शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आमदारांची होणार आता 'उलटतपासणी', विधानसभा कामकाजात सहभाग वाढवा; प्रदेशाध्यक्षांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 13:34 IST

एक प्रकारे आमदारांचे प्रगती पुस्तक तयार करण्याची प्रक्रियाच प्रदेशाध्यक्षांनी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या आमदारांनी अधिकाधिक सहभाग दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनात दाखवावा. त्यासाठी अधिक प्रश्न व अधिक लक्षवेधी सूचना सादर कराव्यात, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बैठकीत व्यक्त केली. सत्तेत असलेल्या आमदारांनी स्वतःचा परफॉरमन्स अधिवेशनात दाखवावा, असेही ते म्हणाले. एक प्रकारे आमदारांचे प्रगती पुस्तक तयार करण्याची प्रक्रियाच प्रदेशाध्यक्षांनी सुरू केली आहे.

अधिवेशनावेळी सर्वांनी सभागृहात उपस्थित राहून कामकाजात सहभाग दाखवून द्यावा, असे आवाहन दामू नाईक यांनी बैठकीवेळी केले. तसेच नाईक यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' पद्धत देशात यापुढील काळात लागू होईलच, असे बैठकीत सांगितले. यामुळे सर्व मंत्री, आमदारांना यापुढे काय घडू शकते, याची कल्पना आली. २०२७ साली गोवा विधानसभा निवडणूक होईलच, पण २०२९ मध्येही निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सर्व आमदारांमध्ये आता या दृष्टीने विचारमंथन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री, सत्ताधारी भाजप, मगोपचे आमदार तसेच अपक्ष आमदार बैठकीला उपस्थित होते.

भाजप आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. संघटनात्मक निवडणुका पार पडल्या. चार विधानसभा मतदारसंघ वगळता इतर ३६ मतदारसंघांमध्ये मंडल अध्यक्ष व बूथ समित्या स्थापन केल्या गेल्या. पक्षाची सदस्यता मोहीमही पूर्ण झालेली आहे. येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक होतील. या निवडणुकांसाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या आधीच केलेले आहे.

भाजप आमदारांनी कमी प्रश्न विचारले; पक्षाकडून दखल

विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन उद्या, गुरुवार व शुक्रवारी होणार आहे. या अधिवेशनासाठी भाजप आमदारांनी खूपच कमी प्रश्न विचारल्याने त्याची गंभीर दखलही पक्षाने घेतलेली आहे. सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्यांबाबत प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत असून, ते कायम केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

दामूंनी आणली आकडेवारी

बैठकीस येताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे आकडेवारीच घेऊन आले. कोणते आमदार व मंत्री कितीवेळ सभागृहात बसले होते, कितीजण अर्ध्यावरच काम सोडून आपल्या मतदारसंघात जात होते, किती आमदारांनी एक देखील प्रश्न विचारला नाही याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. ज्यांनी दोन-तीनच प्रश्न विचारले होते त्यांची नावे वाचली. एका मंत्र्याने मतदारसंघात कार्यक्रम घेतलेले असतात, असे सांगितले. त्यावर अधिवेशन काळात मतदारसंघात कार्यक्रम घेऊ नये, अशी सूचना नाईक यांनी केली.

विधानसभा निवडणूक दोनवेळा...

गोव्यात विधानसभेची निवडणूक २०२७ साली होईल. परंतु, त्याचबरोबर 'वन नेशन, वन इलेक्शन' मुळे २०२९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबर पुन्हा विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आमदार व सर्व मंत्र्यांची एकत्रित बैठक मंगळवारी रात्री येथे पार पडली. त्यावेळी सर्व मंत्री, आमदारांना पक्षाकडून याबाबत थोडक्यात माहिती देऊन स्थितीची कल्पना दिली गेली. सध्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेतल्या जातात. त्यात बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास वेळ आणि पैसा वाचेल, आचारसंहितेचा कालावधी कमी होईल. तसेच राजकीय अस्थिरता कमी होईल आणि सरकार प्रशासनावर लक्ष केंद्रित करू शकेल. मतदारांचा सहभागही वाढेल. सध्या हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण