शहरं
Join us  
Trending Stories
1
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
3
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
4
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
5
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
6
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
7
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
8
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
9
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
10
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
11
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
12
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
13
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
14
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
15
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
16
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
17
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
18
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
19
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
20
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?

गोव्याचे पर्यटन मंत्र्यांचे मिशन 30 टक्के कमिशन; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 16:52 IST

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत.

मडगाव:  देशा बाहेरून जे खलाशी आणि इतर गोमंतकीय गोव्यात येऊ लागले आहेत त्यांना सक्तीने सशुल्क क्वारंटायन व्हावे लागत आहे. या खलाशाकडून पैसे आकारूनही त्यांना राहण्यासाठी ज्या खोल्या दिल्या जातात त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने या संबंधीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे सरकारची नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तोफ डागली आहे. बाबूंच्या मिशन 30 टक्के कमिशनचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकारचे पर्यटन मंत्री  बाबू आजगावकर यांच्या 'मिशन ३० टक्के कमिशन" मुळे गोमंतकीय पर्यटक व्यावसायीकांना आपला धंदा चालवणे कठिण झाले असुन, सद्यपरिस्थीतीत आपल्या हॉटेलांची देखभाल करणेही त्यांना जड जात आहे, त्यामुळेच अनेक हॉटेलात कोरोंटायन केलेल्यांना आज त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी केला आहे. 

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत. परंतु, गोव्यातील भाजप सरकारने त्यांच्या कडुन शुक्ल वसुल करुन त्यांना खासगी हॉटेलात कोरोटांयन करुन ठेवले आहे. मागील दोन दिवस अश्या काही हॉटेलांतील अव्यवस्थेचे व्हिडीयो समाजमाध्यमांवर झळकले असुन, सदर परिस्थीती ही पर्यटनमंत्र्यांच्या लुटमारीने हवालदिल झालेल्यांची एक झलक आहे असा आरोप विठू मोरजकर यांनी केला आहे. 

गोवा ट्रेव्हल व टुरीजम असोसिएशनने पर्यटन मंत्री बाबू आजगावकर लोकांना लुटत असल्याचा आरोप करून कमिशन गोळा करण्यात पर्यटन खात्यातील एका अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे नावासकट मुख्यमंत्र्याना पत्र लिहीले होते. त्या पत्रातील आरोपांची चौकशी झाली का वा आपल्याला कमिशनचा वाटा मिळत असल्याने मुख्यमंत्र्यानी ते पत्र दडपले हे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे. 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकरांना पर्यटन खात्यात भ्रष्टाचाराचा विक्रम केला असुन, सरकारी सेवेत असलेले आपले बंधू डॉ. श्रीकांत आजगावकर, भावजय रश्मी आजगावकर व आपले कुटूंबिय यांना घेऊन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या खर्चाने विदेश वारी करुन त्यांनी सरकारला लुटले आहे असाही आरोप त्यांनी केला.

बाबू आजगावकरांच्या लुटमारीने आज गोव्यातील प्रत्येक पर्यटक व्यावसायीक त्रस्त असुन, टॅक्सीवाले, शॅक व्यावसायीक, गोमंतकीय जीवरक्षक, हॉटेल चालक, इव्हेंट कंपनी त्यांना  शाप देत आहेत.बाबू आजगावकरांना अधिक काळ पदावर ठेवल्यास अखेरची घटका मोजत असलेले पर्यटन क्षेत्र अखेरचा श्वास घेण्यास वेळ लागणार नाही हे भाजप सरकारने लक्षात ठेवावे असे मोराजकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत