शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 15:29 IST

ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या  विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे.

नारायण गावस -पणजी: कॅप्टन विरियातो फर्नांडिस हा समाज कार्यकर्ता असून दक्षिण गोव्यातील लोकांनी  त्यांना निवडून दिल्याने राज्यातील समाज कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानले. विरियातो हे समाज कार्यकर्ता असल्याने राज्यातील विविध विषय ते लोकसभेत मांडणार आहेत, असा विश्वास समाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शनिवारी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाज कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हाे, रामा काणकोणकर, संजय बर्डे, तारा केरकर व इतर अनेक समाज कार्यकर्ते उपस्थित होते

ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या  विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे.  विरियातो यांनी दक्षिण गाेव्यात विविध सामाजिक विषय हाताळले होते. त्यामुळे त्यांना याचे श्रेय मिळाले आहे. आता कॅप्टन समाजातील विविध समस्या विषय लाेकसभेत मांडणार आहे. या भाजप सरकारचा  भ्रष्टाचार समोर आणणार आहे.

रामा काणकोणकर म्हणाले, पैसा आणि सत्तेपेक्षा मतदार श्रेष्ठ असतात हे दक्षिण गोव्यातील लाेकांनी दाखवून दिले आहे. सर्वजण एकत्र आल्याने समाज कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. काही लोक समाज कार्यकर्त्यांनी राजकारणात नसावे म्हणतात पण समाज कार्यकर्ता राजकारणात बदल घडवू शकतो. समाज कार्यकर्ता राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतो. जे विषय इतर राजकारणी साेडवू  शकत नाही ते समाज कार्यकर्ता राजकारणात येऊन साेडवू शकतो. अनेक समाज कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेल्या  दिलेला पाठिंब्यामुळे कॅप्टन विरियातो यांचा विजय झाला आहे.

टॅग्स :goaगोवा