शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

माझ्याविरुद्ध खूप शिजले, केंद्रीय नेत्यांचे कान भरले!; काब्रालांचा गौप्यस्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:56 IST

पंतप्रधान मोदींना भेटण्याचा प्रयत्न व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्क कुडचडे : मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर आमदार नीलेश काब्राल यांनी प्रथमच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 'माझ्याविरुद्ध खूप काही शिजले होते. केंद्रीय नेत्यांचेही कान भरले गेले', असा आरोप त्यांनी केले आहेत.

आपल्या मतदारांशी शनिवारी रात्री संवाद साधताना माजी मंत्री काब्राल यांनी आपल्याला राजीनामा का द्यावा लागला याचा पाढाच वाचला. काब्राल म्हणाले की, 'मी दिल्लीत पक्षाच्या केंद्रीय नेत्यांना भेटलो, तेव्हा माझ्याविरोधात बरेच काही शिजले होते. वरपर्यंत कान भरले गेले, याची जाणीव झाली. मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी माझेच नाव का? असा प्रश्नही मी राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना विचारला. जे काही चाललेय, ते मनाला पटत नाही, असेही स्पष्टपणे सांगितले.'

काब्राल म्हणाले की, 'राजीनामा देणे भाग आहे, असे सांगितल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; परंतु दुसऱ्याच दिवशी गुजरातला विश्वचषक स्पर्धा होती. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. शनिवारी, १८ रोजी रात्रीच मी मुलग्याला राजीनामा टाइप करायला सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता दाबोळी विमानतळावर उतरून थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गाठून राजीनामा दिला.'

काब्राल म्हणाले की, 'कुडचडेचा विकास, युवकांच्या आकांक्षा पूर्ण करणे हेच माझे ध्येय आहे. कुडचडेत काही जण कोणाकोणाची नावे घेऊन पुढील उमेदवार आपणच या अविर्भावात आहेत. मला त्यांची पर्वा नाही. कुडचडेत जी काही विकासकामे बाकी आहेत, ती मतदारांच्या ताकदीवर सव्वातीन वर्षांच्या काळात मी पूर्ण करेन. यापुढेही निवडणूक लढवून लोकांचे प्रतिनिधित्व करीन.'

काब्राल म्हणाले की, 'मतदार ही माझी ताकद आहे. मी तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामुळे मंत्रिमंडळातून वगळण्यासाठी मीच का? असा प्रश्न पडला. काँग्रेसमधून फुटून आलेल्या आठ आमदारांपैकी एकाला मंत्रिपद द्यावे लागणार असल्याने मला राजीनामा द्यावा लागेल, असे सांगण्यात आले. बी. एल. संतोष यांचा फोन आल्यानंतर मी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनाही भेटलो; परंतु माझ्याविरुद्ध बरेच काही शिजले होते, याची जाणीव प्रकर्षाने झाली.'

आणखी चार ते पाच मंत्र्यांचा राजीनामा ?

काब्राल म्हणाले की, 'सामाजिक जीवनात मला पदाची हाव नाही. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा आदर्श घेऊन मी पुढे जात आहे. पर्रीकर यांना मी कालही मानत होतो, आजही आणि उद्याही मानणार आहे. बी. एल. संतोष यांनी मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल, असे सांगितले, तेव्हा मीच का? असा प्रश्न मी विचारला असता आणखी चार ते पाच मंत्र्यांना राजीनामा देण्याची तयारी ठेवा, असे सांगण्यात आले आहे, असे ते म्हणाले. बी. एल. संतोष यांनी फोनवरून मला राजीनामा द्यायला सांगितले होते; परंतु मी त्यांची प्रत्यक्ष भेट मागितली. मला जे काही सांगायचे होते, ते कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांना सांगितले.'

 

टॅग्स :goaगोवा