शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

... तर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल; सुदिन ढवळीकरांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:10 PM

आपण म्हादईचा प्रश्नही राज्यपालांसमोर मांडला. म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवतेय व त्यामुळे हे पाणी आटेल व गोव्याला परिणाम भोगावे लागतील असे आपण यापूर्वी म्हणालो होतो

पणजी : राज्य आर्थिकदृष्टय़ा खूप अडचणीत आहे व खर्च कपातीसाठी व्यापक व कडक उपाययोजना करणो गरजेचे बनले आहे. जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खर्च कपातीवर भर दिला नाही तर गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ येईल. गोव्याची वाटचाल त्याच दिशेने होईल असा इशारा मगोपचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे दिला.

ढवळीकर म्हणाले, की आपण राज्यपाल सत्यपाल मलिक यांना कालच भेटलो. राज्यपाल चांगले काम करतात. त्यांना आमचा कायम पाठींबा असेल. सरकारने कोविद संकट काळात खर्चात खूप कपात करण्याची गरज आहे ही गोष्ट आपण राज्यपालांसमोर मांडली. राज्यपालांनी खनिज खाण धंदाही सुरू व्हावा म्हणून पुढाकार घेतला आहे. आपण म्हादईचा प्रश्नही राज्यपालांसमोर मांडला. म्हादई नदीचे पाणी कर्नाटक वळवतेय व त्यामुळे हे पाणी आटेल व गोव्याला परिणाम भोगावे लागतील असे आपण यापूर्वी म्हणालो होतो व पंतप्रधानांना पत्रही पाठवले होते. त्याच पत्रची प्रत मी राज्यपालांना दिली व वाठादेव- साखळी येथे म्हादई नदीच्या प्रवाहात आता एक फूट देखील पाणी राहिलेले नाही ही गोष्ट आपण राज्यपालांच्या नजरेस आणून दिली. राज्यपालांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे. 

अधिवेशन बोलवा-

ढवळीकर म्हणाले, की मंत्री वगैरे 30 लाखांची कारगाडी खरेदी करू शकतात असे परिपत्रक नुकतेच अर्थ खात्याने काढले. पणजी महापालिकेने तर नवी महागडी कार खरेदीही केली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना या कार खरेदीविषयी काही माहिती नव्हते की त्यांना महापालिकेने मुद्दाम अंधारात ठेवले ते त्यांनीच सांगावे. खर्च कपातीच्या विषयावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी पाच दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलवावे. त्यात सर्व माजी मुख्यमंत्री व जाणकार आमदारांना बोलू द्या. सर्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी ऐकाव्यात. केवळ एक समिती नेमली म्हणून होणार नाही. जर खर्च कपात झाली नाही तर राज्य पूर्ण आर्थिक कोंडीत सापडेल व राष्ट्रपती राजवट येईल. सर्व मंत्री- आमदारांना घरी जावे लागेल. मग आमदारांकडे महामंडळेही राहणार नाहीत. 

राज्यात येत्या 15 मेनंतर मोठी पाणी टंचाई निर्माण होईल. ओपाचे सध्याची पाणी पातळी बांधकाम खाते त्यावेळी कायम राखूच शकणार नाही. म्हादई नदीतील पाणी ज्या वाठादेव येथे पूर्ण आटले, त्या जागेपासून मुख्यमंत्री सावंत यांचे निवासस्थान केवळ पाच किलोमीटरवर आहे. वाठादेवला फक्त एक पाऊल बुडेल एवढीच सध्या पाण्याची पातळी आहे. सध्या गोव्यात पर्यटक नसल्याने ओपाला पाण्याची पातळी योग्य आहे पण एकदा पर्यटन धंदा सुरू झाल्यानंतर वस्तूस्थिती उघड होईल, असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतcorona virusकोरोना वायरस बातम्या