शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आमदारांनो, लोकांना भेटा!; भाजपची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2024 09:23 IST

लोकांच्या अपेक्षापूर्तीबाबत पक्ष राज्यभर करणार सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपच्या किती आमदारांनी मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या हे जाणून घेण्यासाठी पक्ष लवकरच कार्यकर्त्यांमार्फत सर्वेक्षण करणार आहे. यापूर्वीच पक्षाने मंत्र्यांनी ADES लोकांसह कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात असे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल, मंगळवारी पणजीत पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सदानंद तानावडे म्हणाले की, पक्षाच्या प्रत्येक आमदार, मंत्र्याने लोकांसाठी उपलब्ध असायला हवे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्याही काही अडचणी असतात त्या जाणून घ्यायला हव्यात त्या अनुषंगाने एक मंत्री प्रत्येक आठवड्याला मंगळवारी भाजप कार्यालयात बसेल तसेच मंत्री दर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी दोन तास मंत्रालयात लोकांना भेटतील.

राज्यात गाजत असलेल्या सांकवाळच्या भुतानी मेगा प्रकल्पाबद्दल विचारले असता तानावडे म्हणाले की, सरकारने अर्थात नगर नियोजन खात्याने भुतानीला नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे यावर मी बोलू इच्छित नाही त्यांच्या उत्तरातून काय बाहेर येते पाहू. परवाने कधी दिले वगैरे कळेल. डीएलएफ प्रकल्पाला भाजप सरकारने परवाने दिलेली नाही. ती कोणी दिले हे तुम्ही तपासा, असे तानावडे म्हणाले. परंतु त्याचबरोबर हा प्रकल्प पाहताना मलाही वाईट वाटते, असे खेदजनक उद्‌गार त्यांनी काढले.

तानावडे म्हणाले की, आज २५ रोजी भाजपकडून राज्यभरात मेगा सदस्य नोंदणी हाती घेतली जाईल. आतापर्यंत ८० हजार सदस्य झाले असून साखळी मतदारसंघात सर्वाधिक सदस्य नोंदणी झालेली आहे. राज्यभरातील सदस्य आकडा आज १ लाख पार करील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकातील भाजप खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी हे खास उपस्थित राहणार आहेत. सर्व मंत्री, आमदारांनी आपापले नियोजित कार्यक्रम पुढे ढकलावेत व या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन तानावडे यांनी केले आहे.

तीन महिन्यांत रिपोर्ट कार्ड देईन : खंवटे

दरम्यान, पर्वरी येथे एका कार्यक्रमावेळी पत्रकारांशी बोलताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात मी लोकांना भेटण्याचे काम सुरु केले आहे. दर रविवारी अधिकांऱ्याना सोबत घेऊन प्रभागनिहाय मी लोकांना भेटतो. त्यांच्या समस्या, अडचणी, सूचना ऐकून घेतो. लोकांचा मला चांगला प्रतिसाद मिळतो. मंत्री म्हणून पर्वरीवासीयांसाठी कोणकोणती कामे केली. यापुढे काय करणार आहे, यासंबंधीचे रिपोर्ट कार्ड पुढील तीन महिन्यात मी देईन.

ही तर सर्व मंत्र्यांची सामुहिक जबाबदारी

भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांची गाह्राणी ऐकल्यानंतर माविन गुदिन्हो पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आम्हा सर्व मंत्र्यांना लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत. लोकांचे प्रश्न धसास लावणे ही सर्व मंत्र्यांची सामुहिक जबाबदारी आहे. त्यामुळे दर मंगळवारी भाजप कार्यायात एक मंत्री बसेल. दर बुधवारी मंत्रालयात सर्व मंत्री लोकांना उपलब्ध असतील. तसा निर्णय पक्षाने घेतला आहे व आम्हा सर्व मंत्र्यांना तो बंधनकारक आहे. लोकांना भेटल्यामुळे काही बाबतीत जागीच निर्णय घेता येतील. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबध्द आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण