शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आमदार आयात केले नाहीत, स्वेच्छेने आले त्यांनाच पक्षात घेतले: सुभाष फळदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2024 09:42 IST

जे कुणी स्वेच्छेने भाजपात आले त्यांना दारे खुली करणे म्हणजे आयात करणे नव्हे, असे म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपने आमदार आयात करू नयेत, असे सांगितले असले तरी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी भाजपने आमदार आयात केले नसल्याचे म्हटले आहे. जे कुणी स्वेच्छेने भाजपात आले त्यांना दारे खुली करणे म्हणजे आयात करणे नव्हे, असे म्हटले आहे.

स्पष्टवक्ते असलेले भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गोवा भेटीदरम्यान पक्षातल्या राज्यातील कारभारावर अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढताना आमदारांची आयात करू नका, असे बजावले होते. गडकरी यांची ही सूचना कशी घेता, असे विचारले असता मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, आम्ही आमदार आयात करीत नाहीत. जे कुणी आमदार पक्षात घेतले गेले ते भाजपची ध्येयधोरणे पटल्यामुळे स्वतःहून आले होते. त्यामुळे त्यांना पक्षाची दारे खुले करणे म्हणजे आयात करणे ठरत नाही, असे ते म्हणाले.

विकासकामांच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केलेल्या टीकेला उत्तर देताना फळदेसाई म्हणाले की, काँग्रेसला विकासावर बोलण्याचा अधिकारच नाही. काँग्रेसने राज्यात खूप दीर्घकाळ सत्ता भोगली आहे. सत्ता काळात काँग्रेसला जे जमले नाही ते भाजपने करून दाखवले आहे.

भाजपचे प्रवक्ते अॅड, यतीश नायक म्हणाले की, काँग्रेसने सत्ताकाळात अनेक घोटाळे करून पक्ष बदनाम केल्यामुळे यूपीए हे नाव बदलून इंडिया अलायन्स नाव ठेवावे लागले. मागील तीन निवडणुकांत राष्ट्रीय स्तरावर हा पक्ष दोन अंकी संख्येवर अडकून पडला आहे तर भाजपाने सतत तिसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे, असे ते म्हणाले. पक्षाचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरेही उपस्थित होते.

'सनबर्न' विषयी लोकभावना कळवू

सनबर्न दक्षिण गोव्यात होत असल्याची केवळ चर्चा आहे. सनबर्न असो किंवा इतर काहीही असो, लोकांना हवे असेल तरच होणार आणि लोकांना नको असेल तर होणार नाही, असे मंत्री फळदेसाई यांनी म्हटले आहे. भाजपच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, ते लोकांच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवतील. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपा