शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

म्हादई पाणीप्रकरणी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे गोव्याला समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 14:29 IST

म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. कर्नाटक किंवा महाराष्ट्र आम्ही मोठी राज्ये आहोत त्यामुळे लहान राज्यांची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.

 पणजी - म्हादईच्या प्रश्नावर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी गोव्याला समर्थन देताना म्हादईचे पाणी कर्नाटकने वळविल्यास या नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा येईल, असे म्हटले आहे. गोवा हे लहान राज्य असल्याने येथील नैसर्गिक स्रोतही मर्यादित आहेत. कर्नाटक किंवा महाराष्ट्र आम्ही मोठी राज्ये आहोत त्यामुळे लहान राज्यांची काळजी घ्यायला हवी, असे ते म्हणाले.ह्यम्हादईह्ण गोव्यासाठी संजीवनी आहे आणि या राज्याचे अनेक पायाभूत प्रकल्प पाण्यावर अवलंबून आहेत. म्हादईचा वाद तीन राज्यांमध्ये असला तरी गोव्याला निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान असल्याचे ते म्हणाले. या बाबतीत कर्नाटकने आधी गोवा सरकारबरोबर आणि नंतर महाराष्ट्राबरोबर चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.केसरकर पुढे असेही म्हणाले की, ह्यतिळारी धरण माझ्या सावंतवाडी मतदारसंघात आहे. परंतु या धरणावरुन कधीही गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात वाद झालेला नाही. गोव्याला या धरणाचे ७६ टक्के तर महाराष्ट्राला २४ टक्के पाणी मिळते तरीही सर्व काही सुरळीत चालले आहे.ह्ण महाराष्ट्राकडून कर्नाटक आणि गुजरातला मागणीनुसार पाणी दिले जाते, अशी पुस्तीही त्यानी जोडली. म्हादईचा जेथे उगम खानापूर तालुक्यातून होतो.केसरकर पुढे म्हणाले की, सीमावाद सोडविण्यासाठी बेळगांव शहराचे दोन भाग करावेत, असे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुचविले होते. परंतु तसे होऊ शकले नाही. तसे झाले असते तर खानापूर तालुक्यासह या भागातील अन्य तालुक्यांचे संदर्भच बदलले असते. सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय होत आहे. या भागातील ८५६ गावांमधील लोकांना त्यांची मातृभाषा असलेल्या मराठीतून कर्नाटकने सरकारी दस्तऐवज द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर goaगोवा