकांनाही वाटते. मी माझ्या मतदारसंघातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण