शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘मान्सून डेस्टिनेशन’ गोव्याची नवी ओळख! पावसाळ्यातही पर्यटकांची पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 12:39 IST

पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली.

पणजी - पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली.

मान्सून फेस्टिव्हल म्हणून पावसाळ्यात खास उपक्रम राबवले जातात तसेच पर्यटकांना स्पेशल पॅकेज दिले जाते. धबधबे, झरे, तलाव हेही पर्यटकांचे आकर्षण बनलेले असते. मान्सूनमध्ये दुधसागर धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी करीत असतात.

पर्यटन खात्याने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटकसंख्या तुलनेत वाढत आहेत. २0१७ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत १९ लाख १५ हजार पर्यटक गोव्यात आले. त्याआधीच्या वर्षात २0१६ मध्ये याच कालावधीत ११ लाख ९३ हजार पर्यटक आले. गेल्या वर्षी पावसात  १८ लाख ५५ हजार देशी पाहुण्यांनी उपस्थिती लावली तर २0१६ मध्ये पावसाळ्यात ही संख्या ११ लाख ४८ हजार इतकी होती. विदेशी पर्यटकही पावसाळ्यात येऊ लागले आहेत. गेल्या वर्षी मान्सूनमध्ये ६0 हजार १६१ विदेशी पर्यटक आले तर २0१६ मध्ये याच कालावधीत विदेशी पाहुण्यांची संख्या ४५ हजार ४३७ होती. जून २0१७ मध्ये ३0.७५ टक्क्यांनी पर्यटक वाढले. जुलैमध्ये ६१.४४ टक्क्यांनी, आॅगस्टमध्ये ७१.३९ टक्क्यांनी तर सप्टेंबरमध्ये ९४.५५ टक्क्यांनी पर्यटकसंख्या वाढल्याचेही ही आकडेवारी सांगते. 

गोव्याचा पर्यटक मोसम आॅक्टोबरमध्ये सुरु होतो. परंतु अलीकडच्या काळात सप्टेंबरमध्येच पर्यटक दाखल होतात. ३६५ दिवस पर्यटनाची जाहिरात केली जाते त्याचा परिणामही दिसून आला आहे.

 साहसी पर्यटन उपक्रम आकर्षण : मिनीन डिसोझा

पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही साहसी पर्यटनाच्या काही उपक्रमांमध्ये वाढ केलेली आहे. पावसाळ्यात म्हादई राफ्टिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅकिंगसाठीही पर्यटक येऊ लागले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता देशी पर्यटकांना कळून चुकले आहे की, मान्सूनमध्ये गोव्यात हॉटेलांचे भाडे कमी असते. शिवाय आॅफ सिझन असल्याने प्रवासही स्वस्तात करता येतो. काहीजणांना थंडीच्या मोसमात किंवा उन्हाळ्यात गर्दीच्या दिवसात येण्यापेक्षा मान्सूनमध्ये येणे आवडते. गोवा हे आता ३६५ दिवस पर्यटनाचे केंद्र बनले आहे. 

 पावसात उत्तर भारतीयांचे प्रमाण जास्त 

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, पावसाळ्यातही पर्यटक येऊ लागले आहेत, ही गोष्ट खरी आहे. परंतु पर्यटन खात्याकडून आकडेवारी दिली जाते तेवढे हे प्रमाण लक्षणीय मुळीच नाही. दिल्ली, गुजरात तसेच खास करुन उत्तर भारतात शाळांना उशिरा सुट्ट्या असतात या काळात येथे पाऊस सुरु झालेला असतो. पावसाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून खास येणारे देशी पर्यटकही आहेत. राजधानी पणजी शहरात आजच्या घडीलाही हॉटेलमधील खोल्यांची आॅक्युपन्सी ५0 टक्के एवढीच आहे. अशा वेळी आम्ही खोल्या रिकाम्या ठेवण्यापेक्षा दर कमी करतो.’ ते पुढे म्हणाले की, ‘मुंबई-गोवा बोट सुरु झाल्यावर गोव्यात देशी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. दर दिवशी सुमारे ५00 पर्यटक या बोटीतून येतील त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल.’ 

टॅग्स :tourismपर्यटनgoaगोवाIndiaभारत