शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

‘मान्सून डेस्टिनेशन’ गोव्याची नवी ओळख! पावसाळ्यातही पर्यटकांची पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 12:39 IST

पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली.

पणजी - पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागल्याने गोव्याची ओळख आता ‘मान्सून डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. २0१७ मध्ये पावसाळ्यात त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकांची ६0 टक्के वाढ दिसून आली.

मान्सून फेस्टिव्हल म्हणून पावसाळ्यात खास उपक्रम राबवले जातात तसेच पर्यटकांना स्पेशल पॅकेज दिले जाते. धबधबे, झरे, तलाव हेही पर्यटकांचे आकर्षण बनलेले असते. मान्सूनमध्ये दुधसागर धबधब्यावर पर्यटक मोठी गर्दी करीत असतात.

पर्यटन खात्याने नुकतेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटकसंख्या तुलनेत वाढत आहेत. २0१७ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत १९ लाख १५ हजार पर्यटक गोव्यात आले. त्याआधीच्या वर्षात २0१६ मध्ये याच कालावधीत ११ लाख ९३ हजार पर्यटक आले. गेल्या वर्षी पावसात  १८ लाख ५५ हजार देशी पाहुण्यांनी उपस्थिती लावली तर २0१६ मध्ये पावसाळ्यात ही संख्या ११ लाख ४८ हजार इतकी होती. विदेशी पर्यटकही पावसाळ्यात येऊ लागले आहेत. गेल्या वर्षी मान्सूनमध्ये ६0 हजार १६१ विदेशी पर्यटक आले तर २0१६ मध्ये याच कालावधीत विदेशी पाहुण्यांची संख्या ४५ हजार ४३७ होती. जून २0१७ मध्ये ३0.७५ टक्क्यांनी पर्यटक वाढले. जुलैमध्ये ६१.४४ टक्क्यांनी, आॅगस्टमध्ये ७१.३९ टक्क्यांनी तर सप्टेंबरमध्ये ९४.५५ टक्क्यांनी पर्यटकसंख्या वाढल्याचेही ही आकडेवारी सांगते. 

गोव्याचा पर्यटक मोसम आॅक्टोबरमध्ये सुरु होतो. परंतु अलीकडच्या काळात सप्टेंबरमध्येच पर्यटक दाखल होतात. ३६५ दिवस पर्यटनाची जाहिरात केली जाते त्याचा परिणामही दिसून आला आहे.

 साहसी पर्यटन उपक्रम आकर्षण : मिनीन डिसोझा

पर्यटन खात्याचे संचालक मिनीन डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही साहसी पर्यटनाच्या काही उपक्रमांमध्ये वाढ केलेली आहे. पावसाळ्यात म्हादई राफ्टिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅकिंगसाठीही पर्यटक येऊ लागले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता देशी पर्यटकांना कळून चुकले आहे की, मान्सूनमध्ये गोव्यात हॉटेलांचे भाडे कमी असते. शिवाय आॅफ सिझन असल्याने प्रवासही स्वस्तात करता येतो. काहीजणांना थंडीच्या मोसमात किंवा उन्हाळ्यात गर्दीच्या दिवसात येण्यापेक्षा मान्सूनमध्ये येणे आवडते. गोवा हे आता ३६५ दिवस पर्यटनाचे केंद्र बनले आहे. 

 पावसात उत्तर भारतीयांचे प्रमाण जास्त 

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, पावसाळ्यातही पर्यटक येऊ लागले आहेत, ही गोष्ट खरी आहे. परंतु पर्यटन खात्याकडून आकडेवारी दिली जाते तेवढे हे प्रमाण लक्षणीय मुळीच नाही. दिल्ली, गुजरात तसेच खास करुन उत्तर भारतात शाळांना उशिरा सुट्ट्या असतात या काळात येथे पाऊस सुरु झालेला असतो. पावसाचा आनंद लुटण्यासाठी म्हणून खास येणारे देशी पर्यटकही आहेत. राजधानी पणजी शहरात आजच्या घडीलाही हॉटेलमधील खोल्यांची आॅक्युपन्सी ५0 टक्के एवढीच आहे. अशा वेळी आम्ही खोल्या रिकाम्या ठेवण्यापेक्षा दर कमी करतो.’ ते पुढे म्हणाले की, ‘मुंबई-गोवा बोट सुरु झाल्यावर गोव्यात देशी पर्यटकांची संख्या वाढणार आहे. दर दिवशी सुमारे ५00 पर्यटक या बोटीतून येतील त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांना त्याचा फायदा होईल.’ 

टॅग्स :tourismपर्यटनgoaगोवाIndiaभारत