शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

गोव्यात मासळीचे आणखी 94 ट्रक तपासले, फॉरमॅलिनच्या प्रश्नावर एफडीएचे अधिकारी सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 13:40 IST

परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले.

पणजी - परप्रांतातून गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची तपासणी अन्न व औषध प्रशासन खात्याकडून चालूच असून आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी मासळी घेऊन येणारे 94 ट्रक हद्दीवर तपासले. ही मासळी दूषित नसल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाल्याचा दावा खात्याने केला आहे. त्यामुळे ही मासळी आता बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.

काही दिवसांपूर्वी तामिळनाडू तसेच अन्य राज्यांमधून गोव्यात येणाऱ्या मासळीमध्ये फॉरमॅलिन सापडले त्यामुळे आयातीवर बंदी घातली होती. ही बंदी 3 ऑगस्टपर्यंत लागू होती. शनिवारी बंदी उठल्यानंतर मासळीचे ट्रक तपासण्यात आले. त्यानंतर आज रविवारी सलग दुसऱ्या दिवशी 94 तपासले. पोळें चेक नाक्यावर कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच अन्य भागातून आलेले ट्रक तपासण्यात आले. तर पत्रादेवी चेकनाक्यावर महाराष्ट्र तसेच उत्तरेकडील अन्य राज्यांमधून आलेले मासळीचे 21 ट्रक तपासले. काल मध्यरात्रीपासून पहाटे ५ वाजेपर्यंत ही तपासणी चालू होती. अन्न व औषध प्रशासन खात्याच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार खात्याचे अधिकारी हद्दीवर तैनात असतात. मासळी टिकविण्यासाठी फॉरमॅलिनचा वापर केला आहे का, त्याची तपासणी विशेष उपकरणाच्या सहाय्याने केली जाते.दरम्यान, मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात आता आयात सुरू झाल्याने परप्रांतीय मासळीही येऊ लागली आहे. परंतु गोव्यात मात्र स्थानिक मासळीच्या खरेदीवर भर दिला जात आहे. कुटबण, मालीम, कुठ्ठाळी, वास्को, शापोरा तसेच अन्य जेटींवर ट्रॉलर्स समुद्रात जाऊ लागले असून बांगडे, कोळंबी तसेच अन्य प्रकारची स्थानिक मासळी आता बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे.परप्रांतांतून गोव्यात विक्रीसाठी आणली जाणारी मासळी फॉरमॅलिन लावून साठविलेली असते असे उघड झाल्याने काही दिवसांपूर्वी राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर सरकारने पंधरा दिवस आयातीवर बंदी घातली होती. फॉरमॅलिन घातक रसायन असून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पार्थिव देह टिकून राहावा यासाठी फॉरमॅलिन चा वापर शरीरावर केला जातो. या घातक रसायनामुुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे फॉरमॅलिन लावलेले मासे खाणे अत्यंत धोकादायक आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कसून तपासणी करीत आहोत प्रसंगी प्रयोगशाळेतही पाठवून देते तपासणी होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.गोव्याचा मासळी हंगाम १ ऑगस्टपासून सुरू होतो. असे असले तरी सध्या खराब हवामानामुळे ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकलेले नाहीत तसेच ट्रॉलर्स वर काम करणारे खलाशी  हे कर्नाटक, ओडिशा, झारखंड, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यातील असतात. पावसाळ्यात दोन महिने मासेमारी बंद असते तेव्हा हे कामगार गावी परत जातात. अनेकदा हे कामगार 15 ऑगस्ट नंतरच परत येतात त्यामुळे नारळी पौर्णिमेनंतरच मासेमारी पूर्ण वेगाने सुरू होईल अशी शक्यता मांडवी फिशरमन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष सीताकांत परब यांनी लोकमतकडे बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या