शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कायद्यांची गोव्यात प्रभावी अंमलबजावणी करु: मुख्यमंत्री;  अमित शाह यांना दिली बैठकीत ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 12:18 IST

केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन तसेच केंद्रीय गृह खात्याचे अन्य वरिष्ठ अधिकारी, गोव्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवीन फौजदारी कायद्यांच्या गोव्यात चाललेल्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून माहिती घेतली व काही महत्त्वाच्या सूचना त्यांना केल्या. काल, सायंकाळी दिल्लीत शाह यांनी बैठक घेतली. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन तसेच केंद्रीय गृह खात्याचे अन्य वरिष्ठ अधिकारी, गोव्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ च्या अंमलबजावणीत काही अडचणी येत आहेत का? याबद्दल शाह यांनी जाणून घेतले. तसेच नव्या फौजदारी कायद्याखाली किती गुन्हे नोंद झाले याची माहितीही घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, शाह यांनी बैठकीत या नव्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देताना हे परिवर्तनकारी कायदे लोकांना वेळेवर न्याय सुनिश्चित करण्यासाठी तयार केले गेले आहेत, असे स्पष्ट केले. गोव्याने या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करून मानदंड स्थापित करण्याचे आवाहनही शाह यांनी केले.

दरम्यान, न्याय टिकवून ठेवण्यासाठी तसेच लोकांसाठी कायदेशीर चौकट मजबूत करण्यासाठी या कायद्यांची राज्य सरकार प्रभावी अंमलबजावणी करील व तसे उदाहरण घालून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. म्हार्दोळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत महिलेची सोनसाखळी हिसकावून पलायन करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ खाली गुन्हा नोंदवून राजेश मापारी याला पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्याला ४८ दिवसांची साधी कैद फर्मावली.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौऱ्यात द एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटला (टेरी) भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शाश्वत शेती, ऊर्जा कार्यक्षमता, पर्यावरण संवर्धन या बाबतीत गोव्यात या संस्थेच्या मदतीने काय करता येईल यावर चर्चा झाली.

अधिकृत माहितीनुसार, नवीन फौजदारी कायदे अंमलात आल्यापासून गेल्या ८ महिन्यांच्या काळात तीन कायद्याखाली मिळून २१ जणांना शिक्षा झाली. एकूण १२३२ गुन्हे या नव्या कायद्यांखाली नोंद झाले. १ जुलै २०२४ पासून हे कायदे अंमलात आले आहेत. पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी अलीकडेच प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, शिक्षा झालेल्या २१ प्रकरणांमध्ये सहा प्रकरणे घरांमधील चोऱ्यांची होती. दोन प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्यांनीच चोरी केली होती. तीन प्रकरणे सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणे तर एक प्रकरण अपहरण तथा बलात्काराचे होते.

ई-समन्स लागू करा : शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत गोव्याला ३१ मार्चपर्यंत ई-समन्स लागू करण्याचे निर्देश दिले. गंभीर गुन्ह्यांसाठी २० टक्के प्रकरणांमध्ये आरोप सिद्ध होऊन शिक्षा व्हायला हवी, असे लक्ष्यही निश्चित केले तसेच ई-साक्ष प्लॅटफॉर्मवर सर्व तपास अधिकाऱ्यांची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.

कुमारस्वामींशी चर्चा

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय अवजड उद्योग तथा पोलादमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचीही भेट घेऊन चर्चा केली. गोव्यात मोठे उद्योग यावेत यासाठी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने सहकार्य करावे, अशी मागणी सावंत यांनी त्यांच्याकडे केली.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAmit Shahअमित शाह