शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

गोव्याचे पर्यटन मंत्र्यांचे मिशन 30 टक्के कमिशन; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 16:52 IST

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत.

मडगाव:  देशा बाहेरून जे खलाशी आणि इतर गोमंतकीय गोव्यात येऊ लागले आहेत त्यांना सक्तीने सशुल्क क्वारंटायन व्हावे लागत आहे. या खलाशाकडून पैसे आकारूनही त्यांना राहण्यासाठी ज्या खोल्या दिल्या जातात त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने या संबंधीचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे सरकारची नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्यावर तोफ डागली आहे. बाबूंच्या मिशन 30 टक्के कमिशनचा हा परिणाम असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

गोव्यातील भ्रष्ट भाजप सरकारचे पर्यटन मंत्री  बाबू आजगावकर यांच्या 'मिशन ३० टक्के कमिशन" मुळे गोमंतकीय पर्यटक व्यावसायीकांना आपला धंदा चालवणे कठिण झाले असुन, सद्यपरिस्थीतीत आपल्या हॉटेलांची देखभाल करणेही त्यांना जड जात आहे, त्यामुळेच अनेक हॉटेलात कोरोंटायन केलेल्यांना आज त्रास सहन करावा लागत आहे असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते विठू मोरजकर यांनी केला आहे. 

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत. परंतु, गोव्यातील भाजप सरकारने त्यांच्या कडुन शुक्ल वसुल करुन त्यांना खासगी हॉटेलात कोरोटांयन करुन ठेवले आहे. मागील दोन दिवस अश्या काही हॉटेलांतील अव्यवस्थेचे व्हिडीयो समाजमाध्यमांवर झळकले असुन, सदर परिस्थीती ही पर्यटनमंत्र्यांच्या लुटमारीने हवालदिल झालेल्यांची एक झलक आहे असा आरोप विठू मोरजकर यांनी केला आहे. 

गोवा ट्रेव्हल व टुरीजम असोसिएशनने पर्यटन मंत्री बाबू आजगावकर लोकांना लुटत असल्याचा आरोप करून कमिशन गोळा करण्यात पर्यटन खात्यातील एका अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे नावासकट मुख्यमंत्र्याना पत्र लिहीले होते. त्या पत्रातील आरोपांची चौकशी झाली का वा आपल्याला कमिशनचा वाटा मिळत असल्याने मुख्यमंत्र्यानी ते पत्र दडपले हे डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे. 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकरांना पर्यटन खात्यात भ्रष्टाचाराचा विक्रम केला असुन, सरकारी सेवेत असलेले आपले बंधू डॉ. श्रीकांत आजगावकर, भावजय रश्मी आजगावकर व आपले कुटूंबिय यांना घेऊन इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या खर्चाने विदेश वारी करुन त्यांनी सरकारला लुटले आहे असाही आरोप त्यांनी केला.

बाबू आजगावकरांच्या लुटमारीने आज गोव्यातील प्रत्येक पर्यटक व्यावसायीक त्रस्त असुन, टॅक्सीवाले, शॅक व्यावसायीक, गोमंतकीय जीवरक्षक, हॉटेल चालक, इव्हेंट कंपनी त्यांना  शाप देत आहेत.बाबू आजगावकरांना अधिक काळ पदावर ठेवल्यास अखेरची घटका मोजत असलेले पर्यटन क्षेत्र अखेरचा श्वास घेण्यास वेळ लागणार नाही हे भाजप सरकारने लक्षात ठेवावे असे मोराजकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत