शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास मगोपचा पाठिंबा जाहीर, नद्यांमधील गाळ उसपणे गरजेचेच : सुदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:05 IST

राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला.

पणजी : नद्यांचे राष्ट्रीयीकरण हे गरजेचेच आहे. कारण राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला.काही ग्रामसभा सध्या दबावाखाली येतात आणि नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेतात. राष्ट्रीयीकरण झाले म्हणजे गोमंतकीयांची नद्यांवरील मालकी जात नाही. सध्या गोव्यात राष्ट्रीय महामार्ग आहेत पण महामार्गाशी संबंधित सगळी कामे गोवा सरकारच करत असते. महामार्गाप्रमाणोच नद्यांचे असेल. राष्ट्रीयीकरणाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जे लोक कोकण रेल्वेला आणि मोपा विमानतळाला विरोध करत होते, तेच आता नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करत आहेत, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.मच्छीमारांना काही जण चिथावणी देत आहेत. साळ व अन्य नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्यात खूप गाळ साठलेला आहे. केंद्र सरकारकडून निधी घेऊन हा गाळ काढावा लागेल. नद्या साफ कराव्या लागतील, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. नद्यांमधील गाळ काढला गेला तर त्याचा लाभ मच्छीमारांनाच होईल, असाही दावा ढवळीकर यांनी केला.भारतमालासाठी 7 हजार कोटीकेंद्र सरकार भारतमाला प्रकल्पासाठी सात हजार कोटी रुपये गोव्यात खर्च करणार आहे. आम्ही भारतमाला प्रकल्प राबवणार आहोत. त्याचा लाभ गोव्यातील नद्यांना आणि पर्यटन स्थळांनाही मिळेल. आम्ही भारतमाला प्रकल्प अंमलात आणताना लोकांना विश्वासात घेणार आहोत. लोकांची घरे पाडली जाणार नाहीत याची काळजी घेऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. नद्यांमधील गाळ उसपण्याचा प्रस्ताव सर्व प्रथम केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच आला होता. आपण तेव्हा गोव्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारमध्ये मंत्री होतो. मी या विषयाबाबत त्यावेळीच त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. विरोध होईल म्हणून त्यावेळी आम्ही हा प्रस्ताव मार्गी लावला नव्हता, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. सारमानस, बाणस्तारी फेरीबोट अनेकदा रुतत असते. केरी-तेरेखोलला देखील तसेच होते. नद्या उसपून मार्ग जर व्यवस्थित केले गेले तर नद्यांमधील वाहतूक चांगली होईल. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे आम्ही स्वागत करतो, असे ढवळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा