शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

हायकोर्टाच्या तत्त्वांनुसार 'टीसीपी'चे नवे अधिनियम बनवणार: विश्वजित राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 11:46 IST

नगर नियोजन कायद्याच्या वादग्रस्त दुरुस्तींच्या मुद्द्यावरून पिछेहाट झाल्यानंतर सरकारने आता नवीन भूमिका घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नगर नियोजन कायद्याच्या १७(२) दुरुस्ती संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालात आव्हान द्यायला घाई करणार नाही. त्या ऐवजी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून नव्याने अधिनियम बनविणार असल्याची माहिती नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

नगर नियोजन कायद्याच्या वादग्रस्त दुरुस्तींच्या मुद्द्यावरून पिछेहाट झाल्यानंतर सरकारने आता नवीन भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या निर्णयाच्या बाबतीत सरकार घाई करणार नाही. त्याऐवजी न्यायालयाच्या आदेशात उल्लेख केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून अधिनियम बनवून ते अधिसूचित करण्यात येणार आहेत असे नगर नियोजन मंत्री राणे यांनी शनिवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. उच्च न्यायालयाने कायद्यातील सर्वच नियम चुकीचे ठरविलेले नाहीत. तसेच १७ (२) रद्दबातल ठरविण्याची याचिकादाराची मागणीही मंजूर करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. उलट न्यायालयाने बऱ्याच बाबतीत सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी नगर नियोजन मंडळाची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन न करता लोकांना न्याय कसा देता येईल या संबंधी निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.

गोवा फाउंडेशन खुश असेल तर...

न्यायालयाने सरकारच्या निर्णयाचे आपण समर्थन केले आहे. नगर नियोजन दुरुस्ती कायदा कलम ३९ (ए) संदर्भातही प्रशंसोद्‌गार काढले आहेत. १७ (२) बाबतीत सरकार न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करीत असून गोवा फाउंडेशननेही तो करावा. त्यांना हवे ते मिळाले असे वाटत असेल तर त्यांनी निवाड्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ नये, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. सरकारने उच्च न्यायालयाच्या निवाड्याला आव्हान दिले जाईल, असे सांगितले होते. मात्र बैठकीत आव्हान देण्यासंबंधी घाई न करण्याचे ठरले आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा