शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास मगोपचा पाठिंबा जाहीर, नद्यांमधील गाळ उसपणे गरजेचेच : सुदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:05 IST

राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला.

पणजी : नद्यांचे राष्ट्रीयीकरण हे गरजेचेच आहे. कारण राष्ट्रीयीकरणाद्वारेच हजारो कोटी रुपये खर्चुन राज्यातील सगळ्या महत्त्वाच्या नद्यांमधील गाळ उसपणे शक्य होईल, असे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगून राष्ट्रीयीकरणाला पाठिंबा जाहीर केला.काही ग्रामसभा सध्या दबावाखाली येतात आणि नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाविरुद्ध ठराव घेतात. राष्ट्रीयीकरण झाले म्हणजे गोमंतकीयांची नद्यांवरील मालकी जात नाही. सध्या गोव्यात राष्ट्रीय महामार्ग आहेत पण महामार्गाशी संबंधित सगळी कामे गोवा सरकारच करत असते. महामार्गाप्रमाणोच नद्यांचे असेल. राष्ट्रीयीकरणाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. जे लोक कोकण रेल्वेला आणि मोपा विमानतळाला विरोध करत होते, तेच आता नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला विरोध करत आहेत, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.मच्छीमारांना काही जण चिथावणी देत आहेत. साळ व अन्य नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. त्यात खूप गाळ साठलेला आहे. केंद्र सरकारकडून निधी घेऊन हा गाळ काढावा लागेल. नद्या साफ कराव्या लागतील, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. नद्यांमधील गाळ काढला गेला तर त्याचा लाभ मच्छीमारांनाच होईल, असाही दावा ढवळीकर यांनी केला.भारतमालासाठी 7 हजार कोटीकेंद्र सरकार भारतमाला प्रकल्पासाठी सात हजार कोटी रुपये गोव्यात खर्च करणार आहे. आम्ही भारतमाला प्रकल्प राबवणार आहोत. त्याचा लाभ गोव्यातील नद्यांना आणि पर्यटन स्थळांनाही मिळेल. आम्ही भारतमाला प्रकल्प अंमलात आणताना लोकांना विश्वासात घेणार आहोत. लोकांची घरे पाडली जाणार नाहीत याची काळजी घेऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. नद्यांमधील गाळ उसपण्याचा प्रस्ताव सर्व प्रथम केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाच आला होता. आपण तेव्हा गोव्यातील काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारमध्ये मंत्री होतो. मी या विषयाबाबत त्यावेळीच त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. विरोध होईल म्हणून त्यावेळी आम्ही हा प्रस्ताव मार्गी लावला नव्हता, असे मंत्री ढवळीकर म्हणाले. सारमानस, बाणस्तारी फेरीबोट अनेकदा रुतत असते. केरी-तेरेखोलला देखील तसेच होते. नद्या उसपून मार्ग जर व्यवस्थित केले गेले तर नद्यांमधील वाहतूक चांगली होईल. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे आम्ही स्वागत करतो, असे ढवळीकर यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा