शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

‘नंदादीप’ वाचवण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 16:44 IST

म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ‘नंदादीप’ अर्थात म्हापसा अर्बन बँक आॅफ  गोवाचा नंदादीप विझण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी उद्या दि. २९ रोजी होणाऱ्या  बँकेच्या आमसभेत भागभांडवल उभे करुन बँकेला पुन्हा आर्थिक उभारी देण्याची गरज आहे. म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना १९६६ साली ...

म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ‘नंदादीप’ अर्थात म्हापसा अर्बन बँक आॅफ  गोवाचा नंदादीप विझण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी उद्या दि. २९ रोजी होणाऱ्या बँकेच्या आमसभेत भागभांडवल उभे करुन बँकेला पुन्हा आर्थिक उभारी देण्याची गरज आहे. 

म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना १९६६ साली केली. उत्तर गोव्यातील पहिली सहकारी बँक स्थापन करण्याचा मान म्हापसावासीयांना लाभला.  राज्यातील बहुराज्य बँक होणाचा मान मिळवलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती गंभीर होत गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनावर सुमारे साडेतीन वर्षापूर्वी आर्थिक निर्बंध लागू केले. पार्श्वभूमीवर उद्या म्हापसा अर्बन बँकेची आमसभा होत आहे. गुरुदास नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे सादर केले असले तरी ते अद्याप स्वीकारण्यात आले नसल्याने नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील होणाºया या सभेला संचालक मंडळाला भागधारकांच्या रोषाला, आक्रमणाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून उद्याची सभा एकूण वादळी ठरण्याची संभावना आहे. असे असले तरी बँकेला पुन्हा वाचवण्यासाठी या सभेतून प्रयत्न तसेच उपाय योजना होणे गरजेचे आहे. 

राज्यातील सहकारी क्षेत्रातल्या चार महत्त्वाच्या बँकांची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनुत्पादीत कर्ज वाढल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यात म्हापसा अर्बनचा समावेश आहे. असे असले तरी म्हापसा अर्बन बँकेची स्थिती इतर बँकांच्या तुलनेत चांगली असल्याचा दावा संचालक मंडळाकडून करण्यात आलेला. बँक सुस्थितीत आणण्यासाठी भागभांडवलाची गरज व्यक्त करुन त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आलेले. त्यासाठी संचालक मंडळाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राजीनामे सादर केलेले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने काही प्रमाणावर निर्बंध शिथील करताना विविध प्रकारची बिले स्वीकारण्याची अनुमती बँकेला दिली होती. मात्र खारेधारकाला आपल्या खात्यावरुन फक्त १ हजार रुपये काढण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. ते सुद्धा निर्बंध लागू असेपर्यंत.  

मागील काही दिवसापासून संचालक मंडळ तसेच भागधारकांत एकमेकांवर आरोप प्रति आरोप करण्याचे सत्र सुरु झाले आहे. बँकेच्या काही भागधारकांनी एकत्रित येऊन बॅँकेच्या सरव्यवस्थापकांना विविध पत्रे सादर करून त्यावर स्पष्टीकरण मागितले आहे. यात मंजूर करण्यात आलेले कर्ज, आमसभेत चर्चेसाठी घेण्यात येणारे ठराव, जुलै २०१५ नंतर बॅँकेतून काढण्यात आलेली रक्कम, एक रकमी कर्ज मंजुरीची विस्तारीत माहिती, बॅँकेच्या आर्थिक स्थितीसंबंधी माहिती पुरविण्याची मागणी केलेल्या पत्रातून करण्यात आली आहे. सदर माहिती आमसभेवेळी देण्यात यावी असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या पत्रांचे पडसाद सभेत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गेल्या वर्षी घेण्यात आलेली सभा सुद्धा बरीच वादळी ठरली होती. त्यावेळी संचालक मंडळाकडून बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव तसेच बहुराज्य बँकेचे पतसंस्थेत रुपांतर करण्याचा प्रस्ताव सुद्धा सभेसमोर मांडला होता. विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरु शकला नव्हता तर पतसंस्थेत रुपांतराला कडाडून विरोध करण्यात आलेला. एकंदरीत सभा वादग्रस्त होणार असली तरी उभारीच्या दृष्टीने सुद्धा चर्चा होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :goaगोवाbankबँक