शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोव्यात नव्याने होणार व्याघ्रगणना, पर्यावरणप्रेमींमध्ये उत्कंठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 13:01 IST

गोव्यात येत्या महिन्यापासून नव्याने व्याघ्रगणना होणार आहे.

पणजी : गोव्यात येत्या महिन्यापासून नव्याने व्याघ्रगणना होणार आहे. गोव्याच्या जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्त्व आहे, असा जो दावा पर्यावरणप्रेमींकडून होत आहे त्याला या गणनेतून पुष्टी मिळते का याबाबत उत्सुकता आहे.राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणातर्फे १८ राज्यांमध्ये २0१८ची व्याघ्रगणना होणार आहे. या सर्वेक्षणासाठी जंगलांमध्ये कॅमेऱ्यांचा वापर केला जाईल. 

गोव्याच्या जंगलात वाघ इतर भागातून आले की येथेच त्यांचा राबिता आहे, हेही या सर्वेक्षणातून स्पष्ट होईल. ५0 वाघांची संख्या आढळल्यास संबंधित जंगलक्षेत्र हे वाघांचा निवास असलेले हॅबिटेट मानले जाते. गोव्याला कर्नाटक व महाराष्ट्र या शेजारी राज्यांची जेगल हद्द आहे. या शिवाय दोडामार्ग, राधानगरी अभयारण्य आदी भाग वाघ संवर्धन युनिट मानले जातात.

एप्रिल २0१७ मध्ये गोव्याच्या जंगलात पाच वाघ आढळून आले होते. यात दोन नर जातीचे, दोन मादी जातीच्या तर दोन वाघांचे बछडे आढळून आले होते. २00२ साली राज्यात प्रथम वाघांचे अस्तित्त्व दिसून आले. म्हादई अभयारण्यात राज्य वन खात्याने केलेल्या सर्वेक्षणात हे आढळून आले. त्यानंतर २00६ आणि २0१0 च्या सर्वेक्षणातही या भागात वाघांचे अस्तित्त्व दिसून आले. 

जंगलात कॅमेरे लावून छायाचित्रे टिपण्याची आधुनिक पध्दत अवलंबण्यात येत आहे. एप्रिल २0१३ मध्ये गोव्याच्या म्हादई खोºयात डोंगुर्ली पंचायत क्षेत्रात येणाऱ्या वन क्षेत्रात वाघीण आढळून आली होती तर जानेवारी आणि मार्च २0१४ मध्ये वाघ आणि वाघिणीचे अस्तित्त्व आढळून आले होते. नव्याने होणाऱ्या सर्वेक्षणाबद्दल पर्यावरणप्रेमींमध्येही उत्कंठा आहे.