शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आमदारांची होणार आता 'उलटतपासणी', विधानसभा कामकाजात सहभाग वाढवा; प्रदेशाध्यक्षांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2025 13:34 IST

एक प्रकारे आमदारांचे प्रगती पुस्तक तयार करण्याची प्रक्रियाच प्रदेशाध्यक्षांनी सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या आमदारांनी अधिकाधिक सहभाग दोन दिवसीय विधानसभा अधिवेशनात दाखवावा. त्यासाठी अधिक प्रश्न व अधिक लक्षवेधी सूचना सादर कराव्यात, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बैठकीत व्यक्त केली. सत्तेत असलेल्या आमदारांनी स्वतःचा परफॉरमन्स अधिवेशनात दाखवावा, असेही ते म्हणाले. एक प्रकारे आमदारांचे प्रगती पुस्तक तयार करण्याची प्रक्रियाच प्रदेशाध्यक्षांनी सुरू केली आहे.

अधिवेशनावेळी सर्वांनी सभागृहात उपस्थित राहून कामकाजात सहभाग दाखवून द्यावा, असे आवाहन दामू नाईक यांनी बैठकीवेळी केले. तसेच नाईक यांनी 'वन नेशन वन इलेक्शन' पद्धत देशात यापुढील काळात लागू होईलच, असे बैठकीत सांगितले. यामुळे सर्व मंत्री, आमदारांना यापुढे काय घडू शकते, याची कल्पना आली. २०२७ साली गोवा विधानसभा निवडणूक होईलच, पण २०२९ मध्येही निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. सर्व आमदारांमध्ये आता या दृष्टीने विचारमंथन सुरू झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्री, सत्ताधारी भाजप, मगोपचे आमदार तसेच अपक्ष आमदार बैठकीला उपस्थित होते.

भाजप आतापासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. संघटनात्मक निवडणुका पार पडल्या. चार विधानसभा मतदारसंघ वगळता इतर ३६ मतदारसंघांमध्ये मंडल अध्यक्ष व बूथ समित्या स्थापन केल्या गेल्या. पक्षाची सदस्यता मोहीमही पूर्ण झालेली आहे. येत्या डिसेंबरमध्ये जिल्हा पंचायत निवडणूक होतील. या निवडणुकांसाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला लागा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या आधीच केलेले आहे.

भाजप आमदारांनी कमी प्रश्न विचारले; पक्षाकडून दखल

विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन उद्या, गुरुवार व शुक्रवारी होणार आहे. या अधिवेशनासाठी भाजप आमदारांनी खूपच कमी प्रश्न विचारल्याने त्याची गंभीर दखलही पक्षाने घेतलेली आहे. सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्यांबाबत प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत असून, ते कायम केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

दामूंनी आणली आकडेवारी

बैठकीस येताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे आकडेवारीच घेऊन आले. कोणते आमदार व मंत्री कितीवेळ सभागृहात बसले होते, कितीजण अर्ध्यावरच काम सोडून आपल्या मतदारसंघात जात होते, किती आमदारांनी एक देखील प्रश्न विचारला नाही याची आकडेवारीच त्यांनी सादर केली. ज्यांनी दोन-तीनच प्रश्न विचारले होते त्यांची नावे वाचली. एका मंत्र्याने मतदारसंघात कार्यक्रम घेतलेले असतात, असे सांगितले. त्यावर अधिवेशन काळात मतदारसंघात कार्यक्रम घेऊ नये, अशी सूचना नाईक यांनी केली.

विधानसभा निवडणूक दोनवेळा...

गोव्यात विधानसभेची निवडणूक २०२७ साली होईल. परंतु, त्याचबरोबर 'वन नेशन, वन इलेक्शन' मुळे २०२९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबर पुन्हा विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ताधारी आमदार व सर्व मंत्र्यांची एकत्रित बैठक मंगळवारी रात्री येथे पार पडली. त्यावेळी सर्व मंत्री, आमदारांना पक्षाकडून याबाबत थोडक्यात माहिती देऊन स्थितीची कल्पना दिली गेली. सध्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी घेतल्या जातात. त्यात बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. या निवडणुका एकाच वेळी घेतल्यास वेळ आणि पैसा वाचेल, आचारसंहितेचा कालावधी कमी होईल. तसेच राजकीय अस्थिरता कमी होईल आणि सरकार प्रशासनावर लक्ष केंद्रित करू शकेल. मतदारांचा सहभागही वाढेल. सध्या हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण