शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

हायकोर्टाच्या तत्त्वांनुसार 'टीसीपी'चे नवे अधिनियम बनवणार: विश्वजित राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 11:46 IST

नगर नियोजन कायद्याच्या वादग्रस्त दुरुस्तींच्या मुद्द्यावरून पिछेहाट झाल्यानंतर सरकारने आता नवीन भूमिका घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नगर नियोजन कायद्याच्या १७(२) दुरुस्ती संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालात आव्हान द्यायला घाई करणार नाही. त्या ऐवजी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून नव्याने अधिनियम बनविणार असल्याची माहिती नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

नगर नियोजन कायद्याच्या वादग्रस्त दुरुस्तींच्या मुद्द्यावरून पिछेहाट झाल्यानंतर सरकारने आता नवीन भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयांच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या निर्णयाच्या बाबतीत सरकार घाई करणार नाही. त्याऐवजी न्यायालयाच्या आदेशात उल्लेख केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून अधिनियम बनवून ते अधिसूचित करण्यात येणार आहेत असे नगर नियोजन मंत्री राणे यांनी शनिवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. उच्च न्यायालयाने कायद्यातील सर्वच नियम चुकीचे ठरविलेले नाहीत. तसेच १७ (२) रद्दबातल ठरविण्याची याचिकादाराची मागणीही मंजूर करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. उलट न्यायालयाने बऱ्याच बाबतीत सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी नगर नियोजन मंडळाची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन न करता लोकांना न्याय कसा देता येईल या संबंधी निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.

गोवा फाउंडेशन खुश असेल तर...

न्यायालयाने सरकारच्या निर्णयाचे आपण समर्थन केले आहे. नगर नियोजन दुरुस्ती कायदा कलम ३९ (ए) संदर्भातही प्रशंसोद्‌गार काढले आहेत. १७ (२) बाबतीत सरकार न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करीत असून गोवा फाउंडेशननेही तो करावा. त्यांना हवे ते मिळाले असे वाटत असेल तर त्यांनी निवाड्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ नये, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. सरकारने उच्च न्यायालयाच्या निवाड्याला आव्हान दिले जाईल, असे सांगितले होते. मात्र बैठकीत आव्हान देण्यासंबंधी घाई न करण्याचे ठरले आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा