शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मासळीचे आणखी 94 ट्रक तपासले, फॉरमॅलिनच्या प्रश्नावर एफडीएचे अधिकारी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 13:40 IST

परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले.

पणजी - परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले. ही मासळी दूषित नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्याचा दावा खात्याने केला आहे. त्यामुळे ही मासळी आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉरमॅलिन सापडले त्यामुळे आयातीवर बंदी घातली होती. ही बंदी 3 ऑगस्टपर्यंत लागू होती. शनिवारी बंदी उठल्यानंतर मासळीचे ट्रक तपासण्यात आले. त्यानंतर आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशी 94 तपासले. पोळें चेक नाक्यावर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच अन्य भागातून आलेले ट्रक तपासण्यात आले. तर पत्रादेवी चेकनाक्यावर महाराष्ट्र तसेच उत्तरेकडील अन्य राज्यांमधून आलेले मासळीचे 21 ट्रक तपासले. काल मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत ही तपासणी चालू होती. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार खात्याचे अधिकारी हद्दीवर तैनात असतात. मासळी टिकविण्यासाठी फॉरमॅलिनचा वापर केला आहे का, त्याची तपासणी विशेष उपकरणाच्या सहाय्याने केली जाते.दरम्यान, मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात आता आयात सुरू झाल्याने परप्रांतीय मासळीही येऊ लागली आहे. परंतु गोव्यात मात्र स्थानिक मासळीच्या खरेदीवर भर दिला जात आहे. कुटबण, मालीम, कुठ्ठाळी, वास्को, शापोरा तसेच अन्य जेटींवर ट्रॉलर्स समुद्रात जाऊ लागले असून बांगडे, कोळंबी तसेच अन्य प्रकारची स्थानिक मासळी आता बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे.परप्रांतांतून गोव्यात विक्रीसाठी आणली जाणारी मासळी फॉरमॅलिन लावून साठविलेली असते असे उघड झाल्याने काही दिवसांपूर्वी राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने पंधरा दिवस आयातीवर बंदी घातली होती. फॉरमॅलिन घातक रसायन असून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पार्थिव देह टिकून राहावा यासाठी फॉरमॅलिन चा वापर शरीरावर केला जातो. या घातक रसायनामुुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे फॉरमॅलिन लावलेले मासे खाणे अत्यंत धोकादायक आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कसून तपासणी करीत आहोत प्रसंगी प्रयोगशाळेतही पाठवून देते तपासणी होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.गोव्याचा मासळी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होतो. असे असले तरी सध्या खराब हवामानामुळे ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकलेले नाहीत तसेच ट्रॉलर्स वर काम करणारे खलाशी  हे कर्नाटक, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातील असतात. पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते तेव्हा हे कामगार गावी परत जातात. अनेकदा हे कामगार 15 ऑगस्ट नंतरच परत येतात त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी पूर्ण वेगाने सुरू होईल अशी शक्यता मांडवी फिशरमन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष सीताकांत परब यांनी लोकमतकडे बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या