शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

१ एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष; शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 11:45 IST

सहावी ते दहावी व बारावीचे वर्ग सकाळी ११.३० वाजेपर्यंतच भरणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: इयत्ता सहावी ते दहावी व बारावीसाठी नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. एप्रिलमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत वर्ग चालतील. १ मे ते ३ जून उन्हाळी सुट्टी असेल, असे शिक्षण खात्याकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

सर्व सरकारी, अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांसाठी हे परिपत्रक लागू असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले आहे. एप्रिलमध्ये गोव्यात कडक उन्हाळा असतो, त्यामुळे वर्ग सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंतच चालतील. १ मे ते ३ जून अशा उन्हाळी सुट्टीनंतर ४ जूनपासून सर्व इयत्तांचे वर्ग नेहमीच्या वेळेतच सुरू होतील. शाळा व्यवस्थापनांनी परिपत्रक सूचना फलकावर लावावे. तसेच सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याची माहिती द्यावी. पहिल्या टप्प्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठीच हा नवा बदल लागू केल्याचे पत्रकात म्हटले आहे.

'अपार' नाही तर लाभ नाही

यापुढे शाळा बदलताना किंवा अन्य राज्यात शाळेत प्रवेश घेताना अपार आयडी क्रमांकाचा उल्लेख करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक राहील, असे आणखी एक परिपत्रक शिक्षण खात्याने काढले आहे. मोफत पाठ्यपुस्तके, माध्यान्ह आहार तसेच सरकारच्या इतर सवलती मिळवण्यासाठीही अपार आयडी अनिवार्य असल्याचे परिपत्रकात म्हटले असून या अनुषंगाने शाळा व्यवस्थापनांनी विनाविलंब विद्यार्थ्यांना अपार आयडी क्रमांक देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश दिले आहेत.

पाचवीचा वर्ग जूनमध्येच

या निर्णयामुळे गोवा शालान्त मंडळ केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या तत्त्वावर कार्यरत राहणार आहे. या निर्णयामुळे मे महिन्यात दिल्या जाणाऱ्या सुट्टीवरही काहीच परिणाम होणार नाही. मे महिना हा सुट्टीचाच असेल. परंतु एप्रिल महिन्यातच मुलांना पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यास सुरूवात होणार आहे. सध्या तरी प्राथमिक इयत्तेचे वर्ग  एप्रिलमध्ये सुरू न करता जूनमध्येच ते सुरू करण्याचे धोरण कायम ठेवले आहे, अशी माहिती शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दिली. यापूर्वी शैक्षणिक वर्ष ४ जूनमध्ये सुरू व्हायचे. यामुळे अंतिम परीक्षा झाली की विद्यार्थ्यांना एप्रिलनंतर सुट्टीच असायची. यामुळे महिन्यापेक्षा अधिक दिवस सुट्टी मिळायची. आता ही प्रथा बंद होणार आहे.

'आयटीआय'च्या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीचा दर्जा : मुख्यमंत्री

ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता आठवी उत्तीर्ण करून आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या दर्जा दिला जाईल. दहावीनंतर २ वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या समकक्ष मानले जाईल. याबाबतचे परिपत्रक जारी केले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कौशल्य विकास संचालनालयातर्फे डिचोली, फर्मागुडी, वास्को, काकोडा आणि म्हापसा येथे टाटा टेक्नॉलॉजी अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाच्या ऑनलाईन पायाभरणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, गौरीश धोंड व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमात अनेक बदल झाले आहेत. यात टाटा ग्रुपकडून मोठे सहकार्य लाभले आहे. २०० कोटी खर्चापैकी १६८ कोटी खर्च हा टाटा ग्रुपचा आहे. त्यामुळे भविष्यात आयटीआयचा दर्जा आणखी वाढणार आहे. आयटीआयबरोबर अनेक कंपन्यांनी करार केला असून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

बारावीचा दर्जा मिळालेले विद्यार्थी पुढे बीए, बीकॉम किंवा विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ शकतात. या वर्षापासून हे परिपत्रक काढले जाणार आहे. त्यामुळे आयटीआयचा विद्यार्थी आता कुठल्याच क्षेत्रात मागे राहणार नाही. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

शैक्षणिक वर्षासंबंधी करण्यात आलेल्या बदलांसंदर्भात आणि त्याच्या अंमलबजावणीची माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षकांबरोबर विशेषतः मुख्याध्यापकांशी शिक्षण खात्याकडून संवाद साधला जाईल. - प्रसाद लोलयेकर, शिक्षण सचिव

 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र