शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आणखी राजीनामे शक्य? नीलेश काब्राल यांचा राजीनामा अन् त्याग सत्र सुरुच राहणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:05 IST

लोकसभा येण्यापूर्वी गोव्यात कदाचित आणखी तिघा-चौघा मंत्र्यांना राजीनामे देऊन जागा खाली करावी लागेल. तशी शक्यता आहेच.

नीलेश काब्राल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला यात आता नवे काही राहिलेले नाही. मात्र शनिवारी रात्री प्रथमच काब्राल यांनी भाजपचे कुडचडेतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक आदींची एकत्रित सभा घेतली. त्या सभेत काब्राल मनापासून व्यक्त झाले. आपण जसा राजीनामा दिला व (कथित) त्याग केला, तसा त्याग आणखीही तिघा चौघांना करावा लागेल असे आपल्याला भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सांगितले असल्याचे काब्राल त्या सभेत बोलले. हे विधान मोठे आहे. दखल घेण्याजोगे आहे. म्हणजे लोकसभा येण्यापूर्वी गोव्यात कदाचित आणखी तिघा-चौघा मंत्र्यांना राजीनामे देऊन जागा खाली करावी लागेल. तशी शक्यता आहेच.

काँग्रेस पक्षातून आठ आमदार गेल्यावर्षीं भाजपमध्ये आले. त्यापैकी काही जणांना मंत्री करण्याचे कमिटमेंट देण्यात आले आहे, असे बी. एल. संतोष यांनी आपल्याला सांगितले असे विधान काब्राल यांनी केले आहे. दिगंबर कामत यांच्यासोबत सात आमदार होते, आठवा आमदार मिळत नव्हता तेव्हा आलेक्स सिक्वेरा यांना गाठून मंत्रिपदाची ग्वाही देण्यात आली होती. तो शब्द पाळण्यासाठी आता तुम्ही मंत्रिपद सोडा, त्याग करा, असे काब्राल यांना केंद्रीय नेत्यांनी सांगितले. काब्राल यांनी सगळी स्थिती काल कुडचडेतील भाजप कार्यकर्त्यांसमोर मांडली. काब्राल यांच्या वेदनेशी काही कार्यकर्ते व पदाधिकारी सहमत आहेत. शेवटी पक्षाचा आदेश काब्राल यांनी मान्य केला आहे.

आता यापुढील एक दोन महिन्यांत खरोखर दोघा-तिघा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल की नाही ते पाहावे लागेल. दिगंबर कामत, संकल्प आमोणकर वगैरे बाशिंग बांधून थांबले आहेत. त्यांना मंत्री व्हायचे आहे. परवा आलेक्स सिक्वेरा मंत्री होताच कामत यांनी जाहीरपणे दाखवून दिलेला प्रचंड आनंद पूर्ण गोव्याने पाहिला आहेच. काब्राल यांचा राजीनामा घेणे सोपे जावे म्हणून आणखी तिघांना तरी त्याग करावा लागेल असे भाजप हायकमांडने काब्राल यांना उगाच सांगितले नसावे ना? असा प्रश्न काही पदाधिकाऱ्यांच्या मनात येतो. लहान मुलांना समजविण्यासाठी किंवा राग घालविण्यासाठी पालकांकडून जसे काहीवेळा उगाच काहीतरी सांगून वेळ मारून नेली जाते तसे कदाचित काब्रालविषयी केले गेले असावे, असे काही मंत्र्यांनाही वाटते. मात्र जे आज सुपात आहेत, ते जात्यात येण्यासाठी जास्त वेळ लागत नसतो. देशभरात आज राजकारण तसेच आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी उत्तर गोव्यातील एक- दोन मंत्र्यांना घरी पाठवून त्यांच्या मंत्रिपदाची खुर्ची नव्या आयात आमदारांना दिली जाऊ शकते. येत्या दि. ५ नंतर तर गोव्यात अनेक मंत्र्यांची खाती बदलण्याची शक्यता आहे.

महसूल खाते रोहन खंवटे यांना मिळू शकते. अन्य एका वजनदार मंत्र्याचे एक खाते बदलले जाऊ शकते. खूप गोष्टी घडणार आहेत. प्रशासनाचे खोबरे होत आहे. गव्हर्नन्स मार खात आहे. पण त्याचे कुणाला सोयरसुतक आहे? नीलेश काब्राल हे कार्यक्षममंत्री होते. त्यांची तुलना आलेक्स सिक्वेरा यांच्याशी होतच नाही. काब्राल काल बोलले की राजीनामा देण्यापूर्वी आपण पंतप्रधान मोदी यांनाही दिल्लीत भेटण्याचा खूप प्रयत्न केला; पण ते शक्य झाले नाही. अर्थात मोदी अशावेळी एखाद्या मावळत्या मंत्र्याला भेटण्याचा प्रश्नच येत नाही. दिगंबर कामत वगैरे काँग्रेसमधून फुटले तेव्हा कामत हे पंतप्रधानांनी दिलेल्या एका आश्वासनामुळे काँग्रेसमधून बाहेर आले अशी बातमी सगळीकडे पसरली होती. ते आश्वासन मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रिपद असे तर नव्हे ना या प्रश्नाचे उत्तर कदाचित येत्या डिसेंबरमध्ये मिळेल.

तूर्त काब्राल यांना आपला तथाकथित त्याग कुरवाळत बसावा लागेल. कुडचडेच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री सावंत यांचे काब्राल यांना यापुढे सहकार्य मिळण्याची शक्यता वाटत नाही. त्यामागे विविध राजकीय कारणे आहेत. काब्राल यांच्यावर भाजप सोडण्याची वेळ पुढील तीन वर्षांत येऊ शकते. राजकारण सध्या त्याच दिशेने जात आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण