शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोव्यात एनजीटीकडून पंचायतराज कायद्याचा अनादर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 17:59 IST

राष्ट्रीय हरित लवाद हा घटनेच्या ७३ व्या कलमातील दुरुस्तीचा आदर राखत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला. पंचायतराज दुरुस्ती १९९४ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले अधिकार लवादाला मान्य नाहीत असाही त्याचा अर्थ होत असल्याचे ते म्हणाले. 

पणजी: राष्ट्रीय हरित लवाद हा घटनेच्या ७३ व्या कलमातील दुरुस्तीचा आदर राखत नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी केला. पंचायतराज दुरुस्ती १९९४ अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले अधिकार लवादाला मान्य नाहीत असाही त्याचा अर्थ होत असल्याचे ते म्हणाले. भरती रेषेपासून १०० मीटर अंतरापर्यंत बांधकामाला परवानगी नाकारण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिल्यामुळे पारंपरिक मच्छिमार समाजातील लोकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. हा आदेश मच्छिमारांचे अधिकार नाकारणारा आहे. ७३ व्या घटना दुरुस्तीचा मान न राखणारा आहे असे नाईक यांनी सांगितले. पंचायतराज दुरुस्ती १९९४ अंतर्गत स्थानिक स्वराज  संस्थांना अधिकार देण्यात आले आहेत. बांधकामांना परवानगी देणे किंवा न देणे हे स्थानिक ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करून घटना दुरुस्तीचाच अनादर लवादाने करू नये असे त्यांनी सांगितले. माजी केंद्रीय पयावरण मंत्री जयराम  रमेश यांनी गोव्यातील काही किनारी भागात जाऊन पाहणी केली होती. लोकांची समस्या जाणून घेऊन राष्ट्रीय घेऊन ६ जानेवारी २०११ रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्यात  मच्छिमारांच्या हिताची काळजी घेण्यात आली होती. तसेच कासव संवर्धन, खारफुटी वाळुच्या टेकड्या, खाण जमिनी यांच्या संवर्धनाचीही तरतूद होती. राज्य सरकारला त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यास सांगितले होते. परंतु ते काम सरकारने आजपर्यंत करण्यात आले नसल्यामुळे आता लोकांना समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे ते म्हणाले. गोव्यात वाहतूकीचा खोळंबा झाला असून प्रशासनाचे लक्ष नसल्याचा आरोप नाईक यांनी केला. वाहतूक सेवा वारंवार बिघडत असल्यामुळे पर्यटकही नाराज होतात. सामान्य माणसाला सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. वरिष्ठ वाहतूक अधिका-यांना वाहतूक नियंत्रण करण्यास सांगण्या ऐवजी तालांव मारण्याचे काम दिले जाते. त्यांना टार्गेट दिले जात असल्यामुळे तालांव देण्याऐवजी दुसरे काम ते करू शकत नाहीत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था बिघडत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान याच पत्रकार परिषदेत गुजरातच्या आर्चबिशपना निवडणूक आयोगाने नोटीस बजावल्यामुळे कॉंग्रेसचे नेते आल्तीन गोम्स यांनी आयोगाचा निषेध केला.

टॅग्स :goaगोवा