शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

‘नंदादीप’ वाचवण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 16:44 IST

म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ‘नंदादीप’ अर्थात म्हापसा अर्बन बँक आॅफ  गोवाचा नंदादीप विझण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी उद्या दि. २९ रोजी होणाऱ्या  बँकेच्या आमसभेत भागभांडवल उभे करुन बँकेला पुन्हा आर्थिक उभारी देण्याची गरज आहे. म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना १९६६ साली ...

म्हापसा : राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ‘नंदादीप’ अर्थात म्हापसा अर्बन बँक आॅफ  गोवाचा नंदादीप विझण्यापासून वाचवण्याचे प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी उद्या दि. २९ रोजी होणाऱ्या बँकेच्या आमसभेत भागभांडवल उभे करुन बँकेला पुन्हा आर्थिक उभारी देण्याची गरज आहे. 

म्हापसा शहरातील प्रमुख व्यापारी तसेच उद्योजकांनी म्हापसा अर्बन बँकेची स्थापना १९६६ साली केली. उत्तर गोव्यातील पहिली सहकारी बँक स्थापन करण्याचा मान म्हापसावासीयांना लाभला.  राज्यातील बहुराज्य बँक होणाचा मान मिळवलेल्या या बँकेची आर्थिक स्थिती गंभीर होत गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनावर सुमारे साडेतीन वर्षापूर्वी आर्थिक निर्बंध लागू केले. पार्श्वभूमीवर उद्या म्हापसा अर्बन बँकेची आमसभा होत आहे. गुरुदास नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे सादर केले असले तरी ते अद्याप स्वीकारण्यात आले नसल्याने नाटेकर यांच्या अध्यक्षतेखालील होणाºया या सभेला संचालक मंडळाला भागधारकांच्या रोषाला, आक्रमणाला सामोरे जावे लागणार आहे. त्यातून उद्याची सभा एकूण वादळी ठरण्याची संभावना आहे. असे असले तरी बँकेला पुन्हा वाचवण्यासाठी या सभेतून प्रयत्न तसेच उपाय योजना होणे गरजेचे आहे. 

राज्यातील सहकारी क्षेत्रातल्या चार महत्त्वाच्या बँकांची आर्थिक अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. अनुत्पादीत कर्ज वाढल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यात म्हापसा अर्बनचा समावेश आहे. असे असले तरी म्हापसा अर्बन बँकेची स्थिती इतर बँकांच्या तुलनेत चांगली असल्याचा दावा संचालक मंडळाकडून करण्यात आलेला. बँक सुस्थितीत आणण्यासाठी भागभांडवलाची गरज व्यक्त करुन त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आलेले. त्यासाठी संचालक मंडळाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राजीनामे सादर केलेले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने काही प्रमाणावर निर्बंध शिथील करताना विविध प्रकारची बिले स्वीकारण्याची अनुमती बँकेला दिली होती. मात्र खारेधारकाला आपल्या खात्यावरुन फक्त १ हजार रुपये काढण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. ते सुद्धा निर्बंध लागू असेपर्यंत.  

मागील काही दिवसापासून संचालक मंडळ तसेच भागधारकांत एकमेकांवर आरोप प्रति आरोप करण्याचे सत्र सुरु झाले आहे. बँकेच्या काही भागधारकांनी एकत्रित येऊन बॅँकेच्या सरव्यवस्थापकांना विविध पत्रे सादर करून त्यावर स्पष्टीकरण मागितले आहे. यात मंजूर करण्यात आलेले कर्ज, आमसभेत चर्चेसाठी घेण्यात येणारे ठराव, जुलै २०१५ नंतर बॅँकेतून काढण्यात आलेली रक्कम, एक रकमी कर्ज मंजुरीची विस्तारीत माहिती, बॅँकेच्या आर्थिक स्थितीसंबंधी माहिती पुरविण्याची मागणी केलेल्या पत्रातून करण्यात आली आहे. सदर माहिती आमसभेवेळी देण्यात यावी असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या पत्रांचे पडसाद सभेत पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

गेल्या वर्षी घेण्यात आलेली सभा सुद्धा बरीच वादळी ठरली होती. त्यावेळी संचालक मंडळाकडून बँकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव तसेच बहुराज्य बँकेचे पतसंस्थेत रुपांतर करण्याचा प्रस्ताव सुद्धा सभेसमोर मांडला होता. विलीनीकरणाचा प्रस्ताव प्रत्यक्षात उतरु शकला नव्हता तर पतसंस्थेत रुपांतराला कडाडून विरोध करण्यात आलेला. एकंदरीत सभा वादग्रस्त होणार असली तरी उभारीच्या दृष्टीने सुद्धा चर्चा होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :goaगोवाbankबँक