शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

गोव्याचे पर्यटन मंत्र्यांचे मिशन 30 टक्के कमिशन; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 16:52 IST

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत.

मडगाव:  देशा बाहेरून जे खलाशी आणि इतर गोमंतकीय गोव्यात येऊ लागले आहेत त्यांना सक्तीने सशुल्क क्वारंटायन व्हावे लागत आहे. या खलाशाकडून पैसे आकारूनही त्यांना राहण्यासाठी ज्या खोल्या दिल्या जातात त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने या संबंधीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे सरकारची नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तोफ डागली आहे. बाबूंच्या मिशन 30 टक्के कमिशनचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकारचे पर्यटन मंत्री  बाबू आजगावकर यांच्या 'मिशन ३० टक्के कमिशन" मुळे गोमंतकीय पर्यटक व्यावसायीकांना आपला धंदा चालवणे कठिण झाले असुन, सद्यपरिस्थीतीत आपल्या हॉटेलांची देखभाल करणेही त्यांना जड जात आहे, त्यामुळेच अनेक हॉटेलात कोरोंटायन केलेल्यांना आज त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी केला आहे. 

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत. परंतु, गोव्यातील भाजप सरकारने त्यांच्या कडुन शुक्ल वसुल करुन त्यांना खासगी हॉटेलात कोरोटांयन करुन ठेवले आहे. मागील दोन दिवस अश्या काही हॉटेलांतील अव्यवस्थेचे व्हिडीयो समाजमाध्यमांवर झळकले असुन, सदर परिस्थीती ही पर्यटनमंत्र्यांच्या लुटमारीने हवालदिल झालेल्यांची एक झलक आहे असा आरोप विठू मोरजकर यांनी केला आहे. 

गोवा ट्रेव्हल व टुरीजम असोसिएशनने पर्यटन मंत्री बाबू आजगावकर लोकांना लुटत असल्याचा आरोप करून कमिशन गोळा करण्यात पर्यटन खात्यातील एका अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे नावासकट मुख्यमंत्र्याना पत्र लिहीले होते. त्या पत्रातील आरोपांची चौकशी झाली का वा आपल्याला कमिशनचा वाटा मिळत असल्याने मुख्यमंत्र्यानी ते पत्र दडपले हे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे. 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकरांना पर्यटन खात्यात भ्रष्टाचाराचा विक्रम केला असुन, सरकारी सेवेत असलेले आपले बंधू डॉ. श्रीकांत आजगावकर, भावजय रश्मी आजगावकर व आपले कुटूंबिय यांना घेऊन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या खर्चाने विदेश वारी करुन त्यांनी सरकारला लुटले आहे असाही आरोप त्यांनी केला.

बाबू आजगावकरांच्या लुटमारीने आज गोव्यातील प्रत्येक पर्यटक व्यावसायीक त्रस्त असुन, टॅक्सीवाले, शॅक व्यावसायीक, गोमंतकीय जीवरक्षक, हॉटेल चालक, इव्हेंट कंपनी त्यांना  शाप देत आहेत.बाबू आजगावकरांना अधिक काळ पदावर ठेवल्यास अखेरची घटका मोजत असलेले पर्यटन क्षेत्र अखेरचा श्वास घेण्यास वेळ लागणार नाही हे भाजप सरकारने लक्षात ठेवावे असे मोराजकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत